‘चाई’ ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत संशोधकांसह शेतकऱ्यांचा सन्मान

जळगाव दि. २८ – जैन हिल्स येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय फलोद्यान परिषदेमध्ये चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चरल असोसिएशन ऑफ इंडिया) ची ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषद झाली. ११ विविध पुरस्कारांनी देशभरातील प्रगतीशील शेतकरी, शास्त्रज्ञ, अभ्यासक, संस्था व कृषि विद्यापिठांचे विभागप्रमुखांचा सन्मान करण्यात आला.

जैन हिल्स येथील परिश्रम सभागृहामध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अतिरीक्त सचिव व डबलींग फार्मर इनकम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई, चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, डाॕ. विशाल नाथ, डाॕ. हर्षवर्धन, डॉ. जे. एच. परिहार, डॉ. पी. रतमन, शिमला सीपीआरआयचे माजी संचालक डाॕ.बिरपाल सिंग, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे डॉ. के. बी. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्तविक डॉ. हर्षवर्धन यांनी केले. चाई च्या कार्याविषयी डाॕ. विशाल नाथ यांनी सांगितले.

पुरस्कार व पुरस्कारार्थी असे पुढीलप्रमाणे : –
१) चाइ – डॉ. आर. एस. परोडा पुरस्काराने डॉ. तुषार कांती बेहेरा, संचालक, आयसीएआर-आयआयव्हीआर, जाखिनी (वाराणसी, युपी)
२) चाइ – डॉ. बी. एच. जैन पुरस्काराने डॉ. ए. व्ही. ढाके, वरिष्ठ शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेड
४) चाइ – कौटिल्य लोकनिती पुरस्कार-२०२३ ने डॉ. सुधीर जगन्नाथ भोंगळे
५) चाइ – अचिव्हर्स पुरस्कार-२०२३ ने प्रो. अरविंद कुमार, माजी कुलगुरु, आरएलबीसीएयु (झाशी, युपी), डॉ. ए. के. सिंग, कुलगुरु, आरएलबीसीएयु (झाशी, युपी), डॉ. डी. आर. सिंग, कुलगुरु, बीएयु (साबोर, भागलपूर, बिहार), डॉ. मेजर सिंग, सदस्य, एएसआरबी, डेअर, एमओएएफडब्ल्यू (नवी दिल्ली) डॉ. के. व्ही. प्रसाद, संचालक, आयसीएआर-डायरेक्टोरेट ऑफ फ्लॉरीकल्चरल रिसर्च (पुणे), डॉ. कंचेरला सुरेश, संचालक, आयसीएआर-इंडियन इन्स्टीटयूट ऑफ ऑइल पाम रिसर्च (आंध्र प्रदेश), डॉ. ब्रजेश सिंग, संचालक, आयसीएआर-सीपीआरआय (शिमला, एचपी) डॉ. जी. बायजू, संचालक, आयसीएआर-सीटीसीआरआय (थिरुवनंतपूर, केरळ), डॉ. विजय महाजन, संचालक, आयसीएआर-डीओजीआर, राजगुरुनगर (पुणे), डॉ. मनिश दास, संचालक आणि प्रकल्प समन्वयक, आयसीएआर-डीएमएपीआर बोरीआवी (आनंद, गुजराथ)
६) चाइ – अॅप्रेसिएशन पुरस्काराने डॉ. राम अवध राम, माजी मुख्य शास्त्रज्ञ, सीआयएसएच, रेहमानखेरा (लखनौ, युपी), डॉ. दयाराम, माजी प्रमुख, मायकोलॉजी विभाग, डीआरपीसीएयु (पुसा, बिहार)
७) चाइ – जेआयएसएल फेलोशीप पुरस्काराने डॉ. एच. उषा नंदिनी देवी, असोसिएट प्रोफेसर, टीएनएयु (कोइंबतोर, तामिळनाडू)
८) चाइ – डॉ. रे बेस्ट डेझर्टेशन पुरस्काराने डॉ. सुमेरसिंग पाटील, केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) यांचा त्यांनी आंब्याच्या फुलांसंबंधी जीन्सचा अभ्यास केल्याने सन्मान करण्यात आला. तर डॉ. रवी. वाय. शास्त्रज्ञ, आयसीएआर-एनआरसी ऑन सीड स्पाईसेस (अजनेर, राजस्थान)
९) चाइ – डॉ. क्रीती सिंग बेस्ट पेपर पुरस्काराने दलासनुरु चंद्रेगौडा, मंजुनाथा गौडा, विजय महाजन, राम दत्ता, कृषी शास्त्रज्ञ निवड बोर्डाचे सदस्य डॉ. मेजर सिंग यांनी “कांद्याच्या गठ्ठ्यावरील सीएमएस-एस मेल-स्टराइल सायटोप्लाझम चे संशोधन केले त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.
१०) चाइ – इन्स्टीटयूशनल फेलो पुरस्कार-२०२३ हा नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन (एनएचआरडीएफ), नवी दिल्ली., महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अॅण्ड टेक्नोलॉजी (उदयपूर, राजस्थान), मे. निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, पाचोरा जि. जळगाव,
११) चाइ – फेलो पुरस्कार-२०२३ हा संस्थांना देण्यात आला यामध्ये डॉ. डी. के. रॉय, संचालक, बियाणे (सीड्स) आणि मुख्य शास्त्रज्ञ, अॅग्रोनॉमी, डीआरपीसीएयु (पुसा, बिहार), नॅशनल हॉर्टीकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन (एनएचआरडीएफ) (नवी दिल्ली), डॉ. रवी वाय, शास्त्रज्ञ, आयसीएआर-एनआरसीएसएस (अजमेर, राजस्थान), निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएसपीएल) पाचोरा जि. जळगाव, डॉ. बाल क्रिष्णा, वरिष्ठ शास्त्रज्ञ,जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव, डी. के. महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, रावेर ता. जळगाव, राजाराम गणू महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, तांदलवाडी, रावेर ता. जळगाव, डॉ. राम अवध राम, माजी मुख्य शास्त्रज्ञ, सीआयएसएच, रेहमानखेरा (लखनौ, युपी), डॉ. दयाराम, माजी प्रमुख, मायकोलॉजी डिपार्टमेंट, डीआरपीसीएयु (पुसा, बिहार), प्रेमानंद हरी महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, तांदलवाडी रावेर जि. जळगाव, विशाल रामेश्वर अग्रवाल, रुची बनाना एक्सपोर्ट्स रावेर, जि. जळगाव, प्रशांत वसंत महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, तांदलवाडी रावेर जि. जळगाव, रामदास त्र्यंबक पाटील, निंबोल रावेर जि. जळगाव, विशाल किशोर महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, नायगाव, मुक्ताईनगर जि. जळगाव, दादासाहेब नामदेव पाटील, बितरगाव, करमाळा जि. सोलापूर, प्रियम सिंग, एनएच कन्सल्टन्सी, ओखला (नवी दिल्ली) यांचा सन्मान करण्यात आला.

भवरलाल जैन यांच्या कार्याच्या सकारात्मक लहरी शेतकऱ्यांना कायमच प्रेरणादायी – डॉ. अशोक दलवाई

आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते– अनिल जैन


जैन हिल्स येथील राष्ट्रीय फलोद्यान परिषद सुरू

जळगाव दि.२८ –  भारतीय कृषी क्षेत्रात नैसर्गिक संसाधनाचे जतन करून अधिकाधिक फलोत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. मजूरांचा अकार्यक्षम वापर वाढत आहे. यामुळे डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. भवरलाल जैन यांनी शेती आणि शेतकऱ्यांना कायमच महत्त्व दिलं आणि त्याअनुषंगाने त्यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या विधायक कार्याच्या सकारात्मक लहरी आजही इथं अनुभवायास मिळतात. महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या मार्गानेच शेतकऱ्यांची सेवा केली. नवनवीन प्रयोग करून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्याचा प्रयत्न केला.

जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय फलोद्यान परिषदेमध्ये अमित कृषी ऋषी अॅवार्डने श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांचा त्यांनी केलेल्या कृषिक्षेत्रातील अनमोल कार्याला अधोरेखित करून गौरव करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन व सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन.
जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे दीपप्रज्वालन करून उद्घाटन करताना डॉ.अशोक दलवाई. सोबत डावीकडून डॉ. मेजर सिंग, नॅन्सी बेरी, एइर इशेल, डॉ.एच.पी.सिंग, अनिल जैन, आय. एम. मिश्रा, डॉ. एस. के. चक्रवर्ती, सुरजित चौधरी, डॉ. ए. आर. पाठक, अॅम्नोन ऑफेन.

भगवान महावीर यांच्या  श्रद्धा, ज्ञान आणि वर्तन या त्रिसुत्रीवर भवरलाल जैन यांनी आपले आयुष्य समर्पित केले. असे  प्रतिपादन केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव व डबलींग फार्मर इनकम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांनी राष्ट्रीय फलोद्यान परिषदेच्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.नवीदिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचा रविवारी (ता.२८) प्रारंभ झाला. येत्या मंगळवारपर्यंत (ता. ३०) ही परिषद सुरू राहणार आहे. परिषदेत देशातील १०० शास्त्रज्ञ बारा आयसीएआर केंद्रांचे संचालक सहभागी झाले आहेत. उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, कृषी शास्त्रज्ञ निवड बोर्डाचे सदस्य डॉ. मेजर सिंग, इस्त्राईल येथील लसूण शास्त्रज्ञ एइर इशेल,  इस्त्राईलचे आंतरराष्ट्रीय सिंचनतज्ज्ञ अॅम्नोन ऑफेन, चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष  डॉ. एच. पी. सिंग, माजी सनदी अधिकारी तथा कृषितज्ज्ञ डॉ. अशोक दलवाई, झारखंडच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ. विशाल नाथ, फ्युचर अग्रीकल्चर लीडर्स इन इंडिया (फाली) च्या संचालिका नॅन्सी बेरी, परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आय. एम. मिश्रा, जुनागड कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. आर. पाठक, उत्तर बंगा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. के. चक्रवर्ती आदी उपस्थित होते.नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून शाश्वत विकास साधता येतो, त्या दिशेने जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी ‘सार्थक करूया जन्माचे, रूप पालटू वसुंधरेचे’ याप्रमाणे कार्य केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ८० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल केला आहे. नव्या पिढीने शेतीकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. या पुढील काळात शेतीसाठी ड्रोन, सॅटेलाईट, स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर व्हायला हवा. यासह तरुणाईने देखील शेतीमध्ये सामर्थ्यांने पुढे यायला हवे, असे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले.डबलींग फार्मर इनकम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन झाले. प्रास्तावीक डॉ. एच. पी. सिंग यांनी केले. यात त्यांनी कृषिक्षेत्रातील भविष्यातील उद्दिष्टे विशेषत: फळबागांमध्ये संशोधन आणि विकास यावर भर देण्यासाठी ही परिषद महत्त्वाची असल्याचे सांगितले. नॅन्सी बॅरी, डॉ. इंद्रमणी मिश्रा, डॉ. एस. के. चक्रवर्ती, डॉ. मेजर सिंग, डॉ. ए. आर. पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘शोध चिंतन-२०२३’ या शोधप्रबंधाची १५  वी आवृत्ती, सारांश पुस्तक, मागील वर्षातील इतिवृत्त व सीडी यांचे  प्रकाशन करण्यात आले. डॉ. विशाल नाथ यांनी आभार मानले. गुरूवंदना दिपक चांदोरकर यांनी सादर केली. डॉ. सुब्रम्हन्या यांनी सूत्रसंचालन केले.माजी केंद्रीय फलोद्यान आयुक्त तथा माजी केंद्रीय सचिव सुरजित चौधरी यांनी  मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जैन इगिरेशनसारख्या संस्था भविष्यातील शेतीचे मंदीर किंवा मार्गदर्शक आहेत. कृषी क्षेत्रातील समस्यांना पर्याय उपलब्ध करून देत आहेत. प्लास्टिकचा योग्य वापर करून शेतीला कसा लाभ मिळू शकतो, याचेही उत्तम उदाहरण जैन इरिगेशनमध्ये दिसते. रसायनांचा बेसुमार वापर झाला आहे. हरित क्रांतीनंतर ही समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे. पुढे पर्यावरण पूरक काम व्हायला हवे. धोरणकर्त्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असेही ते म्हणाले. शेतीसमोरील संकटे दूर करण्यासंबंधीचे संशोधन बांधावर पोचायला हवे. असे मत माजी केंद्रीय फलोद्यान आयुक्त तथा माजी केंद्रीय सचिव सुरजित चौधरी यांनी जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय फलोद्यान परिषदेत व्यक्त केले.यावेळी चाईतर्फे शेतकरी व शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चाई ऑनरड फेलो-२०२३ या पुरस्काराने नवीदिल्ली येथील डीएआरई आणि डीजी आयसीएआरचे सेक्रटरी डॉ. हिमांशू पाठक यांचा सन्मान करण्यात आला. लाईफ टाईम अॅच्युमेंट अॅवार्ड- २०२३ ने डॉ. मेजर सिंग, चाई लाईफ टाईम रिक्यनुशेन अॅवार्ड डॉ. बलराज सिंग, चाई  अॉनररी फेलो डॉ. बिजेंद्र सिंग, प्रो. अजित कूमार कर्नाटक, निर्मल सिडचे डॉ. जे. सी. राजपूत यांनी सन्मानित करण्यात आले.अमित सिंग मेमोरियल फाऊंडेशन अॅवार्डने बबिता सिंग यांनी फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार जाहिर केले. त्यात अमित कृषी ऋषी अॅवार्डने श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांचा त्यांनी केलेल्या कृषिक्षेत्रातील कार्याला अधोरेखित करून गौरव  करण्यात आला. हा पुरस्कार जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन व सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन यांनी स्वीकारला. अमित पद्म जागृती अॅवार्ड हा निर्मल सिड्स प्रा. लि. ला मिळाला तो जे. सी. राजपूत यांनी स्वीकारला. अमित प्रभुध मनिषी अॅवार्ड उदयपूरच्या एमपीयूएएटीचे कुलगुरू प्रो. अजितकुमार कर्नाटक यांना देण्यात आला. दरम्यान तांदलवाडी ता. रावेर येथील प्रगतीशील शेतकरी राजाराम गणू महाजन यांना रामनंदन बाबू या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आला. यावेळी त्यांनी सत्काराला उत्तर देताना जैन इरिगेशन कंपनीची शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी स्पष्ट करून सांगितले. डॉ. एन. कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पहिले तांत्रिक सत्र पार पडले. या सत्रात उपाध्यक्ष म्हणून केरळचे डॉ. के. निर्मलबाबू, डॉ. एम. फिजा अहमद काम बघितले. संमेलनाचे आयोजक म्हणून जैन इरिगेशनचे डॉ. बाळकृष्ण यादव, तामिळनाडू कृषि विद्यापीठाच्या डॉ. एच. उषा नंदिनीदेवी यांनी जबाबदारी पार पाडली. डॉ. एच. पी. सिंग यांचे उपजिवका, पोषणद्रव्ये आणि पर्यावरणीय बदल यातून फळबागांचे लागवड व व्यवस्थापन यावर सादरीकरण झाले. इस्त्राईलच्या अॅम्नोन ओफेन यांनी भारत आणि इस्त्राईल यांच्यातील कृषी आणि सिंचन क्षेत्रातील सहकार्य याविषयी सादरीकरण केले. इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल यांनी लसूणाच्या संशोधनाविषयी माहिती दिली.अल्प संसाधने वापरून जास्तीत जास्त फळबागांमधून उत्पादन घेण्यासाठी दुसऱ्या सत्रात विचारमंथन करण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष सुरजीत चौधरी ह्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तर डॉ. हर्षवर्धन चौधरी आणि विनोद आनंद यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. या सत्राचे आयोजक म्हणून त्रिचीच्या एनआरसीबी चे डॉ. पी. सुरेश कुमार आणि डॉ. विनोद कुमार यांनी कार्य केले. या सत्रात मेजर सिंग, अरविंद कुमार, बलराज सिंग, जय सिंग परिहार यांनी फळबागातील पिकांसाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग, प्रिसीजन अॅग्रीकल्चर, ग्रीनहाऊस तंत्रज्ञान, भौगोलिक माहितीचा फळबागांसाठी उपयोग यावर सादरीकरण झाले. तर तिसऱ्या सत्रात पपईची उत्पादकता आणि दर्जा सुधारण्यासाठी अचूक तंत्रज्ञान, संसाधनांचा कार्यक्षम वापरासाठी उपाय, फळबागांमधील सेन्सर वापरून फलोत्पादनाचे व्यवस्थापन, किसान ड्रोनचा शेती वापर यावर सादरीकरण झाले. या परिषदेसाठी आयसीएआरचे केळीचे संचालक डॉ. सेव्हाराजन, डॉ. घोष (नागपूर), डॉ. टी. दामोदरण (लखनौ), माजी कुलगुरू डॉ. एनकुमार यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनी भाग घेतलाकेळी व बटाटा पिकावर आज कार्यशाळाराष्ट्रीय फलोत्पादन परिषदे दरम्यान उद्या दि. २९ मे ला ‘केळीवरील रोगराई व्यवस्थापन कार्यशाळा व बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या दोन विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये केळी उत्पादकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीचे सचिव के. बी. पाटील यांनी केले आहे.

https://tradingbuzz.in/wp-content/uploads/2023/05/VID-20230528-WA0007.mp4
https://tradingbuzz.in/wp-content/uploads/2023/05/VID-20230528-WA0009.mp4

जैन हिल्स येथे उद्यापासून राष्ट्रीय फलोद्यान परिषद

देशभरातील १०० शास्त्रज्ञांचा सहभाग; वातावरणातील बदलांसह तंत्रज्ञानावर होईल मंथन


जळगाव, दि. २७ – नवीदिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० मे दरम्यान जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या परिषदेमध्ये 11 सत्रात असून जवळपास 100 शास्त्रज्ञ आपले शोधनिबंध सादर करतील.

जैन हिल्स येथे होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, दिल्लीच्या एएसआरबीचे सदस्य डॉ. मेजर सिंग, माजी सचिव सुरजित चौधरी, ईस्त्राईलचे आंतरराष्ट्रीय सिंचनतज्ज्ञ अॅम्नोन ऑफेन, चाईचे चेअरमन डॉ. एच. पी. सिंग, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, दिल्ली येथील एनआरएएचे सीईओ डॉ. अशोक दलवाई, झारखंडच्या आयसीएआर-आयएआरआयचे डॉ. विशाल नाथ, माजी सचिव सुरजीत चौधरी यांच्या उपस्थित होणार आहे.

फलोद्यान म्हणजे विविध फळ पिकावर व भाजीपाला व अन्नधान्य उत्पादनाव वातावरण बदलाचा होणारा परिणाम त्यावर मात करण्यासाठी विविध तंत्रज्ञान क्रॉप कुलींग, टर्मिनल हिट मॅनेजमेंट, अल्ट्रा हायडेन्सिटी,अचूक पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन अशा विविध विषयावर शोधनिबंध सादर करतील. यातून शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्ता यावर विचारमंथन केले जाणार आहे. याच परिषदे दरम्यान ‘केळीवरील रोगराई व्यवस्थापन व बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या दोन विषयावर २९ मे रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे.

या परिषदेमध्ये एकूण ११ सत्र असून जवळपास १०० शास्त्रज्ञ आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. देशभरातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक व शास्त्रज्ञ, देशातील विविध कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांचा सहभाग असणार आहे. या परिषदेमध्ये काही विद्यापीठांचे कुलगुरू व माजी कुलगुरू देखील उपस्थित असतील. २८ मे रोजी (Confederation of Horticulture Associations of India) CHAI ‘चाई’चे पुरस्कार दिले जाणार आहेत. याच श्रुंखलेत ३० मे रोजी ‘उद्यान रत्न’ पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात येणार आहेत. संबंधीत सर्वांनी या परिषदेचा लाभ घ्यावा आणि आपली उपस्थिती नोंदवावी यासाठी 9422774943 व 9422776925 या क्रमांकावर संपर्क साधावा.

जैन हिल्स जळगाव येथे फालीच्या ९ व्या संमेलनात १५५ शाळांमधील १०८५ विद्यार्थ्यांचा असणार सहभाग

जळगाव, २७ मे :- जैन हिल्स येथे Future Agriculture Leaders of India (फाली) उपक्रमात महाराष्ट्र व गुजरातमधील १५५ सरकारी अनुदानित ग्रामीण शाळांमधील १०८५ विद्यार्थी सहभागी होत आहेत. शाळांमधील इन्होवेशन व कृषी व्यवसाय योजना स्पर्धांचे विजेते असलेले ८ वी व ९ व्या इयत्तेतील विद्यार्थी संमेलनामधे सादरीकरण करतील. संमेलन आयोजनाचे हे ९ वे वर्ष असून ते १ व २, ४ व ५, आणि ७ व ८ जून अशा तीन टप्प्यामधे जैन हिल्स जळगाव येथे पार पडेल.

फाली या अत्यंत अनोख्या आणि प्रभावशाली कार्यक्रमाने १३,००० विद्यार्थ्यांसह नववे वर्ष पूर्ण केले आहे. आधुनिक, शाश्वत शेती आणि कृषी उद्योगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना तांत्रिक, व्यवसाय आणि नेतृत्व काैशल्ये आणि संधी देऊन पुढील पिढी शेती क्षेत्राकडे आकर्षित व्हावी यासाठी फाली कार्यरत आहे.

असोसिएशन फाॅर फ्युचर अग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडियाची स्थापना कंपनी कायदा कलम ८ अंतर्गत झाली आहे. कंपनीचे संचालक : नादिर गोदरेज – गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, राजू श्राॅफ-यूपीएलचे अध्यक्ष, अनिल जैन – जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नॅन्सी बॅरी – एनबीए एंटरप्राइझ सोल्युशन्स टू पाॅव्हर्टीच्या अध्यक्षा यांचा समावेश आहे. फालीमधील प्रमुख सीएसआर योगदानकर्ते गोदरेज ऍग्रोव्हेट, युपीएल, जैन इरिगेशन, स्टार अग्री, रॅलीज आणि ऑम्निवोर या कंपन्या आहेत. या अर्थिक वर्षात फालीला सहकार्य देण्यासाठी इतर अनेक अग्रगण्य कृषी व्यवसाय आणि बँका सामील होण्याची शक्यता आहे.

फालीच्या मागील ९५ टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे की, फालीने आधीच करिअर म्हणून शेतीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. ते आता आधुनिक शेती आणि कृषी-उद्योगाकडे एक उत्तम आकर्षक भविष्य म्हणून पाहतात. ते म्हणतात की, फाली उपक्रमाने त्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक ती दिशा आणि योगदान दिले आहे. बहुतांश फाली विद्यार्थी घरच्या शेतीत किंवा कृषी उद्योगात काम करतानाच प्रामुख्याने कृषी, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण घेत आहेत. ३३,००० पेक्षा जास्त माजी फाली विद्यार्थ्यांसह फाली उपक्रमाने माजी फाली विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, शिष्यवृत्ती आणि व्यवसाय निधी कार्यक्रम तयार केला आहे. ज्यात फालीच्या प्रायोजक कंपन्या विद्यार्थ्यांना थेट सहकार्य देतात. हे फाली विद्यार्थ्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात महत्त्वाच्या टप्प्यांवर कृषी आणि कृषी-उद्योगाबद्दलचे त्यांचे ज्ञान आणि वचनबद्धता दृढ करण्यासाठी प्रोत्साहित करते.

फालीचे दोन दिवसीय होणारे ३ समान भागांमध्ये नववे संमेलन जूनच्या पहिल्या आठवड्यात जैन इरिगेशन जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. फालीच्या १०८५ विद्यार्थ्यांसोबत कंपन्या आणि बँकांचे ५० हुन अधिक प्रतिनिधी सामील होतील जे फालीला सीएसआर निधीतून सहकार्य करतात. क्षेत्र भेटीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात, वेबिनार आणि फाली इनोव्हेशन फिल्म्समध्ये भाग घेतात आणि नाविन्यपूर्ण स्पर्धाचे परीक्षण करतात. फाली अधिवेशनात भाग घेणाऱ्या कंपन्यांचे व्यवस्थापक या तरुण लीडरला मार्गदर्शन करतात आणि त्यांना शेती व्यवसाय करण्यास प्रेरित करतात. फालीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी फालीचे माजी विद्यार्थी देखील अधिवेशनाला उपस्थित राहतात..

पहिल्या दिवशी, फाली विद्यार्थी आणि सहभागी कंपनी व्यवस्थापकांना जैन सिंचन, फळ प्रक्रिया, टिश्यू कल्चर आणि इतर प्रक्रियाची माहिती दिली जाईल आणि सायंकाळी फाली विद्यार्थी आधुनिक, प्रगतशील शेतकऱ्यांशी चर्चा करतील. दुसऱ्या दिवशी, फालीचे विद्यार्थी बिझनेस प्लॅन आणि इन्होव्हेशन स्पर्धांमध्ये भाग घेतील. त्यासाठी कंपनी व्यवस्थापक परीक्षक म्हणून काम करतील.

जैन इरिगेशनचे चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर 

जळगाव, २६ मे २०२३ :- भारतातील सर्वात मोठी ठिबक व सूक्ष्म सिंचन आणि केळी व डाळिंब टिश्युकल्चर मध्ये जगातील पहिल्या क्रमांकाची जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आज चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे एकल तसेच एकत्रित निकाल जाहीर करण्यात आले आहे. आज जळगाव येथे झालेल्या कंपनी संचालक मंडळाच्या सभेत आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले.

ठळक सकारात्मक बाबी
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ने रिवूलीसबरोबर ठरवलेला विलीनीकरण करार २९ मार्च २०२३ ला पूर्ण झाला. 
३१ मार्च २०२३ रोजी जैन इरिगेशनने एका वर्षाच्या कालावधीत यशस्वीपणे पुनर्रचनेची प्रक्रिया अमलात आणली.
तसेच क्रिसील (CRISIL) व इकरा (ICRA) या दोन्ही क्रेडिट रेटिंग एजन्सीनी जैन इरिगेशनचे पत मानांकना (क्रेडिट रेटिंग) मध्ये सुधारणा करून ते स्टँडर्ड अॅसेट (BBB-) केले आहे.
जैन इरिगेशनचा बँक अकाऊंट हा स्टँडर्ड अॅसेट झाला व तो (बँकांच्या) व्यापारी शाखांना हस्तांतरीत झाला.
एकत्रित निकलात FY23 (आर्थिक वर्ष २०२२-२३) ला व्याजाच्या खर्चाची रक्कम २०० कोटी रुपयांनी कमी झाली. नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ ला व्याजाच्या खर्चाची रक्कम एनसीडी (कर्जरोख्यांवरील) व्याजाची रक्कम रोख नसलेली वगळून ३२० कोटी रूपये राहील.


रिवूलीस बरोबर विलीनीकरणाचे रचनात्मक फायदे
निव्वळ किंमतीतील भरपूर वाढ १५२५.१ कोटी रुपये (४१.७ टक्के) : ३१ मार्च २०२२ला ती वाढ ३६५६ कोटी रुपये  होती व  ती ३१ मार्च २०२३ला ५१८१.१ कोटी रुपये एवढी झाली. 
कर्जात २६८३ कोटी रुपयांची घट (४१.९ टक्के) : संपूर्ण एकत्रित कर्ज ३१ मार्च २०२२ अखेर ६४०४.९ कोटी रुपये होते. ते ३१ मार्च २०२३ अखेर ३७२१.९ कोटी रुपये इतके राहिले.
कंटींजेंट लायाबिलीटी (Contingent Liability) देण्याच्या रकमेत ३० कोटी अमेरिकन डॉलर्सने घट.
कर्जाचे कर,व्याज, कर व घसारापूर्व नफ्याशी असलेले गुणोत्तर १.७७ टक्क्यांनी सुधारले. संपूर्ण कर्जाचे कर, व्याज व घसारापूर्व नफ्याशी असलेले गुणोत्तर ६.८५ टक्के इतके ३१ मार्च २०२२ ला होते. ते ३१ मार्च २०२३ला ५.०८ टक्के इतके सुधारले.
जैन इरिगेशनचे रिवूलिसमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर नवीन कंपनीत १८.७ टक्के भागभांडवल राहील. याची किंमत १३.७५ कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी राहील.
अचानक एखादा होणारा फायदा : कामकाज बंद असलेल्या यंत्रांची विक्रीतील फायदा १२३४.६६ कोटी रुपये हे मागील आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये घडले.
एकल निकाल आढावा २०२३ची चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ रोजी संपणारे आर्थिक वर्ष
कंपनीने किरकोळ बाजारातील उत्तम मागणीमुळे उत्पन्नात भरपूर वाढ नोंदवली आणि त्यात मुख्य म्हणजे पाईप विभागास दक्षिण व पश्चिम क्षेत्राहून अधिक मागणी आणि जल जीवन मिशनची चौथ्या तिमाहीतील सतत मागण्यांमुळे वरील उत्पन्नात भरीव वाढ झाली.
चौथ्या तिमाहीत हायटेक विभागाच्या २६.६ टक्के वाढ चौथ्या तिमाहीत तर ३१ मार्च २०२३ अखेर २३.८ टक्के वाढ कंपनीने साध्य केली. याचे कारण म्हणजे सध्याचे प्रकल्प, किरकोळ बाजारातून खूप ऑर्डर्स आणि टिश्यूकल्चर व्यवसायात झालेली वाढ आहे.
कंपनीच्या प्लास्टीक विभागाने चौथ्या तिमाहीत आणि ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात अनुक्रमे ५६.१ टक्के आणि ३५.९ टक्के वाढ नोंदवली. याचे कारण म्हणजे महाराष्ट्र व दक्षिणेकडील राज्यात असलेल्या पीव्हीसी पाईपच्या भरपूर ऑर्डर्स व जल जीवन मिशनमध्येसुद्धा चांगली वाढ झाली.
उत्तम नफ्याचे मार्जिन, कामकाजातील कार्यक्षमतेत झालेली वाढ आणि कारखान्यातील  क्षमतेच्या वापरातील चांगल्या वाढीमुळे चौथ्या तिमाहीत कर, व्याज व घसारापूर्व नफा (इबीआयडीटीए) ६८.८ टक्क्यांनी वाढला. 
कंपनीने मागील वर्षात १८३.९ कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज फेडले. पण एनसीडीच्या ६९.39 कोटी रुपयांच्या व्याजाची नोंद रिव्हर्स केल्यामुळे निव्वळ कर्जातील घट ९२.० कोटी रुपये राहिली.
ऑर्डर्स बुक :- सध्या कंपनीच्या ऑर्डर्स पुस्तकामध्ये  १३२७.८ कोटी रुपयांच्या संपूर्ण ऑर्डर्स हातात आहेत. त्यापैकी हायटेक अॅग्री इनपुट विभागाच्या ५९२.४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत व ७३५.४ कोटी रुपये प्लास्टिक विभागाच्या ऑर्डर्स आहेत.
एकत्रित निकाल आढावा २०२३ची चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ रोजी संपणारे आर्थिक वर्ष
कंपनीच्या सर्व व्यवसायात नोंदवलेली उत्पन्नात वाढ ही भारतामध्ये सगळ्या विभागात झालेली आहे. कंपनीच्या उत्पन्नातील वाढ ही प्लास्टिक आणि अन्न प्रक्रिया विभागात नफ्याच्या मार्जिनमध्ये सुधारणा झाल्यामुळे कंपनीच्या कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात (इबीआयडीटीए) सुधारणा झाल्यामुळे कंपनीने साध्य केली.
चौथ्या तिमाहीत हायटेक विभागाने सध्या चालू असलेल्या प्रकल्पाचे पूर्ण झालेले काम, उत्पादनांना किरकोळ बाजारातील जास्त मागणी आणि भारतातील कंपनीचा टिश्यूकल्चर विभागातसुद्धा जास्त मागणी आहे. यामुळेच हायटेक विभागात भरपूर वाढ शक्य झाली. भारतातील निर्जलीकृत कांद्याच्या चांगल्या ऑर्डर्स असल्यामुळे अॅग्रो विभागाची चांगली वाढ झाली. कंपनीच्या फळभाजीपाला प्रक्रियात भारतात आणि जगात पण चांगली वाढ कंपनीने नोंदवली. 
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये विलीनीकरण केलेल्या (Discontinned) विभागातून मिळालेले उत्पन्न २२३२.१ कोटी रुपये (आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये  २३८६.१ कोटी रुपये) आणि कर, व्याज व घसारापूर्व नफा (इबीआयडीटीए) २१६.२ कोटी रुपये/९.७ टक्के (आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३८३.६ कोटी रुपये/१६.१ टक्के)
ऑर्डर्स बुक:- सध्या कंपनीच्या हातात ऑर्डर्स पुस्तकामध्ये  २३५४.८ कोटी रुपयांच्या संपूर्ण ऑर्डर्स हातात आहेत. त्यापैकी हायटेक अॅग्री इनपुट विभागाच्या ५९२.४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत, ७५७.१ कोटी प्लास्टीक विभागाच्या ऑर्डर्स व १००५.३ कोटी रुपये अॅग्रो प्रक्रिया विभागाच्या ऑर्डर्स आहेत.

(वक्तव्य) :- श्री. अनिल जैन, व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

आम्हाला ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या चौथी तिमाही आणि आर्थिक वर्षाचे आर्थिक निकाल जाहीर करतांना अतिशय आनंद होत आहे.  कंपनीने सर्व व्यवसायात उत्पन्नात भरपूर वाढ  नोंदवली आहे व नफादेखील आमच्या अपेक्षेनुसार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देखील कंपनी आपली जोरदार वाढ चालू ठेवेल अशी आमची आशा आहे. सकारात्मक ऑर्डर्समुळे आमच्या सर्व व्यवसायात कंपनी पूर्ण ताकदीने प्रयत्न करुन धाेरणांची अंमलबजावणी करेल. आम्ही वाढीचा दर साध्य करु आणि तरीही ताळेबंदावर लक्ष केंद्रित करत आहोत. कंपनीने एकत्रित चौथ्या तिमाहीच्या उत्पन्नात Y ON Y बेसिसवर २७ टक्क्यांची वाढ साध्य केली आणि ते १७४५ कोटी रुपयावर पोहोचले. (कर, व्याज व घसारापूर्व नफा मार्जिन [इबीआयडीटीए] १४.१ टक्के). तसेच कंपनीने ३१ मार्च २०२३ अखेरीस एकत्रित उत्पन्न २१.४ टक्क्यांनी वाढून ते ५७४८ कोटी रुपये नोंदवले (कर, व्याज व घसारापूर्व नफा मार्जिन [इबीआयडीटीए] १२.७ टक्के). एकत्रित निकालात कंपनीने संपूर्ण वर्षात ४५ कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलात रोख व एकल निकालात कंपनीने संपूर्ण  वर्षात ३९३.१ कोटी रुपये रोख प्रवाह (कॅश फ्लो) निर्माण केला. निव्वळ खेळत्या भाडवलाच्या चक्रात २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ६४ दिवसांची सुधारणा कंपनीने केली आहे. तसेच कंपनीने जल जीवन मिशन अंतर्गत रेट काँट्रॅक्ट करारावर महाराष्ट्रात पुरवठा सूरु केला आहे. तसेच कंपनी सातत्याने नफ्याचे मार्जिन आणि कॅश फ्लो मध्ये सुधारणा करत आहे आणि ते दीर्घ काळात आमचे लक्ष्य गाठायला मदत करेल. सध्या एकत्रित बेसिसवर कंपनीच्या हातात २३५४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत.
अनिल जैन,उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

एश्वर्य नितीन चोपडा ला वाणिज्य शाखेत ९७ टक्के

जळगाव दि.२५ – एम.जे.कॉलेजच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी (क) वाणिज्य शाखेचा विद्यार्थी एश्वर्य नितीन चोपडा हा ९७ टक्क्यांनी उत्तीर्ण झाला. त्याला अकॉउंट्स विषयात १०० पैकी १००, गणित १०० पैकी १००, माहिती तंत्रज्ञान १०० पैकी १०० गुण मिळाले. त्याची आई सौ. रेशमा (हेमलता), वडील नितीन, आजोबा मोहनलाल चोपडा यांच्यासह गुरुजन व जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, बहिण समीक्षा व गरिमा यांचे विशेष मार्गदर्शन प्राप्त झाले. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३”

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ या स्पर्धा शुक्रवार, दिनांक ०९ जून ते रविवार, दिनांक ११ जून २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा स्वरूपात घेतल्या जातील.


संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतात नाव नोंदणीची अंतिम दिनांक ०६ जून २०२३ असून संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. नाव नोंदणीसाठी व माहितीसाठी श्री किशोर सिंह मोबाईल नंबर ०९४२११२११०६. पत्ता:- कांताई सभागृह जैन स्पोर्ट्स अकॅडमी, नवीन बस स्टँड जवळ, जळगाव. यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अतुल जैन यांनी केले आहे.

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जळगाव दि.२४ जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबवर २१ धावांनी विजय मिळवत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले.

जैन इरिगेशन क्रिकेट क्लबच्या ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघ (डावीकडून) प्रशिक्षक समद फल्ला, अमित गवांदे, यश नहार, वरूण देशपांडे, मयंक पारेख सर, शशांक अत्तरदे, सुवेद पारकर, सुरज शिंदे, प्रशिक्षक अनंत तांबवेकर, व मागील रांगेत आदित्य राजन, प्रतिक यादव, शुभम शर्मा, जगदीश झोपे, सोहम पानवलकर, जय जैन, झैनीत सचदेव, कौशल तांबे, अर्थव पुजारी, रिषभ कारवा, वैभव चौगूले


कांदिवली येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीचा सामना जैन इरिगेशन विरूद्ध ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब यांच्यात रंगला. या सामन्यात जैन इरिगेशनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १६५ धावा केल्या. त्यात १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील डावखुरा खेडाळू कौशल तांबे याने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले. विजयासाठी १६६ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब ला २० षटकांत ९ बाद १४४ धावांपर्यंत मजल मारता आली. जैन इरिगेशनचा फिरकीपटू शुभम शर्मा, शशांक अत्तरदे आणि जगदीश झोपे यांनी अचूक मारा करत विजय सुकर केला. जैन इरिगेशन क्रिकेट क्लबच्या ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघात प्रशिक्षक समद फल्ला, अमित गवांदे, यश नहार, वरूण देशपांडे, मयंक पारेख सर, शशांक अत्तरदे, सुवेद पारकर, सुरज शिंदे, प्रशिक्षक अनंत तांबवेकर, आदित्य राजन, प्रतिक यादव, शुभम शर्मा, जगदीश झोपे, सोहम पानवलकर, जय जैन, झैनीत सचदेव, कौशल तांबे, अर्थव पुजारी, रिषभ कारवा, वैभव चौगूले यांचा समावेश होता.
संक्षिप्त धावफलक जैन इरिगेशन सीसी : २० षटकांत ८ बाद १६५, त्यामध्ये कौशल तांबे (२७ चेंडूंत ४४ धावा, २ चौकार, २ षटकार), सुवेद पारकर (२४ चेंडूत ३७ धावा, ५ चौकार), जय जैन २४; संतोष चव्हाण ३/२४, आदित्य राणे ३/२९) विजयी विरूद्ध ऑटोमोटिव्ह सीसी : २० षटकांत ९ बाद १४४. त्यामध्ये आदित्य शेमाडकर (२४ चेंडूंत ३७ धावा ६ चौकार, मनेश भोगले (२१ चेंडूत नाबाद ३२, चौकार १, षटकार २, सुशांत वाजे (१९ चेंडूत २७ धावा, २ चौकार, २ षटकार); शुभम शर्मा ३/१६, जगदीश झोपे २/२२, शशांक अत्तरदे २/२४)

जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या ‘समर कॅम्प-२०२३’चा समारोप

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळांडूचा केला गौरव


जळगाव दि. १५ – जैन स्पोर्टस् अॅकडमीतर्फे १६ एप्रिल ते १४ मे दरम्यान ‘समर कॅम्प-२०२३’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप समारंभ विद्या इंग्लीश मिडीअम स्कूलच्यामागे असलेल्या क्रीडांगणावर झाला. यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा क्रीडा साहित्य व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधिक्षक व्ही. एन. तायडे, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव नंदलाल गादिया, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. अश्विन झाला, जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते.

उन्हाळी प्रशिक्षणाचा आढावा मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल यांनी सांगितला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले. आभार अजित घारगे यांनी मानले. बॅडमेंटनचे सहप्रशिक्षक गीता पंडीत यांनी मनोगत व्यक्त केले. खेळाडूंना शुभेच्छा देताना नंदलाल गादिया यांनी जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबीर हे शारिरीक, मानसिक आरोग्य सांभाळत पाल्यांचा सर्वांगिण विकास करणारे ठरले. यातूनच राज्य, राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू आपला विकास करून शकतात. खेळ, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी श्री. अशोक जैन, श्री. अतुल जैन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याने त्यांचेही आभार नंदलाल गादिया यांनी मानले. डॉ. अश्विन झाला यांनी जैन स्पोर्टस् अॅकडमी विविध क्रीडा प्रकारांत हे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि आरोग्यासंबधी जागृतता आणत असून यातूनच राष्ट्रनिर्माणाचे कार्य घडत आहे. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य देबासिस दास यांनी व्यक्त केले. जळगावसारख्या शहरात श्री. अतुल जैन यांच्यासारख्या क्रीडाप्रेमीमुळे अनुभूती निवासी स्कूल येथे खेळासाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे खेळाकडे विद्यार्थी करिअरच्यादृष्टीने बघत असल्याचेही देबासिस दास म्हणाले.

जैन स्पोर्टस अॅकडमीतर्फे केवळ उन्हाळी शिबीरार्थींचा नव्हे तर विविध क्रीडाप्रकारांमध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक व खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यामध्ये निलम घोडगे, अभिजीत त्रिपणकर, वाल्मिक पाटील, कांचन चौधरी, अजित घारगे, पुष्पक महाजन, प्रविण ठाकरे, शुभम शर्मा, तनेश जैन, किशोरसिंग सिसोदिया, शशांक अत्तरदे, ओम मुंढे, शुभम पाटील, योगेश्वरी धोंगडे, मनिषा हटकर, क्रिष्णा हटकर, प्रणव भोई, निलेश पाटील, श्रेयांक खेकरे, सरीपट्टा घेटे, निकेतन खोडके, रोहन अवधूत, महिमा पाटील, शितील रूढे, निशा अवधूत, तेजस्वीनी श्रीखंडे, सायली कुलकर्णी, रिषभ कारवा, सिद्धेश देशमूख, नचिकेत ठाकूर, तुलजेस पाटील, तन्वीर अहमद, सोनल हटकर, साक्षी पाटील, गौरी साळूंखे, आयशा साजीद खान, मिताली पाठक, फरहीन खान, पुष्करणी भट्टड, वरूण देशपांडे, घनशाम चौधरी, राहुल निभोंरे, उदय सोनवणे, पंकज पवार, योगेश धोंगडे, अनिल मुंढे, रहिम खान, निलम अन्सारी, सय्यद मोहसीन यांचा समावेश होता. दरम्यान जैन स्पोर्टस् अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्वाच्च समितीत निवडून आल्याने त्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

उन्हाळी प्रशिक्षण शिबीरामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या सर्व खेळाडूंचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये बुद्धिबळसाठी सुजल चौधरी, श्लोक वारके, क्षितीज वारके, तायक्वांदोसाठी दानिश तडवी, निकिता पवार, पुष्कप महाजन, बास्केटबॉलसाठी प्रियांशू जाधवानी, चिन्मय सूर्यवंशी, विरेंद विसररानी, उमंग बेंडवाल, सोहम पाटील, पूर्वा हटकर, फुटबॉलसाठी निव जेलवाणी, हुझेर देशमुख, अर्थव राठोड, दुर्वेश देवरे, रशिद शेख, बॅडमेंटनसाठी आर्या गोला, शौनक माहेश्वरी, ईशांत साळी, पुनम ठाकूर, डॉ. हर्षदा पाटील, अमोघ बाविस्कर, श्रीनिवास पाटील, हर्द झाला, अद्विती पाटील, क्रिकेटसाठी श्रेयस नारजोगे, केतन जैन, आरव यादव, अनय चतुर्वेदी, शेख अब्दुला शेख जावेद, एकता दहाळ, दक्ष ओटोळे, गौरव ठाकूर यांचा समावेश होता. यात वेद पटेल हा सर्वात्कृष्ट शिबीरार्थी ठरला त्याला क्रिकेटचे संपूर्ण किट देऊन सन्मानित करण्यात आले.

शिबीर यशस्वीतेसाठी श्री. अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, सुयश बुरकूल, मुश्ताक अली, वरूण देशपांडे, राहुल निभोंरे, घनशाम चौधरी, उदय सोनवणे यांनी सहकार्य केले.

अनुभूती निवासी स्कूलचा यंदाही 100 टक्के निकाल

सीआयएससीई बोर्डच्या 12 वी व 10 वी च्या परिक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगाव दि.14 – दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससी व इयत्ता 10 वी आयसीएसईचा निकाल जाहिर झाला. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोळा वर्षापासून 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली. अनुभूती स्कूलमधून 12 वीच्या काॕमर्स Commerce शाखेतून हेमंत अग्रवाल 93.25 टक्के तर विज्ञान शाखेतून प्रियम संघवी 89 टक्के गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. तर इयत्ता दहावीत मती भंडारी ही 92.80 टक्के गुणांसह प्रथम आली. पहल अग्रवाल ही विद्यार्थीनी 92.40 टक्क्यांसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत.
अनुभूती निवासी स्कूलमधून दहावीसाठी 30 तर बारावीसाठी 18 विद्यार्थी परिक्षेत सहभागी झाले होते. अनुभूती स्कूलला एज्युकेशन वर्ल्ड दिल्ली व एज्युकेशन टुडे बेंगलूर या देशातील शिक्षण क्षेत्रात नामांकित रेटिंग एजन्सींनी यावर्षी महाराष्ट्रातून पहिला क्रमांक तर संपूर्ण भारतामध्ये अग्रस्थानी नामांकित केले आहे.

Mati Bhandari 92.80$
Hemant Agrawal 93.825% Topper in Commerce
Priyam Sanghvi 89 % Topper in Science


संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावी, एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील एकमेव शाळा आहे. सामाजिक जाणिवेसह संवेदनशील नागरीक घडावे यासाठी विद्यार्थ्यांवर शाळेत पाचवी पासूनच विशेष लक्ष दिले जाते. शालेय अभ्यासक्रमाच्या शिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना उद्योजक संस्कार दिले जाते. यासाठी जागतिक पातळीवरच्या विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांना नव दिशा मिळावी यासाठी वर्षभर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नियोजन अनुभूती निवासी स्कूलतर्फे केले जाते. अनुभूती स्कूलचे विद्यार्थी पुढील शिक्षणानंतर निवडलेल्या क्षेत्रांमध्ये उत्तमरित्या आपले योगदान देत आहे. हेच अनुभूती स्कूलच्या यशाचे गमक असून विविध क्षेत्रात विद्यार्थी यश संपादित करीत आहे.
ग्रीनस्कूल म्हणून ख्याती असलेल्या या स्कूलमध्ये वर्षभर विद्यार्थ्यांसाठी विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जातात. अनुभूती स्कूलमध्ये विद्यार्थ्यांवरील व्यक्तिगत लक्ष, प्रशस्त ग्रंथालय, तज्ज्ञ शिक्षकांसह विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्याकडून अभ्यासाबरोबरच छंद जोपासले जातात. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होते. वर्षभर शिक्षक व शिक्षकतेतर सहकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले. अनुभूती स्कूलच्या संचालक मंडळातील श्री. अशोक जैन, श्री. अतुल जैन, सौ. निशा अनिल जैन व प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

Anubhuti School’s ISC 2023 Class 12 Topper’s Name, Photo and Percentage
1) Hemant Agrawal 93.825% Topper in Commerce
2) Priyam Sanghvi 89 % Topper in Science

Anubhuti School’s ISC 2023 Class 10 Topper’s Name
1) Mati Bhandari 92.80$

जॉईन Trading Buzz
Exit mobile version