गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन

जळगाव दि.२८ प्रतिनिधी  –  गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही व यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे रु. ७५००/-, ५०००/-, ३०००/- आणि  १५००/- ची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.

जळगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील शाळांसाठी गांधी तीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा बुधवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कांताई सभागृहात होईल. स्पर्धा संपल्यानंतर तेथेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांसह यशस्वी शाळांना रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शाळांनी भाग घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले, असून त्यासाठी दि.३० सप्टेंबर पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सुधीर पाटील (९८२३०६२३३०) किंवा गिरीश कुळकर्णी यांच्याशी (९८२३३३४०८४) संपर्क साधावा असे प्रसिद्धी  पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

इनरव्हील क्लब जळगावच्या महिलांना मार्गदर्शन,एचआयव्हीग्रस्त महिलेला शिलाई मशिन वाटप

जळगाव दि.26 प्रतिनिधी – महिलांनी आपल्यातील शक्ती ओळखून, आपल्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत. घर, परिवार आणि सामाजिक स्तरावर सकारात्मकरित्या पुढे येऊन सर्व विचारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्या विचारांतून दीन, दुबळ्यांसह गरजवंतांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम इनरव्हीलच्या माध्यमातून करता येत आहे, त्यासाठी जळगाव इनरव्हील क्लबच्या माध्यमातून उषा जैन व टिम प्रयत्न करत असल्याचा आनंद आहे. सध्या समाजात अस्वस्थता असून सामाजिकस्तरावर अस्वस्थता आहे ही भरकटेलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये आहे. इनरव्हिल क्लबच्या विशिष्ट प्रक्रियेतून विधायक कार्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा व आपल्या संस्कृतीचे संवर्धन करावे असे आवाहन डिस्ट्रीक चेअरमन जयश्री पोफळे यांनी केले.
रोटरी क्लबच्या गणपती नगर येथील हॉलमध्ये झालेल्या ऑफीशल चेअरमन व्हिजीटप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर डिस्ट्रीक्ट ट्रेजरर प्रिती दोशी, जळगाव इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट उषा जैन, सचिव निशिता रंगलानी, ट्रेझरर गुंजन कांकरिया, पीडीसी नुतन कुंक्कड, पीएटी मिनील लाठी, सीसी रंजन शहा उपस्थित होते.
दीपप्रज्ज्वलनाद्वारे कार्यक्रमाची सुरवात झाली. डॉ. मयुरी पवार यांनी भगवती स्तुती म्हटली. अर्चना लोंढे यांनी कुण्या गावाचं आलं पाखरु.. या गीतावर वेलकम डान्स  सादर केला. साधना गांधी यांनी परिचय करुन दिला. गुंजन कांकरिया यांनी हिशोबाचा लेखाजोखा मांडला. निशीता रंगलानी यांनी इनरव्हील क्लब ने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्ष उषा जैन यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा सांगत भविष्यातील प्रोजेक्ट विषयी क्लबमधील महिला सदस्यांना माहिती दिली. महिला सुरक्षेतेसह, सायबर क्राईम, सोशल माध्यामांसह मोबाईल टिव्हीचा वाढलेला अतिरेक वापर, यामुळे महिलांसह मुलांच्या मानसिक संतुलनावर होणार परिणाम, गुड टच ब्याड टच याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. पदवी ला असलेल्या मुकबधिर मुलीला विशेष शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच एचआयव्हीग्रस्त महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने शिलाई मशिनचेही वाटप करण्यात आले. डॉ. मयूरी पवार यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी सहकार्य केले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुशताक अली पंच

जळगाव दि.२५ प्रतिनिधी –  जैन इरगेशन सिस्टीम्स लि. च्या स्पोर्ट्स विभागातील प्रशिक्षक मुशताक अली हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंच परीक्षेत यशस्वी होऊन महाराष्ट्राच्या अधिकृत पंचांच्या यादीत त्यांनी स्थान पटकावले आहे.

क्रिकेट खेळाडू ते क्रिकेट प्रशिक्षक व आता क्रिकेटचे अधिकृत पंच हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मुशताक अली हे आता जिल्ह्यातील चौथे अधिकृत पंच ठरले आहेत. त्यांच्या या यशस्वी कामगिरी बद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे सहसचिव अविनाश लाठी, जळगावचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिशनच्या पंच समितीचे सदस्य संदीप गांगुर्डे यांच्यासह जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे कौतूक केले आहे.

‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

जळगाव दि.२४ प्रतिनिधी – बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरांची तसेच लोककलांविषयी जागृती व्हावी. लहान मुलामुलींपर्यंत या लोक कला पोहोचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात ७८० बालकलावंतांनी आपल्या कलांचे दि.२२ सप्टेंबरला सादरीकरण केले.

यात अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली छाप सोडली. समूह नृत्य स्पर्धेत प्रथम विजयी झाले त्यांना ११ हजाराचे रोख पारितोषक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. समुह गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला यासाठी सात हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. एकल लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झाले. ३ हजार व चषकाने गौरविण्यात आले. एकल लोक गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक दोन हजार रोख व चषकाने सन्मानित करण्यात आले. यासह वैयक्तिक नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले त्यांना ५०० रुपये रोख व चषक असे पारितोषिक प्रदान करण्यात आले. समूह लोकगीत व समूह लोकनृत्याच्या सादरीकरणात एकूण २७ शाळांनी सहभाग घेतला होता. पारितोषिक वितरणाप्रसंगी आमदार सुरेभ भोळे, जैन इरिगेशनचे अनिल जोशी, मृदंग अॅड्सचे अनंत भोळे, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष-प्रशासन हनुमान सुरवसे, उपाध्यक्ष-उपक्रम अमोल ठाकूर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. विनोद ढगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनुभूती स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन यांच्यासह प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले. ज्ञानेश्वर सोनवणे, भूषण खैरनार यांच्यासह अनुभूती स्कूलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत.

भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती – अतुल जैन

भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती असल्याची प्रतिक्रिया जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी दिली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचा नेत्रदीपक विजय हा देशासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. दोन्ही संघांनी – पुरुष आणि महिला – अत्यंत चांगली कामगिरी केली. भारतीय बुद्धिबळपटूंनी आपली प्रतिभा तर सिद्ध केलीच, पण मानसिक कणखरपणा आणि सांघिक कार्यातून हे सिद्ध केले की भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती बनला आहे.
पुरुष संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी सातत्याने प्रत्येक सामना अचूक रणनीती आणि एकाग्रतेने हाताळला. त्याच्या अनेक खेळांमधील निर्णायक चाली पाहून संपूर्ण जगाने त्याच्या कौशल्याचे कौतुक केले. महिला संघानेही दमदार खेळाचे प्रदर्शन केले आणि कठीण परिस्थितीतही धीर सोडला नाही. त्याच्या खेळात संयम आणि जिद्द दिसून आली.
या दोन भारतीय संघांच्या विजयावरून देशातील बुद्धिबळाची पातळी सातत्याने वाढत असून, भारतीय खेळाडूंमध्ये विश्वविजेते बनण्याची क्षमता असल्याचे दिसून येते. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील ही कामगिरी येणाऱ्या पिढीलाही प्रेरणादायी ठरेल.
भारतीय खेळाडू जागतिक शतरंज ऑलिंपियाड, ग्रँडमास्टर स्पर्धा, आणि इतर प्रमुख स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आजपर्यंत कधी नव्हे एवढ्या अधिक संख्येने युवा खेळाडूंनी यश संपादित केले आहे. विशेष म्हणजे पुरुष(ओपन) व महिला या दोन्ही गटांत भारताने एकाच वेळी पहिल्यांदाच विजयी सुवर्ण पदक प्राप्त करुन भारताचे वाश्विक स्तरावर वर्चस्व प्राप्त केले आहे. आणि या दृष्टीने त्यांना “गोल्डन जनरेशन”म्हणता येईल
चेस किंवा शतरंज हा मूळ भारतीय खेळ आहे, आणि त्याची उत्पत्ती भारतात प्राचीन काळात झाली. शतरंजचे मूळ रूप संस्कृतमध्ये “चतुरंग” म्हणून ओळखले जात असे
सध्याची भारतीय युवा खेळाडूंची पिढी अत्यंत प्रतिभाशाली आहे.अर्जुन एरिगैसी,डी गुकेश, प्रज्ञाननंदा, विदित गुजराथी, दिव्या देशमुख, टी.आर. वैशाली सारखे खेळाडू जागतिक स्तरावर यशस्वी होत आहेत, ज्यामुळे भारतीय शतरंजचे भविष्य उज्ज्वल आहे. सर्व विजयी खेळाडू,कर्णधार, प्रशिक्षकांचे, AICF चे पदाधिकारी या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। अतुल जैन अध्यक्ष, जळगाव जिल्हा चेस एसोसिएशन

भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – अशोक जैन

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने साधलेले अपूर्व यश भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला असल्याची प्रतिक्रिया जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनीं दिली आहे. आपल्या खेळाडूंनी दाखवलेली परिपूर्ण खेळतंत्र, मानसिक सबलता, आणि जिद्द यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा उज्वल झाले आहे. अथक परिश्रम आणि ध्येयाशी असलेल्या निष्ठेमुळेच आपण आज हे यश प्राप्त केले आहे. या विजयामागे केवळ खेळाडूंचा नाही, तर प्रशिक्षक, व्यवस्थापक, संघाचे पदाधिकारी, आणि खेळाच्या प्रत्येक टप्प्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. संघाच्या या संघटित प्रयत्नांमुळेच आपल्याला हा सन्मान मिळाला आहे.

हा विजय केवळ एका स्पर्धेचा नाही, तर भारतीय बुद्धिबळाच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या यशाने नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, आणि देशभरात बुद्धिबळ खेळाच्या लोकप्रियतेत नक्कीच वाढ होईल. या विजयामुळे भारत बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर एक अग्रगण्य शक्ती बनत आहे, आणि हे यश आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
चेस ऑलिंपियाड मधील सर्व सहभागी प्रतिभाशाली खेळाडू अर्जुन एरीगैसी, डी गुकेश,आर प्रगनानन्धा, विदित गुजराथी, हरीकृष्ण पेंटाला व महिला गटातील खेळाडू हरीका द्रोणावल्ली, आर वैशाली, तानिया सचदेव, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल यांनी जागतिक स्तरावर यश प्राप्त केले यामुळे भारतीय शतरंजचे भविष्य उज्ज्वल आहे.या सर्व विजेत्या खेळाडूंचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन. चेस ऑलिम्पियाडचे कप्तान म्हणून ग्रैंड मास्टर अभिजीत कुंटे आपले नेतृत्व अद्वितीय आहे. आपल्या मार्गदर्शनात भारतीय टीमने अनेक महत्त्वाच्या यशांचे शिखर गाठले आहे. आपली रणनीती, समर्पण आणि प्रेरणा खेळाडूना नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करते. आपल्या कामगिरीसाठी आपल्याला मनःपूर्वक अभिनंदन!
विशेष म्हणजे चेस ऑलिम्पियाड विजेता  *विदित गुजराथी* ला शतरंज प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात सहकार्य करण्याची संधी *जैन इरिगेशन* ला मिळाली, याचा आम्हाला अभिमान आहे. आज त्याच्या यशस्वी घोडदौडीला पाहून हृदयभरून येतं, आणि त्याच्या प्रगतीने आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. त्याची मेहनत, समर्पण आणि यश खरोखरच प्रेरणादायी आहे.”
  1. आमच्या सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना, आणि संपूर्ण संघाला हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांचे हे फलित असून, भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आपल्या संघाच्या उज्ज्वल वाटचालीसाठी अशाच उंच भरारीची आणि यशस्वी भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! अशोक जैन सल्लागार समिती सदस्य,
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF)

जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात

 जळगाव दि.२३ (प्रतिनिधी)– जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनुभूती स्कूल द्वारे सहआयोजित जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ मधील १४, १७ आणि १९ वर्षाआतील गटामधील मुलं व मुलींची बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्यात. अनुभूती निवासी स्कूल येथील बॅडमिंटन हॉल येथे १९ ते २१  सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा झाली.

या स्पर्धेत शहरातील शाळांमधील १४, १७, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या २० संघांचा समावेश होता. या स्पर्धेत ५० संघांचे २५० खेळाडूंचा सहभाग नोंदविला. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लि. तर्फे क्रमश: गोल्ड, सिल्वर आणि कास्य पदक पारितोषिक म्हणून देण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन  जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडासमन्वयक रवींद्र धर्माधिकारी, अनुभूती निवासी स्कूल शाळेचे व्यवस्थापक विक्रांत जाधव, भिकन खंबायत, जैन स्पोर्ट्स अॅकडमी फुटबॉलचे प्रशिक्षक श्री मोहसीन व मुख्य पंच दीपिका ठाकूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित गोल्ड, सिल्वर आणि कास्य पदक देण्यात आले. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले.

स्पर्धेचा निकाल

१४ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय क्रमांक –  पोदार इंटरनेशनल स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल

१४ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – महाराणा प्रताप हायस्कूल, द्वितीय क्रमांक –  सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट लॉरेन्स कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल

१७ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – ओरियन स्कूल (स्टेट बोर्ड), द्वितीय क्रमांक – एम. जे. कॉलेज, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल

१७ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय क्रमांक –  सेंट लॉरेन्स कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल

१९ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, द्वितीय क्रमांक – एम. जे. कॉलेज, तृतीय क्रमांक – बबन बाहेती महाविद्यालय

१९ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – एम. जे. कॉलेज, द्वितीय क्रमांक –  सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – नूतन मराठा महाविद्यालय

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून दीपिका ठाकूर व पंच म्हणून नमन जैन, ईशांत साळी, रजत पटेल, फाल्गुन पाटील, शांतनू फालक, संस्कार, अंकित कोळी, देवेंद्र कोळी, अनामय जोशी, फाल्गुनी पवार, तेजश्री शुक्ल, हमजा खान, मिहिर कुलकर्णी, रीत नाथांनी, शुभम चांदसरकर, करण पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किशोरसिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनात विकास बारी, शुभम पाटील, पूनम ठाकूर, राखी ठाकूर, जाझीब शेख, मशरुख शेख यांनी परिश्रम घेतले. सहप्रशिक्षक दिपिका ठाकुर यांनी आभार मानले.

रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

जळगाव दि.२० प्रतिनिधी – तालुक्यातील रामदेववाडी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल आणि इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. प्राथमिक शाळा रामदेववाडी तांडा येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. यात 120 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

या शिबिरात विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी रोटरी रॉयलचे अध्यक्षा डॉ. वर्षा रंगलानी यांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी, ब्रश कसा करावा आणि दातांच्या आरोग्यासाठी पोषक आहार कसा असावा या संदर्भात मार्गदर्शन केले. ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत सांगितले. डॉ. नितीन  विसपूते यांनी व्यसनांचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. तंबाखू, गुटखा, सुपारी यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. डॉ. बिंदू छाबडा यांनी विद्यार्थ्यांना हाताधुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.

रोटरी क्लब रॉयल यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना ब्रश आणि बिस्कीट वाटप केले.  डॉ. जयदिपसिंग छाबडा, नितीन मंधान, पिंकी मंधान, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. निशा तलरेजा, आणि सिमा मुलानी यांनी दंत चिकित्सक शिबिरासाठी सेवा दिली. ज्यांना दंतचिकित्सक विषयी समस्या होत्या, त्यांना पुढील उपचारासाठी टोकन देण्यात आले आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक विक्रम अस्वार हे मौखीक आरोग्याच्या दृष्टाने समस्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत माहिती पोहचविणार आहे.  प्रशांत सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. जि.प. शाळेच्या शिक्षिका रत्नप्रभा वाणी, कल्पना सपकाळे, हर्षा तायडे, पुनम बागुल यांनी शिबिराच्या व्यवस्थापनासाठी परिश्रम घेतले.

शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात करार

जळगाव, ता. १२ : जम्मू-काश्मीर प्रांतातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ‘हायटेक’ तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधी जळगावची जैन इरिगेशन कंपनी आणि जम्मू-काश्मीर मधील ‘शेर- ए-काश्मिर कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विद्यापीठ’ यांच्यात सहकार्याचा करार झाला आहे. जळगावच्या जैन हिल्सवर १० सप्टेंबर रोजी झालेल्या या करारावर कंपनीतर्फे सह- व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी तर विद्यापीठातर्फे कुलगुरू प्रा.नझीर अहमद गनाई यांनी सह्या केल्या आहेत.
आधुनिक पद्धती व तंत्र वापरून विविध पिकांचे उत्कृष्टरितीने उत्पादन कसे घ्यायचे, जागतिक तापमान वाढ व हवामान बदल या समस्यांचा प्रभावीपणे सामना कसा करायचा आणि आवश्यक तेवढीच संसाधने वापरून उत्पादन व उत्पादकता कशी वाढवायची यासंबंधीचे मार्गदर्शन करण्याबरोबरच जैन कंपनीने जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना ऊतीसंवर्धन (टिश्यूकल्चर) व जैव तंत्रज्ञानाचा (बायोटेक्नॉलॉजी) वापर करून तयार केलेले उत्कृष्ट प्रतीचे, उच्च दर्ज्याचे, रोगविरहीत व व्हायरसमुक्त लागवडीचे साहित्य पुरवायचे आहे. तसेच शेती क्षेत्रातील शाश्वतता कायम राखण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचे आधुनिक तंत्रज्ञान व त्यासाठी वापरली जाणारी साधने आणि जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना आज भेडसावत असलेल्या समस्यांची कायमस्वरूपी सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जैन कंपनीने मार्गदर्शन करावयाचे आहे. तसे करारात नमूद केले आहे.
याप्रसंगी बोलताना जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नझीर अहमद गनाई म्हणाले की, “सफरचंद, केशर आणि काळेजिरे या पिकांच्या संशोधन व उत्पादन वाढीसंबंधी जैन इरिगेशनने आम्हांला मार्गदर्शन करावे अशी आमची अपेक्षा आहे.
सफरचंदाची जम्मू-काश्मीरची उत्पादकता हेक्टरी १० टनाची, हिमाचलची ८ ते ९ टनाची तर पश्चिमात्य देशांची ६७ टनांची आहे. आपली उत्पादकता कमी असल्याने उत्पादन खर्च वाढतो व निर्यातीला मर्यादा येतात. जैन कंपनीशी करार केल्यामुळे जे आधुनिक संशोधन व तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धती उपलब्ध होणार आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यामुळे निश्चितच उत्पादन व उत्पादकतेत वाढ होईल, पाणी वापरात बचत होईल आणि विभागातील अन्नधान्य सुरक्षिततेला त्यामुळे हातभार लागून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल.”

या सहकार्य करारावरती भाष्य करताना कंपनीचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री. अजित जैन म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या उन्नती व प्रगतीसाठी होत असलेल्या या कराराचा आम्हांला अभिमान आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे परमपूज्य पिताजी भवरलाल जैन यांनी आयुष्यभर सर्वसामान्य, गोरगरीब व छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून त्या दिशेने संशोधन व तंत्रज्ञान विकसीत केले. ते आज देशभरातील सर्व शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरत आहे. सिंचनासाठी लागणाऱ्या उत्कृष्ट दर्ज्याच्या साहित्याबरोबरच स्वच्छ, शुद्ध व रोगमुक्त दर्जेदार रोपे-कलमे व लागवडीचे अन्य साहित्य आणि अचूक व परिपूर्ण शेतीसाठी (प्रिसीजन फार्मिंगसाठी) लागणारे तंत्रज्ञान आम्ही कृषी विद्यापीठ व शेतकऱ्यांना पुरविणार आहोत. त्यामुळे त्या प्रांतातील कमीत कमी संसाधनांचा वापर होऊन अधिकाधिक उत्पादन शाश्वतरितीने वाढू शकेल.”

“सहकार्य कराराचा एक भाग म्हणून कृषी विद्यापीठातील विद्यार्थी व जम्मू- काश्मीरमधील शेतकऱ्यांना जळगाव येथे बोलावून प्रशिक्षण देण्यात येईल. विविध विषयांचे ८ ते १५ दिवसांचे कोर्सेस त्यांच्यासाठी चालविण्यात येतील. तसेच जैन इरिगेशनमधील
अनुभवी व तज्ज्ञ लोक जम्मू-काश्मीर विद्यापीठात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना अध्यापनाद्वारे मार्गदर्शन करतील”, असेही श्री. अजित जैन म्हणाले. ठिबक सिंचनावर भाताचे पीक घेण्याचा प्रयोग मागील वीस वर्षांपासून आम्ही जळगाव व अन्य ठिकाणी राबवित आहोत. हा प्रयोग जम्मू-काश्मीरमध्येही राबवावा. त्यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू, असेही श्री. जैन यांनी कुलगुरुंना सांगितले.

जळगाव नागरिक मंचच्या वतीने अशोक जैन यांनी दिले राज्यपालांना निवेदन

जळगाव : जळगाव येथे दीड दिवसांच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी शहरातील विविध क्षेत्रांतील २०० वर मान्यवर नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी सुद्धा संधी मिळाल्याने जळगावच्या विकासाशी संबंधित अनेक विषयांच्या मागण्या राज्यपालांकडे केल्या. अजिंठा विश्रामगृहावर राज्यपाल नागरिकांना भेटले. याच दरम्यान जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी राज्यपालांची विशेष भेट घेतली.
अशोक जैन यांनी जळगाव नागरिक मंचच्या वतीने   राज्यपालांना निवेदन सादर करीत त्यात मागणी केली की, पुणे – अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा ग्रीनफील्ड इकॉनोमिक कॉरिडोर प्रकल्पात जळगावचा समावेश करावा. हा प्रकल्प जळगाकडे विस्तारला तर दौलताबाद, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, अजिंठा लेणी, गांधीतीर्थ सुद्धा जागतिक पर्यटनाशी जोडले जातील. ग्रीनफील्ड कॅरिडाॅरमुळे जळगाव शहर व जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, शेती उत्पादने, पर्यटन, हाॅटेल्स, ट्रॅव्हल्स अशा व्यवसायांना मोठा आर्थिक लाभ होऊन रोजगार वाढू शकेल. ही बाब अशोक जैन यांनी राज्यपालांकडे स्पष्ट केली. राज्यपालांनी निवेदन स्वीकारून त्याचा पाठपुरावा केंद्रीय मंत्रालयाकडे करणार असे आश्वासन दिले. यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित होते. दरम्यान याच कॅरिडाॅरची मागणी ‘क्रेडाई’ चे पदाधिकारी तथा विकासक अनीषभाई शहा यांनीही केली.
जॉईन Trading Buzz
Exit mobile version