नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी दिला धक्का, शेअर बाजारातून काढले ₹5900 कोटी – जाणून घ्या काय होते कारण 

जगातील अनेक देशांमध्ये कोविड संसर्गाची वाढती प्रकरणे आणि अमेरिकेतील मंदीच्या चिंतेमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) भारतीय शेअर बाजारातून 5,900 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या काही आठवड्यांपासून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) भारतीय बाजारांबाबत सावध दृष्टिकोन स्वीकारला आहे. 

 

भाव पुढे कसा 

कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी संशोधन (किरकोळ) प्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले की, सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीच्या चिंतेव्यतिरिक्त, जागतिक स्तरावर उच्च व्याजदर आणि कंपन्यांच्या कमजोर तिसऱ्या तिमाही निकालांच्या शक्यतांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे. डिपॉझिटरी डेटानुसार, 2 ते 6 जानेवारी दरम्यान विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 5,872 कोटी रुपये काढले आहेत. 

  

गेल्या वर्षीही जोरदार विक्री झाली 

खरं तर, FPIs गेल्या 11 सलग ट्रेडिंग सत्रांपासून विक्री करत आहेत. यादरम्यान त्यांनी 14,300 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. यापूर्वी, एफपीआयने डिसेंबरमध्ये 11,119 कोटी रुपयांच्या समभागांमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये 36,239 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. एकूणच, गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये, FPI ने भारतीय शेअर बाजारातून निव्वळ 1.21 लाख कोटी रुपये काढले आहेत. 

  

FPIs विकण्याचे कारण 

यूएस फेडरल रिझर्व्ह आणि इतर मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात केलेली आक्रमक वाढ, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतार, सोन्या-चांदीच्या उच्च किमती आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे गेल्या वर्षी एफपीआयची जोरदार विक्री झाली. मॉर्निंगस्टार इंडियाचे सहयोगी संचालक व्यवस्थापक संशोधन हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की, जगाच्या काही भागात कोविड संसर्गाचा पुन्हा प्रसार आणि अमेरिकेतील मंदीच्या चिंतेमुळे FPIs भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांपासून दूर राहत आहेत. 

  

इतर बाजारपेठांचे काय? 

या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, स्टॉक व्यतिरिक्त, FPIs ने कर्ज बाजारातून 1,240 कोटी रुपये काढले आहेत. भारताव्यतिरिक्त तैवान आणि इंडोनेशियाच्या बाजारातही एफपीआयचा प्रवाह नकारात्मक राहिला आहे. तथापि, फिलिपाइन्स, दक्षिण कोरिया आणि थायलंडच्या बाजारात त्यांचा प्रवाह सकारात्मक आहे. 

स्वानुभवातून शिक्षण म्हणजे उद्योजकीय संस्कार- अथांग जैन

जळगाव दि. 29 – “स्वानुभवातून काही उत्तम करता करता शिकत जावे ते असे शिकावे की आपण नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनण्याचे गुण स्वतःमध्ये विकसित करू शकतो. श्रद्धेय दादाजींनी (भवरलालजी जैन यांनी) या अनुभूती स्कूलची स्थापनाच ‘Enlightened Entrepreneurship’ ह्या प्रमुख उद्दिष्टावर केलेली आहे. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला इतक्या चांगल्या शाळेत उद्योजकीय संस्कार मिळत आहेत, त्यादृष्टीने शिकायला मिळत आहे.” असे मोलाचे विचार व्यक्त केले जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे संचालक अथांग जैन यांनी. अनुभूती निवासी स्कूलच्या कॉमर्स वीक म्हणजेच ‘अर्थानुभूती’ च्या  उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास व शिक्षकगण स्वागत रथ, अशोक महाजन, प्रदीप्तो चॅटर्जी व्यासपीठावर उपस्थित होते. 29 ते 31 डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकवून जाणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थी स्वतःहून हिरीरीने भाग घेत असतात हे विशेष.  

उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यां समोर बोलताना अथांग जैन म्हणाले की, फाउंडर्स डे आणि कॉमर्स वीक या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग असतो. प्रत्येक जण आपापल्या कौशल्याचा, हुशारीचा उपयोग करीत असतो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सर्व समावेशकता यावी यासाठी हे करणे खूप मोलाचे आहे. वेगवेगळ्या नावीण्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्यात विद्यार्थी गुंतलेला असतो व तो जे करतो ते उत्तमच करत असतो हे भविष्यातील करियर किंवा जीवनासाठी मोलाचे आहे असे सांगून कॉमर्स वीक च्या ‘मॅनेजिंग फॉर सस्टॅनिबीलिटी…’ ही बॅकड्रॉपची संकल्पना, तीन दिवसांमध्ये आखलेले कार्यक्रम उत्तमच आहेत असे कौतुक त्यांनी केले. पृथ्वीला, पर्यावरणाला वाचवायचे असेल तर शासनाबरोबर व्यक्तींनी देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे. जी कंपनी पर्यावरण संरक्षणाचे काम करते त्या कंपनीचे उत्पादने नागरिकांनी घेतले तर पर्यावरण संरक्षणात त्यांचाही अप्रत्यक्ष हातभार लागेल हा महत्त्वाचा विचार अथांग जैन यांनी उपस्थितांसमोर मांडला. 

30 डिसेंबरला ‘नुक्कड’ पथनाट्य 

30 डिसेंबर रोजी विद्यार्थी निसर्ग, पाणी इत्यादी बाबत नुक्कड पथनाट्य सादर करणार आहेत. तीन पाण्याचे रंग हिरवा म्हणजे शेतीसाठी, काळे म्हणजे गोरगरीब आणि लाल म्हणजे महिला सशक्तीकरण इत्यादी विषय घेऊन विद्यार्थी मोठ्या कल्पकतेने सादरीकरण करणार आहेत. वाणिज्य दृष्टीकोन ठेऊन प्रत्येक सादरीकरण होणार आहे हा मुख्य धागा याचा असेल. नुक्कड पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थी काही सकारात्मक संदेश देणार आहेत. 

31 रोजी अर्थानुभूती म्हणजेच कॉमर्स वीकचा समारोप 

सुरू असलेल्या अऩुभूती कॉमर्स वीकचे दि. 31 डिसेंबर रोजी समापन होणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या अंगी विक्री कौशल्य यावे यासाठी खास ‘ट्रेडिंग’ दालन म्हणजे स्टॉल मांडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे विक्री कौशल्य त्यातून विविध वस्तू ते विकतील. सेल्समनशीप हा प्रात्यक्षिक विषय देखील विद्यार्थ्यांना अनुभवता येईल. या संपूर्ण इव्हेंटचे व्यवस्थापन विद्यार्थीच करत असतात. 

 

जैन इरिगेशनचा ‘बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्ड’ने गौरव त्रीची येथे केळी निर्यातीवर राष्ट्रीय कार्यशाळा

 दि२२ डिसेंबर २०२२ (प्रतिनिधी)- राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्यावतीने भौगोलिक निदेशांक प्राप्त केळीची निर्यात आव्हाने संधी व भविष्यातील वाटचाल‘ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहेदि२१ डिसेंबर रोजी अपेडाचे चेअरमन डाॅअनगामुथू (आयएएसयांच्या हस्ते उद्घाटन झालेउद्घाटनपर संबोधन करताना डाॅअनगामुथु म्हणाले कीशंभर वर्षांपू्र्वी दअमेरिकेत तेथील कंपन्यांनी केळी निर्यात सुरु केलीआज आशिया खंडात ८० टक्के व लॅटीन अमेरिकेत २० टक्के केळी होतेआपल्याला मागे वळून बघण्याची गरज आहे आणि जगातील चौथ्या महत्त्वाच्या पिकाबद्दल तंत्रज्ञानाची जोड देऊन काम होणे गरजेचे आहेआपण गतवर्षी ३.४ लाख टन केळी निर्यात केली पण आपण कुठे कमी पडत आहोत याचा अभ्यास करुन काम केल्यास टिश्यूकल्चरपॅकींग तंत्रज्ञानलागवड तंत्रज्ञान यावर लक्ष देणे गरजेचे आहेसाधारण सामुग्रीचा उपयोग करुन भौगोलिक निर्देशांकीत केळीच्या जातींना युरोप व आखाती देशात प्रमोट करणे गरजेचे आहेआज आपण पंधरा देशात केळी निर्यात करीत आहोतपरंतु आपण खूप जास्त देशात केळी निर्यात करु शकतो इतकी आपली क्षमता आहेतामीळनाडू कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅगीतालक्ष्मी यांनी केळीसाठी ठिबक सिंचन व फर्टिगेशन या तंत्रज्ञानावर आम्ही खूप काम केले त्याचे अचूक व शास्त्रोक्त वापर करुन निर्यातक्षण केळी आपण तयार करु शकतो यावर भर दिलाबागलकोट कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅइंद्रेश यांनी कर्नाटकमध्ये मातीपाणी व वातावरण निर्यातक्षण केळी उत्पादनासाठी उत्तम असून केळीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितलेजैन इरिगेशनच्या केळी संशोधन व विकास कार्याला अधोरेखित करत बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्डने गौरव करण्यात आलाकंपनीच्यावतीने केळी तज्ज्ञ के.बीपाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्वागतपर भाषणात डाॅआरसेल्वराजन – संचालकराष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांनी आपण ग्रॅण्ड नाईन जातीची केळी मोठ्या प्रमाणावर निर्यात करीत आहोत परंतु विविध स्थानिक जातींना भौगोलिक निदेशांक मिळालेले आहेतत्यांची निर्यातसुद्धा वाढली पाहीजेकारण २० मिलियन तामिळ नागरिक परदेशात राहतात आणि त्यांची पसंती स्थानिक जातींना असतेडी.जी.एफ.टी.च्या महाव्यवस्थापक श्रीमती राजलक्ष्मी देवराज यांनी निर्यातदारांनी पुढे यावे असे सांगूनफोरेन ट्रेड मंत्रालय त्यांना खूप सहकार्य करीत असल्याची माहीती त्यांनी दिलीदुसऱ्या सत्रामध्ये जैन इरिगेशनचे वरिष्ठ केळी तज्ज्ञ के.बीपाटील यांनी सांगीतले कीआंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे केळी उत्पादनासाठी काम करावेजेणे करुन युरोपजापानरशिया या देशांनासुध्दा आपण केळी पुरवू शकूजगात केळीचे उत्पादन घटले आहेआपण भौगोलिकदृष्ट्या आखाती देश दुबईरशियाजपानइराणचीन यांच्याजवळ आहोतत्यामुळे इक्वेडोर व फिलीपीन्स प्रमाणे काम केल्यास निर्यातीत मोठी वाढ होईलकारण ठिबकटिश्यूकल्चरफर्टिगेशन व उत्तम तंत्रज्ञानाचा अवलंब जळगाव व सोलापूर मध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत्याचा फायदा निर्यातीसाठी होत आहेऑस्ट्रीया येथील एफ जी झिंगलश्रीअनिल डीकस्टम आयुक्त त्रिचीतामीळनाडू बनाना फेडरेशन सचिव श्रीअजितनडाॅअझर पठानकेळी निर्यात तज्ज्ञ कार्तीक जयरामअलायन्स इन्शुरन्सचे सी.श्रीनीवासनडाॅकेइन्गरसलजीएम नाबार्डपीतमील सल्वन उदमलपेठ यांच्यासह अनेक अभ्यासकांनी वेगवेगळे सादरीकरण करुन केळी निर्यातशीत साखळीकस्टमप्लन्टकाॅरेन्टाईनपॅकींगशिपींगअर्थसहाय्य उत्पादन तंत्रज्ञान अशा अनेक विषयांवर चर्चा झालीसोलापूर येथून किरण ठोकेबलरामसिंग सोळुंखेचाळीसगावसील्वाकुमार ए.पीकरपैय्या यांचेसह केळीशी संबंधीत ३०० जणांनी सहभाग नोंदविलाकेळी निर्यातीला उत्तम चालना देणारी कार्यशाळा झाली.

जैन इरिगेशनचा केळीतील इनोव्हेटीव्ह कार्यामुळे सन्मान

जैन इरिगेशनच सिस्टीम्स लिनेहमीच केळी पिकासाठी पुढाकार घेऊन विविध प्रकारचे काम करीत आहेकेळीसाठी ठिबक सिंचनटिश्यूकल्चरऑटोमेशन या सारखे तंत्रज्ञान निर्माण करुन केळी उत्पादनात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झालेली आहेशेतकऱ्यांची उत्पादकता जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्र ज्ञानामुळे झालेली आहेत्यासाठी बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्ड‘ देऊन गौरव करण्यात आलाकंपनीचे सहकारी केळी तज्ज्ञ के.बीपाटील यांनी डाॅअनगामुथु (अपेडा चेअरमनयांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास आरंभ

जळगाव, दि. 21  –  नव्या पिढीत अहिंसा, सहअस्तित्व, संरक्षण और सर्व जीवांच्याप्रती आत्मियतेची भावना वृद्धींगत व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे दर वर्षी गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबीर घेतले जाते. ह्या शिबिराचे औपचारिक उद्घाटन 21 रोजी झाले.  यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन आयंगार, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, रिसर्च डीन गीता धरमपाल, डॉ आश्वीन झाला यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन झाले. भारतातील 56 व नेपाळ येथील 4 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यात विविध प्रकारचे सत्र होणार आहेत. या शिबिराचा समारोप 1 जानेवारी 2023 ला होणार आहे.

सध्याच्या परिस्थिती संदर्भात गांधीजींच्या विचारांच्या प्रासंगिकतेच्या आधारे नेतृत्व तयार करणे या प्रमुख उद्देशाने या शिबिराचे नियोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराच्या माध्यमातून नव्या पिढीतील युवकांना शांतता दूत बनवणे, व्यक्तिमत्व घडवून त्याच्या ज्ञान व परिश्रमाने समाज घडवणे, चारित्र्य घडवून राष्ट्र निर्माण करणे,  पर्यावरण आणि विकासावर आधारित नेतृत्वाची निर्मिती करणे याच बरोबर तरुणांना अहिंसक जीवनशैलीवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणे, सार्वजनिक प्रशासन आणि सार्वजनिक धोरणावर आधारित नेतृत्वाची निर्मिती, संघटनेची भावना निर्माण करणे, तरुणांचा प्रभावी सहभाग आणि शासन प्रक्रियेत त्यांचे नेतृत्व निर्माण करणे इत्यादि या शिबिराचे प्रमुख उद्दिष्टे आहेत.

व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलननाने शिबिराचे औपचारिक उद्घाटन झाले. डॉ. सुदर्शन आयंगार, डीन गीता धरमपाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, सौ. अंबिका जैन, डॉ. झाला, गिरीश कुळकर्णी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिती शहा यांनी केले.

या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना क्षेत्र भेट, प्रशिक्षण / कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य भूमिका, गट असाइनमेंट, ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव, प्रवास, संप्रेषण, समुदाय संवाद, व्याख्यान, माध्यमांचे विविध प्रकार प्रशिक्षणासाठी उपयोगात आणले जातात. या गांधीयन लिडरशीप शिबिरात सहभागी झालेल्यांसाठी एक वेगळाच अनुभव असतो. नेतृत्व क्षमता वाढीसाठी युवा शिबिरामध्ये विशेषत: एनसीसी, एनएसएस, विद्यार्थी संघ, राज्यशास्त्राचे विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि क्षेत्रीय स्तरावर युवा शाखा हाताळणारे कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांचा प्रामुख्याने सहभाग असतो.

गांधी रिसर्च फाउंडेशन ही जळगाव, महाराष्ट्र येथे स्थित एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था नवीन पिढीला अहिंसा, सहअस्तित्व इत्यादिंची शिकवण देते.  गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे स्थानिक आणि जागतिक स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात. उदाहरणार्थ, विविध अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, क्षेत्रात मोठे काम केले आहे. ग्रामविकास, ग्रामीण रोजगार, प्रशिक्षण यासारखे अनेक लोकाभिमुख कार्य गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे केले जाते. ‘खोज गांधीजीकी’ जगातील सर्वात मोठ्या व पहिल्या क्रमांकाचे ऑडियो गाइडेड व मल्टीमीडिया संग्रहालय म्हणून लौकीक मिळविलेला आहे. त्या  माध्यमातून गांधीजींच्या जीवन कार्याचा अभिनव रितीने या संग्रहालयास भेट देणाऱ्यांना परिचय होत असतो. वर्षातून देश- विदेशातील हजारो व्यक्ती खोज गांधीजीकी या संग्रहालयास भेट देतात. युवकांसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातील एक भाग असलेल्या या राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिराकडे पाहिले जाते.

विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकॅडमीचा यश धोंगडे प्रथम

जळगाव (दि.19) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत मुलांच्या १४ वर्षे वयोगटात जैन स्पोर्ट्स अॅकॅडमीमधील कॅरमपटू यश योगेश धोंगडे याने प्रथम, तर महमंद हमजा द्वितीय व पाचवे स्थान प्राप्त करीत विभागीय कॅरम स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.

 

१४ वर्षे वयोगटातील विभागीय कॅरम स्पर्धा धुळे क्रीडा संकुल येथे १६ डिसेंबर ला झाल्यात. या स्पर्धेत १४ वर्षे जैन स्पोर्ट्स अॅकॅड‌मी व आर. आर. विद्यालयाचा विद्यार्थी यश योगेश धोंगडे याने धुळे येथील अबुजर अन्सारी या अंतिम फेरीत 25-0 असा सरळ पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले. अबुजर अन्सारीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यश धोंगडे याने आपल्या खेळ कौशल्याच्या जोरावर स्पर्धेत शेवटपर्यंत आपली पकड कायम ठेवली. त्याने उपान्त फेरीत जैन स्पोर्ट्स अॅकॅडमी व जि. एच. रायसोनीच्या कार्तिक हिरे याचा देखील २५-४ असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सदर १४ वर्षे वयोगात जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार विभागातील ४८ कॅरमपटूंनी सहभाग घेतला होता. त्यात जळगाव येथीन जैन स्पोर्टस अॅकॅडमीतील योगेश घोंगडे, कार्तिक हिरे तृत्तीय तर महमंद हमजा पाचवे स्थान प्राप्त करून प्रथमच प्रथम, विभागीय स्पर्धेत जळगावचे नाव रोशन केले. वरील सर्व यशस्वी जळगाव येथील कॅरमपटूंना घडविण्याचे व यशस्वतिपर्यंत पोहचविण्याचे कार्य ॲकॅडमीतील प्रशिक्षक योगेश धोंगडे व सय्यद मोहसनी यांनी लिलया पेलले. विजयी खेळांडूपैकी यश योगश धोंगडे याला धुळे कॅरम संघटनेतर्फे ट्रॉफी देऊन विशेष कौतुक व गौरविण्यात आले. जैन स्पोर्ट्स अॅकॅडमीतीक विभागीय स्पर्धेत स्थान प्राप्त करणाऱ्या यश, कार्तिक, हमजा या खेळाडूंचे अभिनंदन जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे अतुल जैन, अरविंद देशपांडे यांनी केले व राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्यात.

अनुभूती स्कूल ‘इंडियाज् टॉप 10 बोर्डिंग स्कूल’ श्रेणीत’ एज्युकेश टुडेच्या सर्वेक्षणात भारतात आठवी तर महाराष्ट्रात प्रथम

जळगाव दि.12– शैक्षणिक क्षेत्रातील भारतामधली नावाजलेली संस्था ‘एज्युकेशन टुडे’ यांनी ‘भारतातील टॉप 10 बोर्डिंग स्कूल’ सर्वेक्षणात अनुभूती स्कूलला भारतातील 8 आणि महाराष्ट्रील पहिल्या क्रमांकाची स्कूल असल्याची श्रेणी मिळाली. हॉटेल ताज बंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या समारंभात स्कूलचा प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविले गेले. या आधी काही दिवसांपूर्वी अनुभूती स्कूलचा ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड्स 2022-23’ ने महाराष्ट्रात प्रथम सन्मान झालेला आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात शंभर एकर परिसरात विस्तारलेली अनुभूती स्कूल इयत्ता 5 वी ते 12 पर्यंत पूर्ण निवासी आहे. अनुभूती मध्ये औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रुजविणे जातात. ‘इथे शिकणारा विद्यार्थी नोकरी मागणाऱ्यापेक्षा तो नोकरी देणारा ठरावा’ या विचारांनी या शाळेची वाटचाल सुरू आहे. स्कूलचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अनुभूती स्कूल कडे पाहिले जाते. शाळेच्या व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे परिपूर्ण लक्ष असते.

76,738 शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण, प्रत्यक्ष परिस्थिती आणि नामांकन या तीन पद्धतीने सर्व स्कूलची श्रेणी तपासून पाहिली गेली. या सर्वेक्षणात प्रामुख्याने शैक्षणिक प्रतिष्ठान, शिक्षकांचे शिक्षण, अनुभव, गुणवत्ता, डिजिटल लर्निंग, क्रीडा शिक्षण, पालकांचा सहभाग, फ्युचर प्रुफ लर्निंग, शाळेची सेवा साधने, पैशाचे मूल्य, कम्युनिटी सर्व्हिस, विद्यार्थ्याचे मनोवैज्ञानिक कल्याण, विद्यार्थ्यांसाठी वैयक्तीक लक्ष तसेच स्कूलची वेगळी काही वैशिष्ट्ये इत्यादी निकष लावलेली होती. या सर्वात अनुभूती स्कूल अव्वल ठरलेली आहे.

‘संस्कार आणि संवेदनशील मन निर्माण करणे हे आपल्या शिक्षणाचे उद्दिष्ट असावे’ असे मानणारे श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांच्या विचारांवर आधारित, शैक्षणिक मूल्यांसह सामाजिक संवेदना जपणाऱ्या अनुभूती स्कूलने भारतातील निवासी शाळा क्रमवारीत भारतातील आठवी आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे ही मोठी गौरवाची गोष्ट आहे. फक्त भौतिक गोष्टी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे उद्दिष्ट ठेवलेल्या आमच्या स्कूलने निस्पृहपणे शैक्षणिक यज्ञ चालविलेला आहे. श्रद्धेय भाऊंच्या मार्गदर्शनानुसार स्कूलची प्रगतीकडे वाटचाल सुरूच असेल’.

– श्री. अतुल जैन, चेअरमन, अनुभूती स्कूल

  ‘शिक्षणामुळे आपल्या पिढीबरोबरच येणाऱ्या अऩेक पिढ्यानपिढ्या सुसंस्कृत होतील.’ असे या स्कूलचे संस्थापक श्रद्धेय मोठे भाऊंचे विचार होते. आज विविध क्षेत्रात नाव उज्ज्वल करत आहेत ह्या पेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट नाही. जळगाव येथील स्कूल महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळविते, स्कूलला मिळालेला सन्मान हा जळगावसह महाराष्ट्रासाठी मोठा अभिमानास्पद आहे. शाळेच्या नावलौकीत या सन्मानामुळे भर पडलेली आहे. हा लौकिक टिकविण्यासाठी स्कूलमधील शिक्षक-शिक्षकेतर सहकाऱ्यांसह विद्यार्थी व पालकांचे विशेष सौजन्य आहे हे मात्र तितकेच खऱे आहे.’

– सौ, निशा जैन, संचालक, अनुभूती स्कूल

चित्रवेणूच्या आविष्कारासह शास्त्रीय-उपशास्त्रीय संगिताची अनुभूती

जळगाव दि.७ चित्रवेणू वादकाची स्वत:ला चिकारीसारखी तारेची साथ देण्याची क्षमता तसेच मधुर, सुर आणि पाश्चात् संगीताची अनुभूतीसह बासरी, सिताराच्या शतताराचा संगम असलेल्या चित्रवेणूतुन मिश्र भैरवी रागातील धून पं.उदय शंकर यांनी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय-उपशास्त्रीय संगितामध्ये कट्यार काळजात घुसली मधील किरवानी रागातील दिल की तपिष, रानी तेरो चिरजीयो,नामगाऊ नामध्याऊ ह्या गाण्याने रसिकांची वाहवा मिळविली.

बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात लंडन येथील डाॕ. लिना परदेशी, कॕनडा येथील मोहन कोरान्ने, समाजकल्याण विभागाचे आयुक्त योगेश पाटील, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे व्हाईस प्रेसीडेंट पर्सोनल श्री. चंद्रकांत नाईक, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. भरत अमळकर, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर यांच्या उपस्थितीत दोघंही सत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला.


स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत.
द्वितीय दिनाची सुरुवात चित्रवेणू या नवीन वाद्यावर पं. उदय शंकर यांनी सुरवातीला राग यमन मध्ये जोड, झाला अतिशय उत्तम रित्या सादर केला. हा राग मध्य लय रूपक या तालात निबद्ध होता व बंदिश द्रुत तीनतालात सादर केली. यानंतर मिश्र भैरवी रागातील धून वाजविली. पं. उदय शंकर यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर केले. पंडितजींशी प्रश्नोत्तराचे एक उत्तम सेशन झाले. यामध्ये मुलाखतीच्या रूपाने सुसंवादिनी दीप्ती भागवत यांनी बोलतं केलं. यात चित्रवेणू वाद्याविषयी सांगितले. बासरीच्या ध्वनी किंवा आवाजावर आणि वार्याच्या (Wind Instrument) यापुर्वी कधीही न वाजविले गेलेले भारतीय अभिजात संगीत वाजविण्याची क्षमता असलेले चित्रवेणू वाद्याची अनुभूती जळगावकरांना विश्लेषणासह घेतली.

कट्यार काळजात घुसलीने जिंकली मने
द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनाने झाले. राग जोग. मध्यलय झपताल मध्ये बडा ख्याल : “रट नाम श्री गुरु का” द्रुत तीनताल: “तुम बिन कैसे कटे.” त्यानंतर अंकिता यांनी दादरा सादर केला बोल होते – “बलामा ओ मोरे सैया”, त्यानंतर राग- मारू बिहाग सादर करून आपल्या प्रतिभेची चुणूक रसिकांना दाखविली. सुप्रसिद्ध चित्रपट कट्यार काळजात घुसली मधील किरवानी रागातील दिल की तपिष. ह्या गाण्याने रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर सादर झाले. हवेली संगीत – रानी तेरो चिरजीयो गोपाल, मराठी अभंग- नामगाऊ नामध्याऊ सादर करून आपल्या मैफिलीची सांगता केली. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे, धनंजय कंधार, मानसी महाजन यांनी दिली.


बालगंधर्व महोत्सवाचा आज समारोप
तृतीय दिनाचे प्रथम सत्र सहगायनाने संपन्न होईल. शास्त्रीय व उप-शास्त्रीय सहगायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील मुंबई चे गायक व गुरु पं. डॉ. राम देशपांडे, व त्यांचा मुलगा गंधार देशपांडे. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील. बालगंधर्व महोत्सवाचा समारोप थ्री जनरेशन कॉन्सर्ट अर्थात तीन पिढ्यांच्या मैफलीने होणार असून ही मैफल सजवणार आहेत पद्मभूषण व ग्रॅमी ऍवार्ड विजेते पं. विश्वमोहन भट (मोहन वीणा) पं. सलील भट (सात्विक वीणा) व अथर्व भट (गिटार) यांच्या सहवादनाने एकविसावा महोत्सव संपन्न होईल.
कार्यक्रमाच्या सुरवातीला गतवर्षी निधन झालेल्या कलावंतांना चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मयूर पाटील यांनी गुरूवंदना म्हटली.

अभिजात संगीताचा बालगंधर्व संगीत महोत्सवाची सुरवात कथक नृत्याच्या जुगलबंदीसह फ्युजन बँडव्दारे स्वरांची झाली रूजवात

जळगाव दि.६ – कथक नृत्यातील बनारस घराण्याची परंपरेची सौरव आणि गौरव मिश्रा ह्यांनी कथक नृत्याची जुगलबंदीची जळगावकर रसिकांना अनुभूती दिली. तसेच अभिजात संगीताचा आणि पाश्चात्त्य संगीताचा संगम असलेल्या फ्युजन बँड ने स्वरांची रूजवात करीत रसिकांकडून कलावंतांनी दाद मिळवली.

भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे ची सुरवात झाली.
छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात होणाऱ्या दीपप्रज्वलनाप्रसंगी महापौर जयश्री महाजन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन चे विश्वस्त डाॕ. सुभाष चौधरी, जाई काजळचे राजेश गाडगीळ, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरदचंद्र छापेकर, दिपक चांदोरकर, दीपीका चांदोरकर, वेगा केमिकल्स चे भालचंद्र पाटील, अनदान देशमुख, आरजे टिया, अतुल्य भारतच्या सहाय्यक संचालक स्नेहल पाटील उपस्थित होते. उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते दोघंही सत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत.
अभिजात संगीताच्या विश्वात जळगाव चे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवाच्या एकवीस आवर्तने स्वराभिषेकाची! यातील प्रथम सत्रात कलावंत उमेश वारभुवन (परकिशन) आशय कुलकर्णी (तबला) रोहित कुलकर्णी (किबोर्ड) विनय रामदासन (गायन) अभिषेक भुरूक (ड्रम्स) आणि संदिप मिश्रा (सारंगी) या फ्युजन बँड चे सादरीकरण केले. मॅसिव अटॅक कलेक्टिव्ह या बँड ने सुरवातीला ताल तिनताल मध्ये तबला, ड्रम आणि पर्कशनवरती राग किरवाणीमध्ये सादरीकरण केले. त्यानंतर राग कौशी कानडा मधील एक तराणा ताल एकताल मध्ये गायन, सारंगी आणि की बोर्ड यांच्या बरोबरीने सादर झाला. तराणा नंतर पं. जसराज जी यांनी गाऊन प्रसिद्ध केलेला हवेली संगीत हा गायनाचा प्रकार या बँड मध्ये वेगळ्या प्रकारे सादर झाला. यानंतर राग हंसध्वनी मध्ये एक गाणं सर्वांनी मिळून प्रस्तुत केले. आणि मृगनयनी या पं जसराज जी यांनी गायलेल्या रचनेने या कार्यक्रमाचा शेवट झाला.
दमदार कथक नृत्याची मेजवानी
बालगंधर्व संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध सारंगी वादक पं भवानी प्रसाद मिश्रा ह्यांचे नातू व सुप्रसिद्ध सतार वादक पं अमरनाथ मिश्रा ह्यांचे पुत्र सौरव आणि गौरव मिश्रा ह्यांनी कथक नृत्याची प्रस्तुती केली. त्यांना तबल्यावर संगत दिल्ली येथील प्रख्यात तबला वादक उस्ताद अक्रम खान यांनी केली. कथक नृत्यातील बनारस घराण्याच्यी वैशिष्ट्ये त्यांनी नृत्यातून ठळकपणे दाखवत रसिकांची दाद मिळवली. “INDIA’S BEST JUDWAAH” हा उपाधी मिळवणाऱ्या सौरव गौरव ह्यांनी त्यांच्या सादरीकरणाची सुरवात राग अहिर भैरव आणि ताल रुपक मधे बांधलेली “डमरु पानी,शूल पानी,हे नटराजन नमो नमः ” ह्या दमदार शिवस्तुती ने केली.त्यानंतर ताल त्रितालात गुरु पं रविशंकर मिश्रा ह्यांच्याकडून शिकलेल्या बनारस घराण्याच्या प्राचीन बंदीशी,तोडे तुकडे,परन,तसेच काका (मौसाजी ) पं बिरजू महाराजांकडून शिकलेल्या बंदीशी प्रस्तुत केल्या. ताल त्रिताला नंतर राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमाची प्रचिती देणारी बंदीश “क्रृष्णप्रिया” वर केलेल्या भावप्रदर्शनाने प्रेक्षकांना मोहित केले.. ह्या दमदार कथक नृत्याची सांगता सौरव गौरव ह्यांनी “आनंद तांडव ” ह्या नृत्याने करुन रसिकांची वाहवा मिळवली…

गुरूवंदना चांदोरकर प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सादर केली. सुप्रसिद्ध निवेदिका दिप्ती भागवत यांनी संचालन केले.

आज अनुभवा शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनासह चित्रवेणू

द्वितीय दिनाची सुरुवात एका प्रतिभासंपन्न कलाकाराच्या माध्यमातून होईल कि ज्यांनी चित्रवेणू या नविन वाद्याची निर्मीती केली असून हे वाद्य विंड आणि स्ट्रिंग इंन्स्ट्रुमेंटचे कॉंबीनेशन आहे. हा कलावंत अमेरिका येथे वास्तव्यास असून ते मुळचे चेन्नई येथील आहेत. त्यांचे नाव पं. उदय शंकर असून त्यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर करतील. द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनाने होईल. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील.

२१ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दिनांक ६, ७, ८ जानेवारी २०२३ संपन्न होणार

जळगाव दि.5-भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक ६, ७, ८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ, व संस्कृती मंत्रालय, भारत सरकार हे असून भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगाव चे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात यावर्षीही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.


महोत्सवाची सुरुवात दि. ६ जानेवारी रोजी उद्गाटन समारंभानंतर प्रथम सत्रात तरुण, उदयोन्मुख आणि आश्वासक असे कलावंत उमेश वारभुवन (परकिशन) आशय कुलकर्णी (तबला) रोहित कुलकर्णी (किबोर्ड) विनय रामदासन (गायन) अभिषेक भुरूक (ड्रम्स) आणि संदिप मिश्रा (सारंगी) या फ्युजन बँड ने होणार आहे. द्वितीय सत्र तरूण व आश्वासक व बनारस घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे सौरव व गौरव मिश्रा यांच्या कथक जुगलबंदिने संपन्न होणार आहे. त्यांना तबल्यावर संगत दिल्ली येथील प्रख्यात तबला वादक उस्ताद अक्रम खान करतील.
द्वितीय दिनाची सुरुवात एका प्रतिभासंपन्न कलाकाराच्या माध्यमातून होईल कि ज्यांनी चित्रवेणू या नविन वाद्याची निर्मीती केली असून हे वाद्य विंड आणि स्ट्रिंग इंन्स्ट्रुमेंटचे कॉंबीनेशन आहे. हा कलावंत अमेरिका येथे वास्तव्यास असून ते मुळचे चेन्नई येथील आहेत. त्यांचे नाव पं. उदय शंकर असून त्यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर करतील. द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनाने होईल. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील.
तृतीय दिनाचे प्रथम सत्र सहगायनाने संपन्न होणार आहे. शास्त्रीय व उप-शास्त्रीय सहगायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील मुंबई चे गायक व गुरु पं. डॉ. राम देशपांडे, व त्यांचा मुलगा गंधार देशपांडे. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील.
बालगंधर्व महोत्सवाचा समारोप थ्री जनरेशन कॉन्सर्ट अर्थात तीन पिढ्यांच्या मैफलीने होणार असून ही मैफल सजवणार आहेत पद्मभूषण व ग्रॅमी ऍवार्ड विजेते पं. विश्वमोहन भट (मोहन वीणा) पं. सलील भट (सात्विक वीणा) व अथर्व भट (गिटार) यांच्या सहवादनाने एकविसावा महोत्सव संपन्न होणार आहे.

https://tradingbuzz.in/wp-content/uploads/2023/01/VID-20230105-WA0010.mp4

तरुण पिढीने ऐकावा आणि जुन्या या पिढीने सुद्धा ऐकावा असा हा स्वरोत्सव असून या महोत्सवाच्या तीनही दिवसांचे सुत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी दिप्ती भागवत करणार आहेत. तमाम जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, तसेच विविध प्रायोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्षा सौ दीपिका चांदोरकर, विश्वस्त अशोकभाऊ जैन, रमेशदादा जैन, दत्ता सोमण, प्रा. शरदचंद्र छापेकर, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे व डॉ. अपर्णा भट यांनी केले आहे.

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ नागपूरला महाराष्ट्र ओलंपिक गेम्स 2022-23 साठी रवाना

जळगाव दि. 1 – जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ महाराष्ट्र ओलंपिक गेम्ससाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्र ओलंपिक गेम्स 2022-23 च्या स्पर्धा दि. 2 ते 6 जानेवारी 2023 दरम्यान नागपूर येथील मानकापूर स्टेडियममध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी हा संघ आपली छाप सोडण्यासाठी रवाना झाला आहे.

महाराष्ट्रातून पुरुषांचे आठ संघ पात्र झालेले आहेत. यामध्ये जळगाव, नागपूर, ठाणे, पुणे, ग्रेटर मुंबई, नाशिक, सांगली, पालघर या संघांचा समावेश आहे. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन चा संघसुद्धा यामध्ये पात्र ठरलेलाआहे. जळगावचा पुरुष संघ महाराष्ट्र ओलंपिक गेम्स 2022 – 23 मध्ये सहभागी होणे ही जळगावच्या संघासाठी ऐतिहासिक आणि गौरवाची बाब आहे. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या संघात शुभम पाटील, प्रणव पाटील, दीपेश पाटील, गोपाल पाटील, उमेर देशपांडे, ओजस सोनवणे, अथर्व शिंदे, देवेश पाटील, सुफियान शेख, किशोर सिंह सिसोदिया यांची निवड झाली आहे. या खेळाडूंसोबत प्रशिक्षक अमोल पाटील, संघ व्यवस्थापक विनीत जोशी हे नागपूरला होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाले आहे. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष तेजेंद्र महिंद्रा, सचिव विनीत जोशी, सहसचिव तनुज शर्मा, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य शेखर जाखेटे व जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह यांनी पुढील स्पर्धेसाठी संघाचे कौतूक केले आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version