महाराष्ट्र स्टेट कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजयी

जळगाव दि. १४ – ५६ व्या सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर महाराष्ट्र राज्य कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धा २०२२-२३ मुंबई-दादर येथील श्री हलारी ओसवाल समाज हॉल येथे  दि. ११ जानेवारी २०२३ ला पार पडली. या स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकडमीची खेळाडू कु. दुर्गेश्वरी योगेश धोंगडे विजयी झाली. तिने रत्नागरीच्या निधी सप्रे हिचा ४-२५ व ५-२५ ने पराभव केला. दुर्गेश्वरी धोंगडे हिने कॅडेट ग्रुप १२ वयोगटामध्ये पहिला क्रमांक प्राप्त केला. महाराष्ट्रातून प्रथम आल्याने दुर्गेश्वरीचा चषक, प्रमाणपत्र ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे अरूण केदार यांच्याहस्ते गौरविण्यात आले. या यशानंतर तिची राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून राष्ट्रीय कॅरम स्पर्धा वाराणसी येथे खेळविली जाणार आहे. दुर्गेश्वरी धोंगडे हिला प्रशिक्षक म्हणून जैन स्पोर्टस ॲकडमीतील प्रशिक्षक सय्यद मोहसीन व योगेश धोंगडे यांनी मार्गदर्शन केले. तिच्या यशाबद्दल जैन स्पोर्ट्स अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन, प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे यांच्यासह सहकाऱ्यांनी कौतूक केले.

सीए परिक्षेत देशभरातून अनुभूती स्कूलची सौम्या जाजू २८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

जळगाव दि. 13 – दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या वतीने नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा अंतिम व इंटरमीडिएट परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये देशभरातून अनुभूती स्कूलची माजी विद्यार्थीनी सौम्या गिरिराज जाजू २८ व्या रॅंकने उत्तीर्ण झाले.
अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत जळगाव येथील अनुभूति स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरीची परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.  सीए अंतीम नवीन कोर्स दोन्ही ग्रुपमधून सौम्या जाजू ही जळगाव शहरातून प्रथम तर भारतात २८ व्या क्रमांकाने सौम्या जाजू उत्तीर्ण झाली आहे. तसेच फायनलमध्ये अंशुमा लुंकड, अनिकेत अग्रवाल, जय मारू हे विद्यार्थीही उत्तीर्ण झाले तर विनित ठोले, सुरज चौधरी यांनी इंटरमीडिएट परीक्षेत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अनुभूतीस्कूलचे चेअरमन श्री. अतुल जैन व संचालिका सौ. निशा जैन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कौतूक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथी अर्थात हुतात्मा दिनी (दि. ३० जानेवारी) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी भव्य अशा  “ग्राम संवाद सायकल यात्रे”चे आयोजन करण्यात आले आहे. १३ दिवस चालणारी हि यात्रा जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम भागातील जळगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यातून सुमारे ३५० किमीचा प्रवास करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे.

समाजातील सहभागाने हि सायकल यात्रा यशस्वी करण्याचे नियोजन सुरु आहे. सायकल यात्रेत विविध राज्यातून येणारे व स्थानिक स्वयंसेवकांचा सहभाग असणार आहे. या सहभागी स्वयंसेवकांसाठी संबंधित कालावधीत वापरासाठी सायकलींची आवश्यकता आहे. आपणास विनंती आहे कि, आपल्याकडील चालू स्थितीतील व प्रवासासाठी योग्य सायकल उपलब्ध करून द्यावी. सायकल यात्रेनंतर आपणास आपली सायकल योग्य स्थितीत परत करण्यात येईल. सायकल वापरण्यायोग्य करण्यासाठी काही दुरुस्ती करावी लागणार असल्यास तसेही सांगावे.

सायकलसह यात्रेच्या मार्गावरील गावातील शाळा/महाविद्यालयात कार्यक्रम, स्थानिक पातळीवर रात्री गावकऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन, सकाळी गावात प्रभात फेरीचे आयोजन आदी माध्यमातून स्थानिक नागरिक आपला सहभाग नोंदवू शकणार आहेत. तसेच सहभागी स्वयंसेवकांचा नाश्ता, दुपारचे व संध्याकाळचे जेवण आदी विषयातही आपला सहभाग नोंदवू शकणार आहे. अधिक माहितीसाठी सुधीर पाटील (९८२३३६२३३०) यांचेशी संपर्क साधावा.

सौरभ यालकर सीए परिक्षा उत्तीर्ण

जळगाव दि.11- जैन उद्योग समूहातील व्यवस्थापक पदावरील वरिष्ठ सहकारी राजेंद्र यालकर यांचा मुलगा चि. सौरभ राजेंद्र यालकर याने नोव्हेंबर-२०२२ मध्ये सि.ए.(CA) परिक्षा दिली होती. या परिक्षेचा अंतिम निकाल लागला. यात सौरभने चांगल्या गुणांसह सीए ची परिक्षा उत्तीर्ण केली आहे. सौरभच्या यशाबद्दल त्याचा परिवार,दिगंबर जैन समाजातील मान्यवर यांच्यासह सर्वस्तरातून त्याचे कौतूक होत आहे. तसेच जैन इरिगेशनच्या व्यवस्थापनाकडूनही त्याचे कौतूक झालेे. त्याने यापूर्वी बी.कॉमला 79 टक्के प्राप्त केले होते.  दिगंबर जैन समाजातील साधारण कुटुंबात वाढलेला  एक आदर्श विद्यार्थी सीए अंतिम परिक्षा उत्कृष्टरित्या उत्तीर्ण झाला याचा आनंद वडील राजेंद्र यालकर यांनी व्यक्त केला.

गौतम अदानीने एकाच दिवसात खेळ उलथून टाकला, टॉप-10 श्रीमंतांमध्ये पुन्हा तिसरे स्थान पटकावले

जगातील टॉप10 अब्जाधीशांच्या यादीत गुरुवारी मोठा फेरबदल दिसून आला. जेव्हा अॅमेझॉनचे सह-संस्थापक जेफ बेझोस भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकून जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. मात्र त्याला या खुर्चीवर २४ तासही बसता आले नाही आणि गौतम अदानी यांनी लांब उडी घेत पुन्हा तिसरे स्थान पटकावले.
अदानी थोड्या फरकाने मागे होते
गुरुवारच्या ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, गौतम अदानी यांच्या शेयर्स घसरणीमुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $118 अब्ज झाली आहे, तर Amazon चे जेफ बेझोस यांची संपत्ती (Jeff Bezos Wealth) तब्बल 5.23 अब्ज डॉलर्सने वाढली आहे आणि या यादीत शीर्षस्थानी आहे.
गौतम अदानी यांच्याकडे एवढी मालमत्ता आहे
गेल्या 24 तासांत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आणि यासह त्यांची एकूण संपत्ती 119 अब्ज डॉलर झाली. या आकडेवारीसह, अदानी समूहाचे अध्यक्ष श्रीमंतांच्या यादीत पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आले, तर बेझोस पुन्हा 118 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर घसरले.
2022 मध्ये अदानीला फायदा होईल आणि इतर श्रीमंतांना तोटा होईल.
गेल्या वर्षी 2022 मध्ये गौतम अदानी हे एकमेव अब्जाधीश होते ज्यांनी भरपूर कमाई करत आपली संपत्ती वाढवली होती. एका वर्षात त्यांची एकूण संपत्ती सुमारे $40 बिलियनने वाढली होती. एवढेच नाही तर तो नंबर-2 अमीरच्या खुर्चीपर्यंत पोहोचला होता. दुसरा सर्वात मोठा बदल दिसला जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्याकडून 2021 पासून जगातील नंबर वन अब्जाधीश असलेल्या टेस्ला सीईओ एलोन मस्क यांच्याकडून हिसकावून घेण्यात आला. अलीकडेच, सर्वात जास्त पैसे गमावल्याबद्दल इलॉन मस्कचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

खबरदार : देशात कोरोनाचे १७९ नवीन प्रकरणे समोर

कोविड-19 अपडेट:  देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १७९ नवीन रुग्ण आढळले आहेत. चीन आणि जपाननंतर आता भारतातही कोरोनाचे नवे रूप आले आहे. आता देशातील संक्रमित लोकांची संख्या 3,124 झाली आहेे. WHO च्या मते, BF 7 हा कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार आहे. कोरोनाव्हायरसच्या विविध प्रकारांच्या प्रसाराच्या चिंतेमुळे अनेक महत्त्वाच्या प्रवेश बिंदूंवर चाचणी-ट्रॅकिंग वाढवण्यात आले आहे. पुनर्प्राप्तीचा दर 98.8 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 

  

२४ तासांत इतक्या कोरोना चाचण्या झाल्या 

  

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात 24 तासांत 208 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. आता देशातील रिकव्हरी रेट 98.80 टक्के झाला आहे. दैनिक सकारात्मकता दर 0.10% आहे आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 0.10% आहे. त्याच वेळी, एकूण संक्रमणांपैकी 0.01 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, कोविड-19 विरोधी लसींचे 220.16 कोटींहून अधिक डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत आणि 24 तासांत 1,74,467 लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

  

भारतात XBB.1.5 प्रकारातील प्रकरणांची संख्या वाढली आहे 

  

देशात कोरोनाव्हायरसच्या XBB.1.5 स्वरूपाच्या रुग्णांची संख्या सात झाली आहे. भारतीय SARS-COV-2 Genomics Consortium (INSACOG) ने गुरुवारी ही माहिती दिली. हा प्रकार अमेरिकेत कोरोना विषाणू संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत असल्याचे मानले जाते. या सात प्रकरणांपैकी गुजरातमध्ये तीन आणि कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक आढळून आला आहे. 

RT PCR ७२ तास अगोदर अपलोड करणे बंधनकारक 

  

आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांना ७२ तास आधी आरटी पीसीआर अपलोड करणे बंधनकारक असेल, असे या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे. प्रवासी प्रवाशांसाठीही ही व्यवस्था अनिवार्य आहे. यासोबतच देशात येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी केली जाणार आहे. 

  

हवाई सुविधा फॉर्म भरणे अनिवार्य 

  

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया म्हणाले, “आम्ही भारतात आल्यानंतर ज्यांना ताप आहे किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे त्यांना क्वारंटाईन करण्याचे आदेशही जारी करणार आहोत.” यासोबतच चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सध्याची आरोग्य स्थिती जाहीर करण्यासाठी हवाई सुविधा फॉर्म भरणे बंधनकारक असेल. 

बालगंधर्व संगीत महोत्सवाची प्रातःकालीन मैफल


जळगाव दि.१२ २१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवावी प्रात:कालीन मैफलीचे आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. ही प्रातःकालीन मैफल रविवार दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७ वाजता महात्मा गांधी उद्यानात संपन्न होत आहे.

रसिकांनी ६.५० पर्यंत आसनस्थ व्हावे ही विनंती आहे.
या मैफिलीचे कलावंत तरुण व युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. यामध्ये ओंकार प्रभुघाटे व संपदा माने आहेत. नाट्यसंगीत व अभंगवाणी ने ओतप्रोत भरलेली ही मैफिल संक्रांतीच्या शुभदिनी रसिकांची सकाळ गोड करणारी ठरेल. या कलावंतांना साथ संगत रामकृष्ण करंबेळकर (तबला), गणेश मेस्त्री (पखावज), वरद सोहोनी (संवादिनी), धनंजय कंधारकर (तालवाद्य) व सुसंवादिनी म्हणून निरुपण करणार आहे अनुश्री फडणीस-देशपांडे. चुकवू नये अशी ही मैफल तमाम जळगावकरांसाठी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानची नवीन वर्षाची संक्रांतीची भेट आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी श्री. अमन मित्तल यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. २१ व्या वर्षानिमित्त संपन्न होणाऱ्या या स्वरोत्सवात सर्व रसिकांचे हार्दिक स्वागत असून आसन व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य क्रमाने आसन व्यवस्था आहे.
चुकवू नये अश्या या प्रातःकालीन नाट्यसंगीत व अभंगवाणी च्या कार्यक्रमास जळगावकर रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) चे संचालक डॉ. दिपक खिरवाडकर, अधिकारी श्रीकांत देसाई व कार्यक्रम अधिकारी श्री. दिपक कुलकर्णी तसेच स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी केले आहे.

विजय जैन यांच्या “प्लास्टिक प्रदूषण” विषयावरील पोस्टर ला राज्य शासनाचा पुरस्कार!


मुंबई दि.10 – जैन इरिगेशनच्या कला विभागातील चित्रकार श्री. विजय जैन यांच्या प्लास्टिक प्रदूषण विषयाचे गांभीर्य अधोरेखित करत, घराबाहेर पडताना आपली कापडी पिशवी सोबत बाळगण्याची आठवण करून देणाऱ्या लक्षवेधी पोस्टर रचनेला महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या ६२ व्या वार्षिक प्रदर्शनात ५० ००० (रुपये पन्नास हजार) चे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
प्रधान सचिव श्री विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, प्रा प्रमोद रामटेके, अमूर्त चित्रकार, नागपूर, श्री. राजीव मिश्रा, कला संचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दि १० जानेवारी २०२३ रोजी सायं ५.३० वा. प्रसिध्द छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते जैन यांना गौरविण्यात आले.

उपयोजित कलेच्या सदर पोस्टरसह विजय जैन यांच्या रेखा व रंगकला विभागात “रंगलीपी” ही जलरंग चित्र मालिका देखील या वार्षिक कला प्रदर्शनाचा भाग आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत ११ ते १६ दरम्यान सर्वांसाठी खुले असणार आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी प्लास्टिक कचऱ्यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयाला साध्या सोप्या रुपात मांडल्याचे सांगत श्री विजय जैन उपयोजित कलेबरोबर रेखा व रंगकलेमध्ये देखील आपले योगदान सातत्याने देत असल्याबद्दल यांचे कौतुक केले आहे. नुकताच “पुरुषी अहंकार” या विषयावरच्या त्यांच्या पोस्टरला मुंबईच्या “डूडल सोशल ॲड फेस्ट” या राष्ट्रीय स्पर्धत नामांकन मिळाले आहे. सदर स्पर्धेचे ते २०१७ चे विजेते आहेत. विजय जैन यांच्या “स्त्री शिक्षणा”च्या पोस्टर ला उत्तर प्रदेश ललित कला अकादमी चा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छ भारत, प्रौढ शिक्षण, झाडं वाचवा, बाल कामगार, सकस आहार- विद्यार्थी, सोशल मीडिया वापर: एक जबाबदारी आणि कोरोना काळातील मास्क वापरासाठी उद्युक्त करणारी सोशल मीडिया मालिका अशा सामाजिक विषयाला धरून त्यांनी अतिशय कल्पक आणि प्रबोधनात्मक पोस्टर रचना साकारल्या आहेत. त्यांच्या या कामाचे राज्य व राष्ट्रीय स्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वरोत्सवात सहगायनातुन रसिकांची तृप्ती

२२ वा बालगंधर्व महोत्सव ५, ६, ७ जानेवारीला; बालगंधर्व महोत्सवाच्या २१ आवर्तने अनूभवना-या रसिक श्रोत्यांचा गौरव

जळगाव दि.8– बालगंधर्व संगीत महोत्सवात आजच्या दिवसाची संध्याकाळ रम्य झाली रसिक स्वरोत्सवात न्हाऊन निघाले. कारण होते ज्येष्ठ गायक पंडीत डॉ. राम देशपांडे व त्यांच्या सौभाग्यवती अर्चना देशपांडे मुलगा गंधार देशपांडे यांच्या सहगायनाचे. पंडीत डाॕ.राम देशपांडेंनी आपल्या गायनाची सुरवात राग यमन कल्याणने केली. ताल तीलवाड्यात बंडा ख्याल “जिया मानत नाही” व द्रुत ख्याल तिनतालात ” ननदिके बचनुवा संह न जाये ” अत्यंत दमदार पणे सादर केले. त्यानंतर पंडितजीचा स्वरचित तराणा “देनी देनी देनी तनन” हा एकतालातील सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर पंडिता किशोरीताई अमोणकर यांनी गाऊन अजरामर केलेल्या ” बोलावं विठ्ठल, पहावा विठ्ठल” या अभंगला स्वतःची राग भिन्न षड्ज रागात बांधलेल्या चालीचा तोच अभंग सादर करून वातावरण भक्तिमय केले. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत असलेले आणि अजरामर झालेले सं. कट्यार काळजात घुसली या नाटकातील रागमालेवर आधारित “सूरत पिया बिन छिन बिसराये” हे पद सादर करून रसिकांना तृप्त केले. पंडितजींनी आपल्या मैफिलीची सांगता कोण जागता कोण सोता या भजनाने झाला. पं. कुमार गंधर्व यांची गाऊन अजरामर केलेल्या “सावरे ऐजैयो, जमुना किनारे मोरा गाव” या गीताने केली. आणि रसिकांच्या कानात हे सूर घुमत राहिले. त्यांना साथ संगत तबल्यावर रामकृष्ण करंबळेकर, संवादिनीवर अभिनय रवंदे, तानपु-यावर मयूर पाटील, वरूण नेवे यांनी केली.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत. दोघंही सत्रात सहभागी कलावंताचा सत्कार जैन इरिगेशनचे डाॕ. अनिल पाटील, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, वेगा केमिकल्सचे भालचंद्र पाटील, निनाद चांदोरकर, दीपिका चांदोरकर, डाॕ. अर्पणा भट यांनी केले.


मोहन वीणा, सात्विक वीणा यांच्या जुगलबंदीने समारोप
बालगंधर्व संगीत महोत्सतील व्दितीय समारोपाच्या सत्रात पद्मभुषण व कॕनिडीयन ग्रॕमी ॲवार्ड विजेते पिता पुत्र पं. विश्वमोहन भट व पं. सलिल भट यांच्या मोहन वीणा व सात्विक वीणा यांच्या जुगलबंदीने झाले. सुरूवातीला पंडीतजींनी स्वरचित विश्वरंजनी रागामध्ये आलाप, जोड , झाला, विलंबीत तिन तालात व मध्य व द्रुत लय तिन तालात सादर करून रसिकांना एका वेगळ्या रागाची अनुभूती रसिकांना दिली. १९९० दशकात अमेरिकेमध्ये पंडीतजींनी एका अल्बमची निर्मिती केली त्यामध्ये असलेली रचना “अ मिटींग बाय द रिव्हर” या रचनेसाठी ग्रॅमी ॲवार्ड दिले गेले हा ग्रॅमी ॲवार्ड सर्वप्रथम भारतात आणण्याचा मान पं. विश्वमोहन भट यांना मिळाला. त्याचसोबत राग जोग मधील एक उत्कृष्ट रचना सादर केली. ही रचनासुध्दा ग्रॕमी ॲवार्डमध्ये समाविष्ट होती. पंडीतजींच्या मैफिलाचा आणि २१ व्य बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप दोन्हीही कलावंतांनी जुगलबंदीच्या माध्यमातून वंदे मातरम् ने केला. त्यांच्याबरोबर तबल्याची संगत युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे बडोद्याचे हिंमाशू महंत यांनी केले.


रसिक श्रोत्यांचाही झाला गौरव


बालगंधर्व संगीत महोत्सवात या २१ व्या आर्वतनाच्या माध्यमातून ज्या रसिक श्रोत्यांनी ही २१ आवर्तने उपस्थित राहून हा महोत्सव काना- मनात साठवला आहे, अशा रसिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी व विश्वस्त प्रा.शरदचंद्र छापेकर यांच्याहस्ते कृतज्ञता गौरव करण्यात आला. यात इंद्रराव पाटील, दिगंबर महाजन, सुदिप्ता सरकार, मेजर नाना वाणी, देविदास पाटील तसेच मायटी ब्रदर्सच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे मिलींद थथ्थे यांचाही सन्मान झाला.


२२ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ५, ६ व ७ जानेवारी २०२४ ला
आभार प्रदर्शन करताना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दिपक चांदोरकर यांनी पुढील वर्षी बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ५, ६ व ७ जानेवारी २०२४ होणार असल्याचे जाहीर केले. तसेच याच महोत्सवाची एक मैफल ‘अभंगवाणी’ च्या माध्यमातून रविवार दि.१५ जानेवारी २०२३ ला महात्मा गांधी उद्यानात सकाळी ६.३० आयोजित करण्यात येणार असल्याची माहीत त्यांनी दिली. सुप्रसिद्ध निवेदिका दिप्ती भागवत यांनी संचालन केले. गुरूवंदना मयूर पाटील यांनी म्हटली.

2023 मध्ये गुंतवणुकीसाठी 5 सॉलिड म्युच्युअल फंड ; नवीन वर्षाची गुंतवणूक धोरण जाणून घ्या

2023 टॉप 5 म्युच्युअल फंड: जर तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरू करायची असेल, तर तुम्ही त्याची रणनीती वर्षाच्या सुरुवातीलाच बनवावी. जागतिक आणि देशांतर्गत मॅक्रो घटकांमुळे यंदाही अस्थिरता दिसून येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओमध्ये विविध श्रेणीतील निधी समाविष्ट करावा. 2022 मध्ये, किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. विशेषत: इक्विटी फंडांमध्ये सतत आवक होत होती. तुम्हाला 2023 मध्ये म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करून संपत्ती निर्मिती किंवा चांगले परतावा हवे असल्यास, तुम्ही केवळ मजबूत धोरणच बनवू नका तर गुंतवणुकीसाठी दर्जेदार फंड देखील निवडा.
2023 मध्ये रणनीती कशी बनवायची?
मनीफ्रंटचे सह-संस्थापक आणि सीईओ मोहित गँग म्हणतात की, या वर्षीही अस्थिरता दिसून येईल. म्हणूनच पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप फंड अधिक ठेवले पाहिजेत. स्मॉल आणि मिडकॅप्समध्ये मर्यादित एक्सपोजर असावे. गुंतवणूकदारांनी
मोठ्या, बहु आणि संतुलित श्रेणीतील फंडांमध्ये गुंतवणूक करावी.
मोहित गँगचे म्हणणे आहे की गुंतवणूकदारांनी एसआयपी किंवा एसटीपी पद्धतीने मोठ्या रकमेचे वाटप केले पाहिजे. वाटप 12-18 महिन्यांच्या पूर्ण चक्रात केले पाहिजे. ते म्हणतात की पोर्टफोलिओमध्ये मल्टी अॅसेट श्रेणी समाविष्ट करणे हा एक चांगला निर्णय असू शकतो. हे इक्विटी, डेट आणि कमोडिटीजचे अनोखे संयोजन देते.
2023 टॉप 5 म्युच्युअल फंड
  • प्रू. आयसीआयसीआय निफ्टी इंडेक्स फंड
  • डीएसपी निफ्टी मिडकॅप 150 क्वालिटी 50 इंडेक्स फंड
  • टाटा लार्ज आणि मिड कॅप
  • कोटक मल्टी कॅप फंड
  • प्रू आयसीआयसीआय मल्टी अॅसेट फंड
2023 मध्ये 17% वाढ अपेक्षित: AMFI
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये, म्युच्युअल फंड उद्योगाच्या मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) मध्ये 7 टक्के किंवा 2.65 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. याआधी 2021 मध्ये, त्याच्या AUM मध्ये सुमारे 22 टक्के वाढ झाली होती. AMFI चा अंदाज आहे की 2023 मध्ये उद्योग 16-17 टक्के दराने वाढेल.
आकडेवारीनुसार, या वर्षी नोव्हेंबरपर्यंत म्युच्युअल फंड उद्योगाचा आकार 40.37 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो त्याची विक्रमी पातळी आहे. 2021 च्या अखेरीस हा उद्योग 37.72 लाख कोटी रुपयांचा होता. तर 2020 मध्ये त्याचा आकार 31 लाख कोटी रुपये होता. 2022 मध्ये, रशिया-युक्रेन युद्ध, पुरवठा साखळी समस्या आणि वाढत्या व्याजदरांमुळे म्युच्युअल फंड उद्योग 2021 मध्ये वाढ साध्य करू शकला नाही. मात्र, 2023 हे वर्ष उद्योगासाठी अधिक चांगले ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
(अस्वीकरण: फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी येथे दिलेला सल्ला तज्ञांनी दिला आहे. ही Tradingbuzz.in ची मते नाहीत. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)
जॉईन Trading Buzz
Exit mobile version