माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेतली महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

जळगाव दि.16 प्रतिनिधी –  माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे संस्थापक श्री. शरद पवार यांनी ना.धों. महानोर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आज पळसखेड त्यांच्या शेतातील आनंदयात्री या निवासस्थानी घेतली. यावेळी त्यांच्या सोबत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, जैन इरिगेशन सि.लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, रंगनाथ काळे, माजी आमदार किशोर पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डाॕ. सुधीर भोंगळे, विजयअण्णा बोराडे, ॲड. रविंद्रभैय्या पाटील, संजय गरुड, डि. के. पाटील,  जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
ना. धों. महानोर यांचे चिरंजीव डाॕ. बाळासाहेब महानोर, गोपाळ महानोर, भाऊ पुंडलिक महानोर, मुली मिरा, सरला, रत्ना व नातु शशीकांत व नातवंड यांच्याशी पारिवारिक संवाद साधला. आनंदयात्री या निवासस्थानी जवळपास अर्धा तास कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली.
पळसखेडचे भुमिपुत्र कविवर्य ना. धों. महानोर व वाकोदचे उद्योजक भवरलालभाऊ जैन हे दोघंही माझे सहृदयी मित्र. दोघांनी शेत, शेती, माती आणि पाणी यासाठी आयुष्यभर व्रतस्थपणे कार्य केले. दोघं आता नाहीत मात्र त्यांचे कार्य हे शाश्वत आहे. कविवर्य ना. धों. महानोरांविषयी बोलताना  साहित्य, शेती आणि फळबागांच्या धोरणांवर शरद पवार यांनी मैत्रीपूर्ण आठवणी सांगितल्या. निसर्ग जवळून बघितला तेच त्यांच्या साहित्यात उतरले. त्यामुळेच शेतीविषयी वस्तुनिष्ठ धोरणांवर ते विधान परिषदेत भाष्य करत, अशी आठवण त्यांनी सांगितली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून व राजकीय माध्यमातून त्यांनी वाचा फोडल्याचे शरद पवार म्हणाले. 1980 साली जळगाव पासून जी शेतकरी दिंडी काढण्यात आली. त्याच्या आयोजनामध्ये कवी ना. धो.  महानोर यांचा पुढाकार होता. जळगाव ते नागपूर अशा निघालेल्या या दिंडीमध्ये मा. यशवंतराव चव्हाण साहेब, प्रा.  एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख व मी स्वतः तसेच प्रल्हादभाऊ पाटील व अनेक मान्यवर नेते सहभागी झाले होते. महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जावा असा आग्रह कवि ना. धों. महानोर यांनी धरून विधानपरिषदेत पाणी अडवा पाणी जिरवा, जलसंधारण, मृदसंधारण आणि बंधा-यांची साखळी उभी करण्याचा आग्रह धरला. त्यांनी  स्वतः पळसखेडे आणि वाकोदच्या परिसरात बंधा-याची साखळी उभी करून दाखवली. रोजगार हमी योजनेशी निगडित शंभर टक्के शासकीय अनुदानावरती जी फळबाग योजना 1990-91 मध्ये महाराष्ट्रात राबविण्यास प्रारंभ केला. या योजनेची मांडणी करण्यात हि कवि ना. धों. महानोरांचा पुढाकार होता. शेती, पाणी, फळबागा व वनीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्याचा फायदा संपूर्ण राज्याला कसा होईल, हे त्यांनी आवर्जून बघितले असेही श्री. शरद पवार म्हणाले.

वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय (बीएस्सी ॲग्रीकल्चर) सुरू करावे – शरद पवार यांचा अशोक जैन यांना सल्ला

जळगाव दि.16 (प्रतिनिधी) –  जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांची जन्मभूमी असलेल्या वाकोद येथील गौराई कृषी तंत्र निकेतन व कृषीतंत्र विद्यालयाला आज माजी केंद्रीय कृषी मंत्री श्री. शरद पवार यांनी भेट देऊन संस्थेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी श्री. शरद पवार यांचे स्वागत करून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी श्री. शरद पवार यांच्यासमवेत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र चौधरी, आशिष भिरूड, अजय काळे, जैन इरिगेशन सिस्टीम चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॕ.अनिल ढाके, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत यांनी कृषीशिक्षणास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याचे सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची या तंत्रनिकेतनामुळे मोठी सोय झाल्याचे निदर्शनास आणुन दिले.
कविवर्य ना. धों. महानोर यांचे गाव असलेल्या पळसखेडा पासून वाकोदचे अंतर चार किमीचे असुन भवरलाल जैन आणि कवि ना. धों. महानोर यांची मैत्री वाकोद गावातूनच लहानपणापासून वाढीला लागली. त्यांच्या आठवणीही हे तंत्रनिकेतन पाहताना जागृत झाल्या. या आठवणींना शरद पवार साहेबांनी यावेळी उजाळा दिला. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी वाकोदचा वटवृक्ष, वाघूरचे पाणी, मरुभुमीतुन बाहेर पडताना ही भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंची पुस्तके भेट दिली. वाकोदच्या या परिसरात ॲग्रिकल्चर बिएस्सी सुरू करावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्यासपिठ उपलब्ध करून द्यावे, असा सल्ला शरद पवार साहेबांनी यावेळी अशोक जैन यांना केला. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे गेल्या 13 वर्षांपासुन हे कृषी तंत्रनिकेतन चालविण्यात येत आहे. वाकोदच्या 108  एकर परिसरात प्रात्यक्षिसह हे तंत्रनिकेतन विस्ताराले आहे. सातत्याने कायम अ श्रेणीत, कृषि क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे कॕम्पस, उच्चविद्याविभुषित प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, सर्व सुविधायुक्त वसतीगृह, सुसज्ज ग्रंथालय व वाचनालय, बीएस्सी ॲग्रीची डीग्री पूर्ण करत असताना कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम देखील एकाच प्रक्षेत्रावर असलेली राज्यातील एकमेव संस्था आहे.

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ ठाणेला होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर आंतर जिल्हा चषक 2023 साठी रवाना

जळगाव दि. 13 जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ महाराष्ट्र राज्य ज्युनिअर आंतर जिल्हा चषक साठी रवाना झाला. महाराष्ट्र राज्य ज्युनिअर आंतर जिल्हा चषक 2023 च्या स्पर्धा दि. 15 ते 17 ऑगस्ट 2023 दरम्यान ठाणे येथील दादाजी कोंडदेव स्टेडियममध्ये होणार आहे.
जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या मुलींच्या संघात रीत नाथांनी, गीता पंडित, संस्कृती चौधरी, इशिका शर्मा, राजश्री पाटील तसेच मुलांच्या संघात शुभम चांदसरकर, तेजम केशव, करण पाटील, जाझीब शेख, अर्श शेख, रौनक चांडक, दक्ष चव्हाण यांची निवड झाली आहे. या खेळाडूंसोबत संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांची निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष तेजेंद्र महिंद्रा, सचिव विनीत जोशी, सहसचिव तनुज शर्मा, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य शेखर जाखेटे यांनी पुढील स्पर्धेसाठी संघाचे कौतूक करून शुभेच्छा दिल्या आहे.

(डावीकडून) खाली बसलेले अरविंद देशपांडे, चंद्रशेखर जाखेटे, विनीत जोशी, किशोर सिंह सिसोदिया. मागील रांगेत उभे असलेले रीत नाथांनी, गीता पंडित, संस्कृती चौधरी, इशिका शर्मा, राजश्री पाटील, शुभम चांदसरकर, तेजम केशव, करण पाटील, अर्श शेख, रौनक चांडक, दक्ष चव्हाण, जाझीब शेख.

भारतीय रेल्वेच्या नवरत्न कंपनीचा उत्कृष्ट निकाल, 1 वर्षात दिला 300% चा रिटर्न

रेल्वे विकास निगम लिमिटेड, भारतीय रेल्वेची पायाभूत सुविधा कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल (RVNL Q1 परिणाम) जाहीर केले आहेत. एकत्रित आधारावर, निव्वळ नफा 15.3 टक्क्यांच्या वाढीसह 343.1 कोटी रुपये झाला. 20.1 टक्क्यांच्या वाढीसह महसूल(revenue) 5571.6 कोटी रुपये झाला. स्टँडअलोन आधारावर निव्वळ नफा 333.57 कोटी रुपये आहे आणि वार्षिक 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महसूल 17.37 टक्क्यांच्या वाढीसह 5446 कोटी रुपये झाला. गेल्या आठवड्यात हा शेअर रु. 126.10 वर बंद झाला (RVNL शेअरची आजची किंमत).

RVNL Q1 Result

BSE सोबत शेअर केलेल्या माहितीनुसार, जून तिमाहीसाठी EBITDA 24.4 टक्क्यांनी वाढून 349.2 कोटी रुपये होता. EBITDA मार्जिन 6.1 टक्क्यांवरून 6.3 टक्क्यांपर्यंत वाढले. स्टँडअलोन ईपीएस म्हणजेच प्रति शेअर कमाई 1.60 रुपये होती. एकत्रित ईपीएस रु.1.72 वर होता.

RVNL शेअर कामगिरी

RVNL ही रेल्वे मंत्रालयाची नवरत्न कंपनी आहे. हा शेअर रु.126 वर आहे. 52 आठवड्यांचा उच्चांक 146.65 रुपये आणि नीचांकी 30.55 रुपये आहे. या समभागाने एका महिन्यात 4.2 टक्के, या वर्षी आतापर्यंत 85 टक्के, एका वर्षात 306 टक्के आणि तीन वर्षांत 551 टक्के परतावा दिला आहे. ही रेल्वेची मल्टीबॅगर कंपनी आहे.

वाजपेयी सरकारमध्ये स्थापन झाले

ही कंपनी 2003 मध्ये वाजपेयी सरकारमध्ये स्थापन झाली आणि 2005 मध्ये तिचे कामकाज सुरू झाले. सुरुवातीला याला मिनीरत्नचा दर्जा देण्यात आला होता. एप्रिल 2023 मध्ये कंपनीचे कामकाज आणि कामगिरी पाहता तिला नवरत्नाचा दर्जा देण्यात आला. गेल्या काही वर्षांत कंपनीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

RVNL ला नवरत्न दर्जा मिळाला

नवरत्न दर्जा मिळाल्यामुळे, कंपनी तिच्या एकूण संपत्तीच्या 30% पर्यंत गुंतवणूक करू शकते. कोणत्याही एका प्रकल्पात जास्तीत जास्त गुंतवणूक 1000 कोटी रुपयांपर्यंत असू शकते, ज्यासाठी सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही.

RVNL कसे काम करते?

RVNL चे काम रेल्वेचे प्रकल्प पूर्ण करण्यात मदत करणे हे आहे. प्रकल्पासाठी आर्थिक संसाधने गोळा करणे हे देखील त्याचे काम आहे. यासाठी ती वित्तीय संस्था, बँका, सार्वजनिक खाजगी भागीदारी यांचीही मदत घेते. जेव्हा RVNL प्रकल्प पूर्ण करते, तेव्हा ते त्याची देखभाल विभागीय रेल्वेकडे सोपवते.

RVNL उपलब्धी

कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, RVNL ने 462 नवीन लाईन टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. ४२९३ किमी लांबीच्या रेल्वे ट्रॅकचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. 2101 किलोमीटर ट्रॅकचे गेज रूपांतरण करण्यात आले आहे. 8782 किलोमीटर ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात आले. FY2022 च्या आधारे नेट वर्थ 5631 कोटी रुपये आहे. निव्वळ नफा 1087 कोटी रुपये होता.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त गांधीतीर्थ प्रश्नमंजुषेचे आयोजन

जळगाव दि. १२ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा’चे दि. १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान आयोजन केले आहे. या दरम्यान ‘गांधीतीर्थ’ या जगप्रसिद्ध संग्रहालयाला भेट देणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांसाठी या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. या काळात संग्रहालय पाहिल्यानंतर त्यावर आधारित प्रश्न अभ्यागतांना विचारण्यात येतील. तीन सलग प्रश्नांना बरोबर उत्तर देणाऱ्यास आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थला देश-विदेशातील लाखो लोकांनी आजपर्यंत भेट दिली आहे. जळगावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवीत असते. यावर्षी गांधीतीर्थ प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा जळगाव शहरातील नागरिकांसह, विद्यार्थी, शाळा-महाविद्यालये यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

गत वर्षाच्या तुलनेत तीनपट ३६.६ कोटींचा नफा

जळगाव दि. ८ (प्रतिनिधी) – भारतातील सर्वात मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आज पहिल्या तिमाहीचे एकल तसेच एकत्रित निकाल जाहीर केले. ८ ऑगस्ट रोजी जळगाव येथे झालेल्या कंपनी संचालक मंडळाच्या सभेत कंपनीने गत वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात तीनपटीहून अधिक म्हणजेच ३६.६ कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. सध्या कंपनीच्या हातात एकूण १९२९ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. त्यात अन्न प्रक्रिया विभागाकडे १००१.३ कोटी रुपयांच्या, हायटेक अॅग्री इनपुटसकडे ४०४.१ कोटी तर प्लास्टिक विभागाकडे ५२३.६ कोटी रुपयांच्या भरभक्कम ऑर्डर्स असल्याचे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.

कंपनीच्या तिमाहिच्या एकत्रीत महसुलाचा विचार केला असता गत आर्थिक वर्षात १४१६.२ कोटी रुपये होता तो या आर्थिक वर्षात २०.१ टक्क्यांनी वाढून १७०१.० कोटी रुपये झालेला आहे. व्याज, कर, घसारा आणि कर्जापूर्वीची रक्कम गत आर्थिक वर्षात १८०.४ कोटी रुपये तर या वर्षी ती २५.९ टक्क्यांनी वाढून २२७.१ कोटी रुपये इतकी झाली. एकत्रित कर पश्चात नफ्याचा विचार करता गत आर्थिक वर्षात तो ११.८ कोटी रुपये होता तो ह्या वर्षी तिप्पट झाला आहे म्हणजेच ३६.६ कोटी रुपये इतका झालेला आहे.

कंपनीचा गत आर्थिक वर्षातील एकल महसुल हा ८६१.७ तर ह्या वर्षी ३२.९ टक्क्यांनी वाढून ११४६ कोटी रुपये झाला. व्याज, कर, घसारा आणि कर्जापूर्वीची रक्कम गत आर्थिक वर्षात १०९.७ कोटी तर या वर्षी ती ४३.४ टक्क्यांनी वाढून १५७.३ कोटी रुपये इतकी झाली. कंपनीच्या एकल कर पश्चात नफ्याचा विचार करता गत आर्थिक वर्षात तोटा ५.५ कोटी रुपये होता तो ह्या वर्षी ५.८ पटीने वाढून २६.२ कोटी रुपये इतका झालेला आहे.

“३० जून २०२३ ला संपणाऱ्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. या काळात कंपनीच्या एमआयएस, पाईप्स आणि टिश्यू कल्चर विभागातील उत्पादनांना चांगल्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. सकारात्मक धोरणांमुळे कंपनीने वरील विभागात चांगला मार्केट शेअर मिळवला आहे. प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या किंमतीत थोडी घट आणि खेळत्या भांडवलाचे उत्तम व्यवस्थापन यामुळे एकत्रीत  संपूर्ण उत्पन्नात  २० टक्के आणि तिमाहीतील वाढ कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात २६ टक्के  करता आली. कंपनी संपूर्ण कर्ज कमी करणे, खेळत्या भांडवलाच्या चक्रात सुधारणा करणे आणि वाढीसह मार्जिनमध्ये पण सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे. उत्पादनांत नाविन्य, शेतकऱ्यांसाठी शाश्वत पर्यावरणाचे उपाय आणि वितरकांच्या जाळ्याचा विस्तार भारतात करणे यावर कंपनीचे व्यवस्थापन लक्ष केंद्रित करीत आहे. सध्याच्या आर्थिक  वर्षात आम्ही सकारात्मक वाटचाल दुसऱ्या तिमाहीत करत राहू अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी दिली. ”

 

आर्थिक वर्ष २०२३-२४ पहिल्या तिमाहीच्या एकल आर्थिक निकालाची ठळक वैशिष्ट्ये :-

  • कंपनीला प्लास्टिक विभागामध्ये किरकोळ बाजारातील चांगल्या ऑर्डर्स खास करून महाराष्ट्र, पश्चिम आणि दक्षिण भारतातील ऑर्डर्स जल जीवन मिशन (जेजेएम) उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे संपूर्ण उत्पन्नात ३३ टक्के वाढ साध्य करता आली आहे.

  • निर्यात आणि प्रकल्प व्यवसायातील अपेक्षित घट यामुळे हायटेक कृषी विभागातील उत्पन्न जवळजवळ मागील तुलनेत सपाट म्हणजे तसेच सारखे राहिले. परंतु किरकोळ एमआयएस (२० टक्के) आणि टिश्यू कल्चर (४४ टक्के) या व्यवसाय विभागात खूप चांगली वाढ कंपनीने नोंदवली आहे कारण कंपनीने या व्यवसायांमध्ये उत्तम लक्ष केंद्रित केले आहे.

  • प्लास्टिक विभागाची कामगिरी उत्तम असून त्यामध्ये १०३ टक्के वाढ साध्य केली. जल जीवन मिशन (जेजेएम) आणि पीव्हीसी पाईप्सला असलेल्या महाराष्ट्र व पश्चिम भारतातील राज्यांमध्ये असलेल्या चांगल्या मागण्यांमुळे या विभागात उत्तम ऑर्डर्समुळे ही वाढ करता आली.

आर्थिक वर्ष २०२३-२४च्या पहिल्या तिमाहीच्या एकत्रित आर्थिक निकालाची वैशिष्ट्ये :-

  • भारतातील पाईप आणि एमआयएस विभागातील चांगल्या ऑर्डर्समुळे संपूर्ण एकत्रित उत्पन्नात वाढ झाली आहे. प्लास्टिक विभागाच्या उत्तम कामगिरीमुळे जेआयएसएलला चांगला मार्जिन कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात साध्य करता आला.

  • हायटेक विभागात किरकोळ एमआयएस (२०टक्के वाढ) आणि टिश्यूकल्चर (४४ टक्के वाढ) झाली पण प्रकल्प आणि निर्यात व्यवसायांमध्ये मात्र अपेक्षित घट झाली. त्यामुळे हायटेक विभागाच्या संपूर्ण उत्पन्नात ३ टक्क्यांनी घट झाली.

  • जल जीवन मिशनला चांगला पुरवठा केल्यामुळे आणि पीव्हीसी व पीई पाईपमधील महाराष्ट्रातून असलेल्या चांगल्या ऑर्डर्समुळे ७.९ टक्के वाढ प्लास्टिक व्यवसायात नोंदवता आली.

  • भारतातील भाज्या निर्जलीकरण व्यवसायाने ९.८ टक्क्यांची आणि विदेशातील कृषी विभागात झालेल्या ७.६ टक्के वाढ साध्य केली. अंतिम गतवर्षी फळ प्रक्रिया विभागाने मात्र वजा वाढ एकत्रित निकालात नोंदवली. याचे कारण म्हणजे कच्च्या मालाची अनुपलब्धता असल्याने पक्का माल शिल्लक राहीला नाही.

अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ठ नेपथ्य म्हणून गौरव

जळगाव दि. ८ प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१ वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा व १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा विभागीय स्तरावर घेण्यात आली. यामध्ये नाशिक विभागातून जळगाव केंद्रावर जानेवारी २०२३ मध्ये ही स्पर्धा झाली.

प्राथमिक फेरीत २२ च्यावर बालनाट्य जळगाव केंद्रावर सादर झालीत. यात भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव या संस्थेने ‘ढ नावाची आधुनिकता’ हे बालनाट्य सादर केले. ‘ढ नावाची आधुनिकता’ या नाटकासाठी अरविंद बडगुजर यांनी उत्कृष्ट नेपथ्य केले. नाशिक विभागातून अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ट नेपथ्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.

नाशिक येथील परशुराम साईखेडेकर नाट्यगृहात ७ जुलै ला हा सन्मान सोहळा झाला. यावेळी ज्येष्ठ नेपथ्यकर्मी चंद्रकांत जाडकर, जयदीप पवार, विजय साळवी, विभागीय पारितोषिक वितरण समारंभ समन्वय राजेश जाधव, मीना वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते अरविंद बडगुजर यांनी पुरस्कार स्वीकारला. अरविंद बडगुजर यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी कौतूक केले आहे.

कोल इंडिया, ओएनजीसी या कंपन्यांचे निकाल या आठवड्यात येतील; कोणत्या घटकांचा बाजारावर मोठा प्रभाव पडेल ते जाणून घ्या

निकालाचा हंगाम सुरू आहे. या आठवड्यात अदानी पोर्ट्स, कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प, हिंदाल्को आणि ओएनजीसी सारख्या मोठ्या कंपन्यांचे निकाल येतील. याशिवाय रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरणाची बैठकही होणार आहे. एमपीसीचे निर्णय 10 ऑगस्ट रोजी जाहीर केले जातील. 11 ऑगस्ट रोजी आयआयपी आणि मॅन्युफॅक्चरिंग क्रियाकलापांचे आकडे येतील. याशिवाय जागतिक बाजाराचा कल, तेलाच्या किमतीतील चढउतार आणि परदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन याचाही बाजारावर परिणाम होईल, असे विश्लेषकांनी सांगितले आहे.

सेन्सेक्स 439 अंकांनी घसरला

बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण झाली. गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने 439 अंकांची घसरण नोंदवली. एफआयआयही सातत्याने माघार घेत आहेत. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक प्रवेश गौर म्हणाले, “बाजाराचे लक्ष RBI मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC) च्या बैठकीकडे असेल, ज्याचे निकाल 10 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केले जातील.” याशिवाय अदानी पोर्ट्स, कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प, हिंडाल्को आणि ओएनजीसी या प्रमुख कंपन्यांचे तिमाही निकालही पाहण्यात येणार आहेत.तेलच्या किमतींचाही बाजारावर परिणाम होईल.

RBI चे धोरणात्मक निर्णय सर्वात महत्वाचे आहेत

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​रिटेल रिसर्चचे प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, या आठवड्यात प्रामुख्याने आरबीआयच्या धोरणात्मक बैठकीवर लक्ष केंद्रित केले जाईल आणि व्याजदर संवेदनशील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

निफ्टी 19655-19296 च्या रेंजमध्ये राहील

एचडीएफसी सिक्युरिटीजचे तांत्रिक संशोधन विश्लेषक नागराज शेट्टी यांनी सांगितले की, निफ्टीचा कल अल्प मुदतीसाठी नकारात्मक आहे. 19600-19650 च्या पातळीवर एक प्रतिकार आहे. निफ्टीला 19400 च्या पातळीवर मध्यवर्ती सपोर्ट आहे. दुसरीकडे, ब्रोकरेजचे किरकोळ संशोधन प्रमुख दीपक जसानी म्हणाले की, निफ्टी नजीकच्या काळात 19655-19296 च्या श्रेणीत व्यापार करेल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, अल्पावधीत, त्याची श्रेणी 19796 – 19201 दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत बाजार रेंज बाउंड राहील. खालच्या स्तरावर खरेदीचा दबाव तर वरच्या स्तरावर नफा बुकिंगचा दिसून येईल.

कविवर्य ना. धों . महानोर यांच्यावर पळसखेड येथे ४ ऑगस्टला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव, दि ३ (प्रतिनिधी) – निसर्गकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर दिनांक ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात पळसखेड जिल्हा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील त्यांच्या शेतात ‘सुलोचना बाग’ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुप्रसिद्ध कवीवर्य पद्मश्री महानोर दादा यांचे पुणे येथे दि. ३ ऑगस्ट रोजी औषधोपचार दरम्यान रुबी  हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. त्यांचे पश्चात दोन मुलं, तीन मुली, सुना, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी सौ. सुलोचना महानोर यांचे दुःखद निधन झाले होते.

नागरिकांच्या गोपनीयतेसाठी पीसी, टॅबलेटच्या आयातीवर बंदी, आयात करण्यासाठी घ्यावी लागणार परवानगी

भारत सरकारने संगणक, लॅपटॉप, पीसी आणि टॅब्लेट इत्यादींच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. परकीय व्यापार महासंचालक (DGFT) ने त्याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. DGFT सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील नागरिकांची सुरक्षा आणि गोपनीयतेचे रक्षण करणे आवश्यक होते, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय इंटरनेट ज्या पद्धतीने वाढत आहे, त्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.

आयात निर्बंधावर DGFT: बॅगेज नियम सूट

डीजीएफटीच्या सूत्रांच्या मते, देशातील आयटी कंपन्या आणि उत्पादन वाढवण्यासाठी हे एक प्रभावी पाऊल आहे. त्याच वेळी, अनेक मशीन्स आणि हार्डवेअरमध्ये सुरक्षेशी संबंधित चिंता प्रकट झाल्या. त्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आले आहे. या पायरीद्वारे, मानकांपेक्षा कमी आयातीवर अंकुश लावावा लागेल. तथापि, बॅगेज नियमात यासाठी सूट आहे म्हणजेच लॅपटॉप प्रवासासाठी घेता येईल. याशिवाय तुम्ही फक्त एक नवीन लॅपटॉप आणू शकता.

आयात निर्बंधावर DGFT: या वस्तू आणण्यासाठी परवानगी आवश्यक असेल

डीजीएफटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वस्तूंचे शिपमेंट आणि बिलिंग आजपूर्वी झाले आहे, त्या वस्तू आणल्या जाऊ शकतात. लेटर ऑफ क्रेडिटसह वस्तू ३१ ऑगस्टपर्यंत देशात आणता येतील, त्यानंतर परवाना घेणे बंधनकारक असेल. भविष्यातील धोके लक्षात घेऊन हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सरकार लवकरच परवाना, विश्वसनीय स्रोत इत्यादीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. सरकार परवान्यासाठी पोर्टल बनवत आहे. त्यावर अर्ज देऊ शकतात. त्यासाठी आवश्यक व अधिक माहिती मागवली जाईल.

आयात निर्बंधावर DGFT: देशांतर्गत उत्पादनाला गती येईल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारला विश्वास आहे की हे पाऊल देशांतर्गत उत्पादनाला गती देईल. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की आयात करब तात्काळ प्रभावाने लागू आहे. उत्पादनाची आयात निर्बंधांच्या श्रेणीमध्ये ठेवली म्हणजे त्यांच्या आयातीसाठी परवाना किंवा सरकारची परवानगी अनिवार्य असेल. DGFT च्या अधिसूचनेनुसार, असे म्हटले आहे की संशोधन आणि विकास, चाचणी, बेंचमार्किंग, मूल्यांकन, दुरुस्ती आणि उत्पादन विकासाच्या उद्देशाने, आता प्रति बॅच 20 पर्यंत वस्तूंना आयात परवान्यातून सूट दिली जाईल.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version