‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ प्रदर्शनातून क्रांतिकारक इतिहासाचे स्मरण – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव दि. 15 – गांधी रिसर्च फाऊंडेशन जिल्ह्यासाठी मानबिंदू असून फाऊंडेशनतर्फे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक उपक्रम सदैव सुरू असतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपल्या गौरवशाली, क्रांतिकारी इतिहासाची आठवण प्रदर्शन पाहिल्यानंतर होते. स्वातंत्र्याचा इतिहास चित्रस्वरूपात रोचकपध्दतीने मांडण्यात आला असून त्यात संविधान निर्मिती, संस्थाने विलगिकरणसह अन्य महत्त्वाच्या बाबी युवा पिढीला प्रेरक आहे. असे सांगत स्वातंत्र्याची गाथा समजून घेण्यासाठी जळगावकरांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. यावेळी महात्मा गांधी उद्यानातील ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईटचेही उद्घाटन करण्यात आले.

महात्मा गांधी उद्यानातील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’प्रदर्शनाच्या उद्धघाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशन सिस्टीम लि. अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरतदादा अमळकर, विजय मोहरील, बी. डी. पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, उदय पाटील, विराज कावडीया, अमित जगताप, राजेश नाईक, उदय महाजन, डाॕ. अश्विन झाला, नितीन चोपडा, आशिष भिरूड उपस्थित होते.
पुढे बोलताना अभिजीत राऊत म्हणाले, सर्वसामान्यांना स्वातंत्र्य आणि संविधानातील मुलभूत अधिकार व कर्तव्यांची वास्तविक जाणिव व्हावी जेणेकरून संविधानावर आधारित राष्ट्रनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल; यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले.

भारतावर ब्रिटिशांनी केलेल्या अन्याय अत्याचाराविरूध्द स्वातंत्र्य सैनिकांनी चळवळ, आंदोलनांच्या माध्यमातून प्रतिकार केला. वेगवेगळ्या ठिकाणांची स्वातंत्र्य सैनिकांची भुमिका ऐतिहासिक ठरली. त्याग, बलिदानातून भारताची शौर्य गाथा लिहली गेली. स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शनात शिक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था,समाजव्यवस्था आणि मूल्यव्यवस्थेची समृद्ध परंपरा समजून घेता येते.
भारतातील संस्कृती, भौगोलिक विविधेतुन समृद्ध नैसर्गिक संपदा, प्रेम सहिष्णुतेची शिकवण यामुळेच भारत म्हणजे सोन्याची खाण असे म्हटले जायचे. प्रदर्शनात पहिले पॕनेल हे ‘भारत सोने की चिडीया’ हे भारतातील नैसर्गिक सौंदर्य, वास्तू, शिल्प यासह समृद्ध वारसा दर्शविते.
ऐतिहासिक स्थळे हा गौरवशाली इतिहास ते 1947 पर्यंत च्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्वपूर्ण घटनांची माहिती, महात्मा गांधी आणि गांधी युगाव्दारे स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न, नेताजी सुभाषचंद्र बोस सह अन्य स्वातंत्र्यविरांच्या रचनात्मक भुमिका, यासह अनेक बाबींवर तथ्यांच्या आधारावर तपासून छायाचित्रांसह जळगावकरांना आपला गौरवशाली इतिहास अनुभवता येत आहे. या प्रदर्शनात स्वातंत्र्य अर्ध्या रात्रीच का मिळाले? असे अनेक रोचक प्रश्नाचे आकलन होते. भारतीय राष्ट्रध्वज, संविधान, स्वातंत्र्य संग्राम आणि संस्थांनाचे भारतात विलगीकरणातुन संयुक्त भारत अशी वस्तुनिष्ठ माहीती नागरिकांना मिळते.
भारतीय राष्ट्रध्वजाचा आरंभ कसा झाला त्याची निर्मिती प्रक्रिया, काळानुसार बदलेले राष्ट्रध्वजाचे स्वरूप हा इतिहास यातून उलगडा आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी संपूर्ण भारतातील राजे, राजवाडे, संस्थाने भारतात विलगिकरण कसे झाले, त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची भुमिका अशी रोचक माहिती प्रदर्शनातुन नागरिकसमोर मांडली आहे. स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी संविधान कसे महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून राष्ट्रनिर्माण करण्यासाठी संविधानाची आवश्यकता, संविधान या संकल्पनेविषयी प्रदर्शनात माहिती आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी योगेश संधानशिवे, अशोक चौधरी, सी. डी. पाटील, निवृत्ती वाघ यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी यांनी सहकार्य केले. डाॕ. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.
शाळा, महाविद्यालयांसाठी अभ्याससहल
महात्मा गांधी उद्यानातील प्रदर्शन सकाळी 7 ते 10 तर संध्याकाळी 5 ते 10 दरम्यान सर्वांनसाठी खुले असेल. तसेच शाळा, महाविद्यालयांना विशेष गृपसह प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. त्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व्यवस्थापनाची परवानगी घ्यावी लागेल. यासाठी निलेश पाटील मो.9404955300; 02572264803 यांच्याशी संपर्क करावा,असे कळविले आहे.
आय लव्ह जळगाव….
महात्मा गांधी उद्यानातील सौदंर्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईट निर्मिती करण्यात आली आहे. या सेल्फी पाँईटचे लोकार्पण आज स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार प्रदान

जळगाव, दि. 13 : – आचार्य अत्रे हे साहित्य, नाट्य,  चित्रपट, उद्योग,  वक्तृत्व  असा सर्वच क्षेत्रांतील सार्वभौम उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने मिळालेले मानचिन्ह मी कृतज्ञतेने स्विकारतो असे प्रतिपादन  कविवर्य ना. धों. महानोर यांनी  सत्काराला उत्तर देताना केले.
संयुक्त महाराष्ट्राचे झुंजार सेनापती, साहित्य सम्राट, आचार्य प्र. के. अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीदिनी (१३ ऑगस्ट) आचार्य अत्रे मानचिन्हाचा पुरस्कार यावर्षी प्रख्यात कवी ना. धो. महानोर यांना प्रदान केला. ‘आत्रेय’ तर्फे हा पुरस्कार प्रदान समारंभ पहिल्याप्रथम मुंबई शिवाय खानदेशात जैन हिल्सला झाला.  व्यासपीठावर कविवर्य ना. धों. महानोर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आ. शिरीष चौधरी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित होते.
आरंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ‘आत्रेय’ संस्था तर्फे राजेंद्र  पै यांनी मान्यवरांचे स्वागत केले.  परिवर्तन संस्थेचे कलाकार वैशाली शिरसाळे, अक्षय गजभिये, सुदीप्ता सरकार  यांनी आचार्य अत्रे व बहिणाबाई चौधरी यांचे गीत सादर केले. ह्या सादरीकरण बद्दल शंभू पाटील यांनी सांगितले.  आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै यांनी प्रास्ताविक  केले.
माझे वडील शिक्षण मंत्री होते भूगोलाच्या पुस्तकात चूक झाली होती. अत्रे साहेबांनी त्यांच्या पेपर मध्ये खुलासा छापला ह्या बाबत आचार्य अत्रे यांची आठवण सांगितली. आमच्या वडिलांना अत्रे भाचेबुवा म्हणायचे त्यांचा स्नेह आम्हाला लाभला असे आ. शिरीष चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रमात इंद्रायणी सावरकर  लिखित ‘महाराष्ट्राचा महासंग्राम’ पुस्तकाचं प्रकाशन कविवर्य महानोर यांच्या हस्ते करण्यात आले.
अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान झाल्यावर मनोगत व्यक्त केले. महानोर दादा म्हणजे निसर्ग, शेतकरी, रानातली कविता,  लोकसाहित्य, निसर्गाशी नाळ जोडून ठेवलेल्या महानोर दादा बद्दल त्यांनी गुणवैशिष्ट्ये सांगितले.  दादांना पानझड पुस्तकाला साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला त्यावेळी मोठा सत्कार झाला होता.  त्यावेळी माझ्या वडिलांनी मिरवणुकीचि बैलगाडी चालवली होती दादांचा हा सत्कार म्हणजे भवरलालजी व महानोर दादा यांच्या मित्रत्वाचा सत्कार होय असे आवर्जून सांगितले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर भावे यांनी तर आभारप्रदर्शन राजेंद्र पै यांनी केले. मंजुषा भिडे यांनी म्हटलेल्या वंदे मातरम राष्ट्रगीताने झाला.

गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानच्या वतीने निमखेडी शिवारात वृक्षारोपण

जळगाव : निमखेडी शिवारातील राधिका पॉइंटजवळील खुल्या भूखंडामध्ये स्थानिक रहिवाशांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या सहकार्यातून सुरू असलेल्या हरित जळगाव या उपक्रमांतर्गत निमखेडी शिवारातील गट नं. 111 मधील खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, हेमंत बेलसरे, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील, राजेंद्र माळी, नगरसेवक मनोज चौधरी, नगरसेविका प्रतिभा पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण धांडे, अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. यावेळी निंब, करंज, बकूळ, वड, पिंपळ, गुलमोहर, जास्वंद, कन्हेर, चांदणी, बेल अशी 100 च्यावर झाडांची लागवड केली. नितीन साठे, नरेंद्र रडे, संजय कापुरे, रामदास अत्तरदे, तुळशीराम निकम, विजया ठाकरे, शंकुतला भंगाळे, कल्पना धांडे, कल्पना सोनवणे, रजनी ठाकूर यांच्यासह नागरिकांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला. तसेच उत्कर्ष मतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. सुधीर पाटील यांनी जागतिक तापमान वाढ होत असल्याने संभाव्य धोके नागरिकांच्या लक्षात आणून देत वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. तर हेमंत बेलसरे यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमाबाबत सांगितले. मनोज चौधरी व प्रतिभा पाटील यांनी रहिवाशांच्या मागणीनुसार अपेक्षा पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत उपक्रमास पाठिंबा दिल्या. लक्ष्मण धांडे यांनी प्रास्ताविक केले. संजय कापुरे, सर्जेराव पाटील, शंकुतला भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा सुधीर पाटील यांनी दिली.

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार

जळगाव : संयुक्त महाराष्ट्राचे झुंजार सेनापती, साहित्य सम्राट, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीदिनी (१३ ऑगस्ट) आचार्य अत्रे मानचिन्हाचा पुरस्कार यावर्षी प्रख्यात कवी ना. धो. महानोर यांना प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा समारंभ खानदेशच्या मातीत जळगाव येथे १३ ऑगस्ट २०२२ रोजी कस्तुरबा सभागृह, गांधी तीर्थ, जळगाव येथे सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे.
आचार्य अत्रे यांचे निधन १३ जून १९६९ रोजी झाले. त्यानंतर १९७१ पासून २०२१ पर्यंत ‘साहित्यसम्राट आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार’ प्रदान करण्याचे कार्यक्रम मुंबईत आणि पुण्यात झाले. दिनांक १३ ऑगस्ट रोजी जळगावात होणारा हा पुरस्कार प्रदान समारंभ पहिल्याप्रथम खानदेशात होत आहे. आचार्य अत्रे यांचे खानदेशच्या मातीशी घनिष्ठ संबंध होते. प्रख्यात कवी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचे महाराष्ट्रभर कौतुक करण्याचे काम पहिल्याप्रथम आचार्य अत्रे यांनी केले. दैनिक मराठातून बहिणाबाईंच्या कवितांवरचा गाजलेला अग्रलेख आजही महाराष्ट्रात चर्चेत असतो. श्री. सोपानदेव चौधरी आचार्य अत्रे यांचे खास मित्र होते. याखेरिज आचार्य अत्रे यांच्या द्वितीय कन्या श्रीमती मिनाताई देशपांडे यांचा विवाह धुळे येथील प्रा. सुधाकर देशपांडे यांच्याशी झाल्यामुळे अत्रे कुटुंबीयांचा खानदेशची जवळचा संबंध आहे.
‘आत्रेय’ तर्फे अॅड. राजेंद्र पै यांनी जाहीर केला. ते आचार्य अत्रे यांचे नातू आहेत. हा कार्यक्रम मुंबईत न करता जळगाव येथेच करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रख्यात उद्योगपती श्री. अशोकभाऊ भवरलाल जैन यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. आमदार शिरीष मधुकरराव चौधरी हे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खानदेशमध्ये होणाऱ्या आचार्य अत्रे जयंती समारंभाला उपस्थित राहावे, अशी विनंती अॅड. राजेंद्र पै यांनी केली आहे. या समारंभाला स्व. सुधाकर देशपांडे यांचे सुपुत्र अमेरिकेत असणारे अॅड. हर्षवर्धन देशपांडे हेसुद्धा उपस्थित राहून खानदेशच्या भूमिला अभिवादन करायला येणार आहेत.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘भारत से जुडे रहो’ संवादात्मक कार्यक्रम

जळगाव – भारतात प्रतिभावान युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. हिच प्रतिभा भारताला सामर्थ्यशाली बनवू शकते फक्त तरूणांच्या अवलोकन, विश्लेषण आणि परिश्रमातून नवसंकल्पनेला चालना देणाची गरज आहे. पुरक वातावरणातून ते शक्य आहे. माझ्या भारताला शक्तिशाली देश बनविण्यासाठी, देशाचा उत्कर्ष साध्य करण्यासाठी, युवकांनी चौकटीबाहेरचा विचार करून सर्वात आधी देश ही भावना संवेदनशील मनाने स्वीकारली पाहिजे; असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनाच्या 80 व्या जयंती व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘भारत से जुडे रहो’ हा संवादात्मक कार्यक्रमाप्रसंगी कुलगुरू बोलत होते. कस्तूरबा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, प्रमुख वक्ते म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, ज्येष्ठ गांधीयन व समाजसेवक प्रा. शेखर सोनाळकर आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रीसर्च डीन प्रो. गीता धर्मपाल हे उपस्थित होते.
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे रिसर्च डीन प्रो. गीता धर्मपाल यांनी प्रास्ताविक केले. 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधीजींनी इंग्रजांना चले जाव, भारत छोडोचा नारा दिला. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित असतांना विदेशातील भारतीयांना भारत से जुडे रहा!  सांगण्याची गरज आहे. आपण विदेशात राहिलो व पुन्हा भारतात परत येऊन भारताशी स्वत: एकरूप करून घेतले याचा अभिमान असल्याचे सांगितले.
कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी वेगळ्यापद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला देशाला समृद्ध शक्तीशाली बनविण्यासाठी ज्ञानाचे व्यवसायात, समाजाच्या कल्याणासाठी रूपांतर कसे करावे, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. यासाठी छोट्या कल्पनांना मोठ्या प्रकल्पांमध्ये कसे परावर्तित करता येईल; यासाठी प्रयत्न करणे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जैन इरिगेशन होय, असेही कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी आवर्जून सांगितले.
दुसऱ्याचं वेगळेपण आपण स्वीकारले पाहिजे – प्रा. शेखर सोनाळकर
प्रा. शेखर सोनाळकर यांनी मुक्तपणे संवाद साधला. त्यात ते म्हणाले; भारत हा विविध परंपरा, भाषा, दैवत, संस्कृती, खाद्य पदार्थ इत्यादी भिन्न व वेगळेपणाचे आहेत. त्या वैविध्याचा आदरपुर्वक स्वीकारण करणे म्हणजे भारताशी स्वत: जोडून घेणे होय. प्रेम, अहिंसा, संवाद आणि विश्वास हे माणसाला जोडण्याचे काम करत असतात आणि यातून देशभावना, देशप्रेम, जाज्वल्य देशभक्ती जागृत होते. आनंद व्यक्ती जशी सुंदर दिसते तसे माणसे, समाज आणि देश आनंदीत बनवावे. प्रेम, आपलुकीच्या, करूणेच्या, संवेदनशीतेच्या, अहिंसेच्या आधारे आपल्या देशाला आपले म्हणायचे आणि या देशाला आपल्याशी जोडूनच ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उपस्थित मान्यवरांनी उत्तरे दिली. अध्यक्षीय समारोप करतांना अशोक जैन यांनी भारताशी जोडून घेण्याआधी आपण कुटुंबाशी स्वत: ला जोडून घेतले आहे का? असा प्रश्न प्रत्येकाने मनात विचारला पाहिजे आणि तसे सकारात्मक वर्तन करायला हवे, जेणे करून आपण आपल्या देशाकडे कोणत्या नजरेने पाहतो हे समजते. याच भावनेवर भविष्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या भारत महासत्ता होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
दीपप्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रशांत सूर्यवंशी यांनी प्रेरणा गित म्हटले. गिरीष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आभार सुधीर पाटील यांनी मानले. उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरास्वरूपात संवाद साधला. संबंधित कार्यक्रम गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या फेसबुक आणि युट्यूब https://m.youtube.com/watch?v=SFEBAByrLQ4  या अधिकृत लिंकवर बघता येईल.

शिवकाॕलनीत घर घर वृक्षारोपणाचा संकल्प

जळगाव दि.६ प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त ‘घर घर तिरंगा’ या मोहिमेसोबतच ‘घर घर वृक्षारोपण’ करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प शिवलनी परिसरातील सप्तश्रृंगी चौकातील रहिवाश्यांनी केला.
गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जैन इरिगेशन सिस्टीम लि.च्या सहकार्याने हरित जळगाव हा सृजनशिल उपक्रम सुरू आहे. आज शिवकाॕलनीतील कोल्हेनगर (पश्चिम) येथील सप्तश्रृंगी चौकालगत असलेल्या गट नं. ५९ च्या हनुमान मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अनिल जोशी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, हेमंत बेलसरे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, अरूण नारायण आसोदेकर, विनय पवार, महेश पाटील,किरण आसोदेकर, पारोळा वनअधिकारी बी. एस. पाटील, मुकंद वाणी, चंद्रकांत बाविस्कर, अमोल चौधरी यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते. उपस्थितांनी निंब, करंज, बकूळ, कांचन, बुच, चांदणी, कन्हेर, जास्वंद, बेल, पारिजातक, पळस, अमलतास अशा १०० च्यावर रोपांची लागवड करण्यात आली. रहिवाश्यांनी वृक्षसंर्वधनाची प्रतिज्ञा घेत प्रत्येक घरासमोर एक झाड जगविण्याचा संकल्प केला. ॲड. जमिल देशपांडे यांनी फाऊंडेशन व प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील सहकारी मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, मयूर देशमुख, किशोर ताळे, प्रतिक फुसे, दिलीप मते, निलेश मिस्तरी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

सांस्कृतिक कार्यसंचलनायतर्फे बालगंधर्व स्मृतीदिनानिमित्त आयोजित नाट्य संगीत रजनी सुरेल मैफलीने रसिक तल्लीन

जळगाव दि.30 प्रतिनिधी* – बालगंधर्व स्मृती दिनानिमित्ताने “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजन करण्यात आले होते. यात नाट्य, संगीताने असंख्य रसिकांच्या मनात चांदणे फुलविले.
सं. मामापमान नाटकातील नांदीने अर्थात ” नमन नटवरा विस्मयककारा” त्यानंतर प्राजक्ताने सं. स्वयंवर नाटकातील “नाथ हा माझा” हे अजरामर नाट्यपद सादर करून सांस्कृतिक मैफिलीची सुरूवात झाली. नमन नटवरा विस्मयककारा..या नांदीने रसिकांच्या काळजात कलाकरांनी जागा निर्माण केली. भास्करबुवा बखलेंचे संगित स्वयंवरातील नाट्यपदाने बालगंधर्वांचे स्मरण करून दिले. नाट्यपदांच्या माध्यमातून सुरांची मैफल रंगत गेली. त्यानंतर सं. मत्स्यगंधा नाटकातील “गुंतता हृदय हे” ने रसिकांची दाद दिली. “मम आत्मा गमला” हे नाट्यपद सादर केले. त्यानंतर देवघरचे ज्ञात कुणाला, ब्रह्ममूर्तीमंत, श्रीरंगा, बहुत दिन नच भेटलो, अवघे गरजे, रमणी मजसी निजधाम, सुरत पिया, नच सुंदरी, युवतीमना, हे सुरांनो अशी एकाहून एक सरस संगीताची मैफल रंगली. नाथ हा माझा…, रूप बली तो…, नयने लाजवित.., यासह भैरवीने नाट्य संगित रजनी मैफलीची सांगता झाली.
सुरूवातीला दीपप्रज्वलन झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, डॉ.अनुराधा राऊत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी,कलाकार प्राजक्ता काकतकर व ओंकार प्रभुघाटे यांच्याहस्ते संपन्न झाले.
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व या नावाने लोकप्रिय असलेले, विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. ज्या काळी रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नसत त्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे ज्यांनी मोठी लोकप्रियता कमवली. अशा थोर बालगंधर्व यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर येथे केले होते. मराठी संगीत रंगभूमीला लोकप्रिय आणि समृध्द करण्यात बालगंर्धांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात प्राजक्ता काकतकर, ओंकार प्रभुघाटे या कलाकारांनी आपली कला सादर केली. तबला साथ धनंजय पुराणिक, ऑर्गन मकरंद कुंडले यांनी दिली. कार्यक्रमाची संकल्पना व सादरीकरण स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन दिप्ती भागवत यांनी केले. प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे मयूर पाटील यांनी गुरूवंदना सादर केली.

सीआयएससीई बोर्डच्या दहावीच्या परिक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगाव दि.26 प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 10 वी आयसीएसईचा निकाल नुकताच जाहिर झालास्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखलीअनुभूती स्कूलमधून कुदेब्बार्ना दास ही 96.4 टक्के गुणांसह प्रथम आलीतिला गणित याविषयात पैकीच्या पैकी 100 गुण प्राप्त झालेतर इतिहासभुगोलमध्ये 98, विज्ञान 96, इंग्रजी 90, हिंदी 92, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये 98 गुण मिळालेदक्ष जतिन हरीया हा विद्यार्थी 96 टक्क्यांसह द्वितीय क्रमांकरिषभ विनोद कुमार हा विद्यार्थी 94.6 टक्क्यांसह तृतीयतेजस ललितकुमार जैन हा विद्यार्थी 94 टक्क्यांसह चतुर्थ तर प्रसाद प्रदीप नाईक 93.2 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेतराष्ट्रीय पातळीवरील आयसीएसईच्या परिक्षेत 2,31,063 विद्यार्थी सहभागी झाले होतेत्यापैकी 1,05,369 विद्यार्थीनी तर 1,25,635 विद्यार्थी यशस्वी झालेतयामध्ये अनुभूती निवासी स्कूलमधून 39 विद्यार्थी परिक्षेत सहभागी झाले ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेयंदाच्या निकालामध्ये 90 टक्क्यांच्यावर 12 विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले तर 80 टक्क्यांच्यावर 21 विद्यार्थ्यांचा समावेश आहेविषयानुसार 90 गुणांच्यावर इतिहासभुगोल 18, हिंदीमराठी 16, गणित 15, इंग्रजी 8, विज्ञानमध्ये 7 तर कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये 14, विद्यार्थी आहेतसंपूर्ण भारतातून आयसीएसई शाळांध्ये अनुभूती स्कूलने आपला ठसा उमटविला आहे.

अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील पहिलीच शाळा आहेसंस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावीएकमेकांमधील निर्भरता वाढावीआंत्रपिनर्स निर्माण होणे यादृष्टीने अनुभूती स्कूलतर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक जाणिवेसह संवेदनशील नागरीक घडावे यासाठी गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जात आहेतविद्यार्थ्यांवर शाळेत पाचवी पासूनच विशेष लक्ष दिले जातेशालेय अभ्यासक्रमाच्या शिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना पर्यावरणापासून ते जागतिक पातळीवरच्या विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून दिशा मिळावी यासाठी वर्षभर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नियोजन अनुभूती निवासी स्कूलतर्फे केले जातेयातून विविध क्षेत्रात विद्यार्थी यश संपादित करीत आहे. ‘ग्रीनस्कूल म्हणून ख्याती असलेल्या या स्कूलमध्ये अभ्यासास अनुकूल वातावरण आहेअभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना देखील वाव मिळतो त्यामुळे चौफेर प्रगती विद्यार्थ्यांना करता येते विद्यार्थ्यांनी हे शंभर टक्के यश संपादन केले.’ या शब्दात अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासिस दास यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांवरील व्यक्तिगत लक्षप्रशस्त ग्रंथालयतज्ज्ञ शिक्षकांसह विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्याकडून अभ्यासाबरोबरच कलागुण जोपासले जातात यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होतेवर्षभर शिक्षक व शिक्षकतेतर कर्मचारांमुळे विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाल्याचे सांगत अनुभूती स्कूलच्या संचालिका सौनिशा अनिल जैनजैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैनसहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

वृक्षसंवर्धन प्रत्येकाची जबाबदारी – आयुक्त विद्या गायकवाड

जळगाव दि. २४ प्रतिनिधी – वृक्ष सावलीसह फळ देतात. जैवविविधता वृक्षांमुळे जपली जाते. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षसंवर्धन केले पाहिजे. यासाठी कृतिशीलपणे प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन आयुक्त विद्या गायकवाड यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपणाची चळवळ सुरू असुन आज वाघनगर परिसरातील बौध्द समाज मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड बोलत होत्या. फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वृक्षसंवर्धन संगोपनाच्या या उपक्रमात राष्ट्रापाल सुरळकर,आई स्व. कलावती नन्नवरे यांच्या स्मरणार्थ बीएम फाऊंडेशनचे संस्थापक व मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे यांनी सहभाग घेत समाजात आदर्श घालून दिला.
आयुक्त विद्या गायकवाड यांच्याहस्ते महाबोधी वृक्षाचे विधीवत पूजन करून वृक्षारोपणाची सुरूवात करण्यात आली. पंडीत सपकाळ बाबा यांनी महाबोधी वृक्षपूजन करून घेतले.
यावेळी प्रा. ईश्वर वाघ यांनी त्रिशरण पंचशील घेतले. ॲड. जमिल देशपांडे यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे हेमंत बेलसरे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे, सचिव विजयकूमार वाणी, देविदास ढेकळे, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील, सावखेडा ग्रा.पं. सदस्या माया अहिरे, पितांबर अहिरे,मनपा सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक आबा पवार, सेवानिवृत्ती प्राचार्य भगवान नन्नवरे, नगरसेवक बंटी जोशी, डाॕ. अनिल शिरसाळे, तलाठी राहुल अहिरे, राष्ट्रपाल सुरळकर, प्रविण सपकाळे, प्रा. पी. एन. पवार, सिध्दार्थ सोनवणे, विनोद अहिरे, अजित भालेराव,सुनील साळवे,चंद्रमणी सोनवणे, वंदना बि-हाळे, उषा सपकाळे, विशाखा हनवते, साधना हिरोळे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांसह स्थानिक रहिवासींतर्फे निब, पिंपळ, करंज, कदम, पेल्ट्रोफाॕर्म, गुलमोहर, शिसम, ज्वास्वंद, चांदणी, कन्हेर, चिंच, बकूळ, बदाम अशी १५० च्यावर झाडे लावली. यासाठी जैन इरिगेशनच्या गार्डन टिमचे मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, बबन गवळी यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन प्रा. ईश्वर वाघ यांनी केले. आबा पवार यांनी आभार मानले.

संत सावतानगरमध्ये वृक्षारोपणाप्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या सह ८० वर्षाच्या आजी व नातवंडांनी वृक्षसंवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

जळगाव दि.22 प्रतिनिधी – शहरातील शेतकी शाळेमागील बाजूला असलेल्या संत सावता नगरमधील दोन खुल्या भुखंडावर आज सकाळी १० वाजता वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरातील ८० वर्षाच्या आजीसह नातवंडांनी वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा घेतली. आयुक्त विद्या गायकवाड यांनी प्रतिज्ञा देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगितले.
गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित वृक्षारोपणा प्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड,जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, हेमंत बेलसरे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे, सचिव विजयकुमार वाणी, मनपा अभियंता प्रकाश पाटील, योगेश वाणी,अतुल वाणी, पिंप्राळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप पाटील, नगरसेवक प्रतिभा पाटील, श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित पर्यावरण जिल्हा प्रतिनिधी वसंत पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संत सावतानगर गजानन पार्क गट नं. ७६०/७६१ या दोन खुल्या भुखंडामध्ये निंब, करंज, गुलमोहर, चिंच, पिंपळ, बकूड, पुत्रवंती, बदाम, बुच अशी १२० झाडे लावण्यात आली.
यावेळी परिसरातील मनोहर महाजन, नितीन पाटील, राहुल पाटील, श्रीकृष्ण देशमुख, गजानन शुरपाटने, भागवत कोशे, परशुराम बडगुजर, राजेंद्र भावसार, राजेंद्र महाजन, विशाल भावसार, महेश पवार, बाळकृष्ण साळुंखे, स्वप्निल पाटील, प्रविण चौधरी यांच्यासह ८० वर्षाच्या आजी जनाबाई चौधरी, विजुबाई नन्नवरे, रूपाली पाटील, भावेश बाविस्कर, विशाल वाणी, लकी या चिमुकल्यांनी सहभाग घेतला. आयुक्त विद्या गायकवाड यांनी उपस्थित पर्यावरण प्रेमींना वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा दिली.
भावेश व लकी या दोघांनी घरातील कचरापासून खत तयार करून त्यापासून झाडांचे संगोपन करत असल्याचे आयुक्त विद्या गायकवाड यांना सांगितले. यावेळी आयुक्तांनी दोघांचा सत्कार करून प्रोत्साहन दिले. अतिन त्यागी, सुधीर पाटील, विजकुमार वाणी यांनी जागतिक तापमान वाढ त्यामुळे होणारी हानी याविषयी अवगत करत वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. जैन इरिगेशनच्या गार्डन टिम मधील रविंद्र सपकाळे, शंकर गवळी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. वसंत पाटील यांनी आभार मानले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version