“इपिक” फोटो प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते होणार उद्घाटन

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी): शहरातील पु.ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता जैन इरिगेशनमधील सहकारी जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या इपिक फोटो  प्रदर्शनाचं आयोजन आहे.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात समाविष्ट छायाचित्रांमध्ये दृष्य कथा, बोलक्या गोष्टी, साजरे होणारे उत्सव इत्यादी विविध विषयांचा समावेश आहे. येथे प्रदर्शित केलेल्या चित्रांचा संग्रह प्रेरणादायी आणि मोहक असाच ठरणार आहे. सर्वांसाठी हे प्रदर्शन १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत खुले असणार आहे. कलात्मक अभिव्यक्ती आणि या दोन्ही कलाकारांच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी जळगाकरांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदर्शनाचे आयोजक तुषार बुंदे व जगदीश चावला यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिक सेवादास दलुभाऊंनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव दि. १३ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेचे मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होत आहे. निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेण्याची मोहीम सुरू झाली आहे. आज १३ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर मतदार संघात जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य सेवादास दलिचंद जैन (वय ९४ वर्षे) यांच्या गृहमतदानाने या मोहीमेस आरंभ झाला.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने मतदानाचा टक्का वाढवावा त्यादृष्टीने दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी गृह मतदानाची मोहीम १३ व १४ नोव्हेंबर दरम्यान राबविली जात आहे. मतदारांनी येत्या २० रोजी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा असेही आवाहन करण्यात आले.

*लोकशाही बळकटीसाठी उत्तम पर्याय- दलिचंद जैन*

येत्या २० रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत वयोवृद्ध, दिव्यांग यांना मतदान कसे करता येईल याबाबत संभ्रम होता परंतु, निवडणूक आयोगाने घेतलेल्या स्तुत्य निर्णयामुळे वयोवृद्ध, दिव्यांग बांधवांना घरबसल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ही बाब म्हणजे लोकशाही बळकटीसाठी उचलेले उत्तम पाऊल होय. निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो असे दलिचंद जैन म्हणाले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचे उद्घाटन

जळगाव दि.१० प्रतिनिधी – शोषणमुक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य आहे. कारण गांधी विचारधारेत अंत्योदयाचा विचार आहे. समाजातील वंचित, शोषीत व पीडित घटकांचा विचार आहे. ग्राम स्वराज सोबत सर्वांच्या सक्षमीकरणाचा विचार आहे. सध्याच्या ज्ञानयुगात प्रत्येकाच्या मनातील विश्वस्ताची भावना विकसित होण्यास पुरेसा वाव आहे, असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिर-२०२४ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर फाऊंडेशनचे विश्वस्त व जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार, संस्थेच्या संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. गीता धर्मपाल व ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांची उपस्थिती होती.

आपल्या मनोगतात डॉ. अनिल काकोडकर पुढे म्हणाले कि, समाजाची आर्थिक उन्नती होत असताना दिसत असले तरी सामाजिक समस्या संपलेल्या नाहीत. सामाजिक विषमता वाढतच आहे व तेच मानसिक अशांतीचे मूळ आहे. काही गोष्टी आम्ही मिळवल्या असल्यात तरी खूप काही गमावलेले आहे. त्यासाठीच येथे उपस्थित युवकांनी संकल्प करण्याची आवश्यकता आहे. आताचा काळ अनुकूल असून महात्मा गांधीजींना अपेक्षित असलेला अहिंसामुक्त, निर्भय भारत निर्माण करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सहभागी शिबिरार्थींनी रघुपति राघव राजाराम भजन सादर केले. डॉ. गीता धर्मपाल यांनी प्रास्ताविकात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी शिबिराची आवश्यकता प्रतिपादित करतांना देशासाठी वेळ देणाऱ्या तरुणांची गरज असल्याचे सांगितले. आपले जीवन समाजासाठी व देशासाठी असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजातील समस्यांना उत्तर शोधण्याची क्षमता युवकांमध्ये असून त्यासाठी बंडखोरवृत्ती वाढली पाहिजे असे ते म्हणाले. शिबिरातून जाण्यापूर्वी आपल्यातील अवगुण शोधून त्यांना दूर सारा, असेही त्यांनी सांगितले. डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी शुभेच्छा देताना समाजाप्रती कटिबद्ध होण्यासाठी सिद्ध व्हा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार नितीन चोपडा यांनी केले. या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिरात भारताच्या १८ राज्यासह नेपाळमधील ६० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत.

१२ दिवसीय या निवासी शिबिरात डॉ. सुदर्शन अय्यंगार यांची गांधी कथा, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांचे ‘पदाशिवाय नेतृत्व’, ‘आपण आणि आपले संविधान’ विषयावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, ‘आयुष्यासाठी शिक्षण’ विषयावर डॉ. गीता धर्मपाल, ‘युवक आणि नेतृत्व’ विषयावर दीपक मिश्रा, ‘नेतृत्वाचे उदाहरण’ विषयावर गिरीश कुलकर्णी, ‘चरखा आणि रेषा’ विषयावर भरत मूर्ती, ‘लवचिक समुदायाच्या दिशेने’ विषयावर कल्याण व शोबिता, ‘संघर्ष परिवर्तन व सामाजिक विश्लेषण’ विषयावर डॉ. अश्विन व डॉ. निर्मला झाला यांचे तर ‘गांधीजींचे तत्वज्ञान राजकारण व सत्याचे अनुसरण’ विषयावर बरुण मित्रा यांचे सत्र होणार आहे. तसेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल जैन यासह विविध मान्यवरांशी शिबिरार्थी संवाद साधणार आहेत. तसेच फराझ खान, कवी संदीप द्विवेदी, अतिन त्यागी यांचे विशेष सत्र होणार आहे. शिबिरात म्युझियम भेट, पीस वॉक, पीस गेम, विविध विषयांवर चर्चासत्र, भारत कि संतान, गोशाळा, शेती व नर्सरी काम इ. गोष्टी होणार आहेत.

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

जळगाव दि. ८ प्रतिनिधी – अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेला फिडे आरबिटर सेमिनार घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्टस अॅकडमी यांच्या सहकार्यातून दि. ८ ते १० नोव्हेंबर असा तीन दिवस हा सेमिनार राहणार आहे.

जैन हिल्सच्या सुबिर बोस हॉल येथे सुरू असलेल्या सेमिनारमध्ये अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे केरळचे आंतरराष्ट्रीय पंच व जागतिक शिस्त पालन समितीचे सदस्य एम. एस. गोपाकुमार यांची विशेष मार्गदर्शनासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात बुद्धिबळ विषयातील विविध नियम, नियमावली यावर मुख्यत्वे करुन प्रकाश टाकण्यात येणार आहे.

संपूर्ण भारतातून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, सौराष्ट्र, बिहार, दिल्ली राज्यातून निवडक असे २२ राष्ट्रीय बुद्धिबळ पंचाची निवड महासंघाद्वारे या सेमिनारसाठी केली आहे. फिडे मानांकन प्राप्त करण्यासाठी सेमिनार महत्त्वपूर्ण आहे. सेमिनार मध्ये सहभागी राष्ट्रीय बुद्धिबळ पंचाची समारोपाच्या दिवशी परिक्षा घेण्यात येईल, यात यशस्वी पंचांना फिडे पंच असे मानांकन देण्यात येईल. जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनचे सचिव नंदलाल गादिया, खजिनदार अरविंद देशपांडे, सहसचिव संजय पाटील, सदस्य रवींद्र धर्माधिकारी, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच प्रविण  ठाकरे यांच्यासह जैन इरिगेशन व जैन स्पोर्टस अॅकडमीच्या सहकारी यशस्वीतेसाठी सहकार्य करत आहेत.

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम

जळगाव दि,४ (प्रतिनिधी) – गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला *गोल्ड मेडल* बहाल करण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर २०२४ रोजी पदवी प्रदान सोहळा होणार आहे.
आयआयटीची प्रवेश परीक्षा परिश्रमपूर्वक  उत्तीर्ण झाल्यानंतर. शिक्षण सुरू असताना पालवीला आत्तापर्यंत इंडस्ट्रीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ” *इंडियाज बेस्ट डिझाईन स्टूडेंट*” आणि *क्यूरीयस यंग ब्लड अवॉर्ड”*  सह अनेक पुरस्कार प्राप्त असून पालवी सध्या *गुडगाव दिल्ली येथील डेली ऑब्जेक्ट या आस्थापनेत “इंडस्ट्रिअल डिझाईनर” या पदावर कार्यरत आहे. पालवीचे आईवडील विजय आणि नीलिमा जैन यांचेही अभिनंदन होते आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी पालवीचे कौतुकासह अभिनंदन केले आहे.

जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) : – सूक्ष्म सिंचन आणि कृषिक्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रगण्य असलेल्या कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ने आज रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत दुसरी तिमाही व सहामाहिचे आर्थिक निकाल जाहीर केले. यात कंपनीचे एकूण एकत्रित उत्पन्न २,६६९.८ कोटी रुपये इतके इबिडा ३१७.५ कोटी इतका आहे.

कंपनी व उपकंपन्यामधील सूक्ष्म सिंचन विभाग, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, कृषी प्रक्रिया उत्पादने, नूतनीकरणीय ऊर्जा समाधान, उती संवर्धन, वित्तीय सेवा आणि इतर कृषी उत्पादनांच्या मिळून हे एकूण उत्पन्न आहे.

तिमाही निकालाचे वैशिष्ट्ये –  – एकत्रित उत्पन्न: ₹ १,१९२.० कोटी रुपये, इबिडा : ₹ १३८.७ कोटी रुपये

सहामाही निकालाचे वैशिष्ट्ये – एकत्रित उत्पन्न: ₹ २,६६९.८ कोटी रुपये – इबिडा : ₹ ३१७.५ कोटी रुपये

अनिल जैन, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले की,  महाराष्ट्रासह भारतातील विस्तारित पावसामुळे जैन इरिगेशनच्या तिमाहीच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पेरणी क्षेत्राच्या वाढीमुळे उत्पादनास प्रोत्साहन मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही कॅश फ्लो सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत आणि मायक्रो इरिगेशन सिस्टिम, पाईप्स आणि टिशू कल्चर क्षेत्रांमध्ये मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच, सोलर पंप्स, मोठ्या व्यासाचे एचडीपीई पाईप्स आणि आंतरराष्ट्रीय मागणीत वाढ झाल्यामुळे सकारात्मक परिणाम साधता येईल.

अलीकडेच जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करांतर्गत जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी साधने उपलब्ध करून देईल. याशिवाय, उच्च-उत्पादनक्षमता असलेल्या कॉफी शेती आणि कुफ्री फ्रायोएम बटाटा जातीसह नवीन प्रयोगातून टिशू कल्चरसाठी नवीन मागणी ही वाढेल. ह्या करारांमुळे आमच्या इतर उत्पादनांच्या मागणीत वाढ होण्यास मदत होईल.

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

 जळगाव दि. २७ प्रतिनिधी – जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने मुंबई कस्टमवर मात करत भारतातील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या टाईम्स शिल्ड क्रिकेट ट्रॉफी ‘ए’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. यात जैन इरिगेशनचा सर्वोत्कृष्ट फलंदाज सुवेद पारकर ठरला होता. मुंबई येथे टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या ९३ व्या वार्षिक पारितोषिक वितरणाप्रसंगी भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे, प्रो. रत्नाकर शेट्टी, श्री व्यंकट (टाइम्स) यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जैन इरिगेशनच्या संघाला टाईम्स शिल्ड २०२३-२४ ची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाचे मयंक पारेख, शशांक अत्तरदे, शाश्वत जगताप, दर्शन मांगुकिया, जय बिस्टा, साईराज पाटील, सुवेद पारकर, अनंत तांबवेकर, आयुष झिमरे, मयूर ढोलकिया यांनी हा सन्मान स्वीकारला. वानखेडे स्टेडियममधील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या लाउंजमध्ये हा समारंभ पार पडला.

जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कमिटीचे सदस्य अतुल जैन, जैन स्पोर्टस अॅकडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल, अरविंद देशपांडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

यावेळी प्रमूख अतिथी भारताचे माजी कसोटीपटु प्रवीण आमरे यांनी टाइम्स शील्डमधील सहा विभागांमधील कॉर्पोरेट सहभागाचे मूल्य अधोरेखित केले. माझे गुरू रमाकांत आचरेकर मला नेहमी सांगायचे की, ‘एका नोकरीमुळे क्रिकेटपटूच्या कुटुंबाची काळजी घेतली जाऊ शकते.’ ते माझ्यासाठी खरे ठरले. मी १५ वर्षांपासून आयपीएलमध्ये सहभागी झालो असलो तरीही, मला विश्वास आहे की क्रिकेटपटूंसाठी नोकरी आवश्यक आहे, कारण ते फक्त तीन वर्षे खेळले आहेत माझ्या एअर इंडियाच्या नोकरीसाठी, मी आज आहे तसाच आहे. असे प्रवीण आमरे म्हणाले.

प्रवीण आमरे, यांनी आपल्या कारकिर्दीत खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक आणि प्रशासक या भूमिका निभावल्या आहेत, टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे मुंबई क्रिकेटमध्ये विशेष स्थान आहे. मुंबईने ४२ वेळा रणजी जिंकली आहे, आणि टाईम्स शिल्डने क्रिकेट स्पर्धेचे यातील सहभागी खेळाडूंचे करिअर घडवण्यात अमूल्य भूमिका बजावली आहे. मध्य रेल्वेने ‘सी’ डिव्हिजनमध्ये सुरुवात केली, व मला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली त्यानंतर वासू परांजपे यांनी मला एअर इंडियाचे कर्णधारपद देऊ केले, ज्यामुळे मला स्पर्धा करणारा संघ तयार करता आला, मला अभिमान आहे की माझा हा संघ ३२ वर्षे ‘ए’ डिव्हिजन मध्ये सातत्याने खेळला आहे. जैन इरिगेशनचे संघ या स्पर्धेत चांगली प्रगती करीत आहे व त्यामुळेच त्यांचा संघ विजेता ठरला आहे. जैन इरिगेशन संघाचे व खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांनी भविष्यातील कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

विभाग ‘ए’ चा निकाल

विभाग ‘ए’ मध्ये जैन इरिगेशन विजयी तर मुंबई कस्टम उपविजयी झालेत, यात सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून जैन इरिगेशनचा सुवेद पारकर ठरला तर  मुंबई कस्टमच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाज  ध्रुमिल मतकर ठरला, ‘ए’ विभागात सर्वाधिक जलद धावसंख्या करणारा संघ डी वाय पाटील ठरला.

नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे वर्चस्व

जळगाव दि.२६ प्रतिनिधी –  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान सिन्नर येथे नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत १४, १७, १९, वर्षे मुलं व मुली यांच्या विविध वजनी गटात ३४ सुवर्णपदके पटकावली. यशस्वी खेळाडूंची पुणे येथे होत असलेल्या शालेय राज्य तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे : १४ वर्षातील मुले १८ किलो आतील भुषण जितेंद्र कोळी ( एस. व्ही. पटेल स्कूल, ऐनपुर), २९ ते ३२ किलो भावेश अण्णासाहेब निकम (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर), ३२ ते ३५ किलो दक्ष शाम तायडे ( सरदार जी जी हायस्कूल रावेर), ३८ ते ४१ किलो मयुर राम पाटील ( प्रोग्रेसिव्ह इंग्लिश, जळगाव),

१४ वर्षे आतील मुली : १८ ते २० किलो निधी गोपाळ कोळी (एस व्ही पटेल, ऐनपुर), २० ते २२ किलो स्नेहा विठ्ठल वाघ (एस व्ही पटेल ऐनपुर), २४ ते २६ मोहीनी हरिभाऊ राऊत (सावित्रीबाई फुले स्कूल,  पहुर), २६ ते २९ किलो अंकिता सुनील उबाळे (सरस्वती प्राथमिक मंदीर, शेंदूर्णी), २९ ते ३२ किलो खुशी विनोद बारी (स्वामी इंग्लिश स्कूल रावेर), साची उदय पाटील (अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूल शिरसोली)

१७ वर्षे आतील मुलं : ३५ किलो आतील सोहम गिरधर कोल्हे (ऐन. एच. राका हायस्कूल, बोदवड), ३५ ते ३८ किलो सतिश सुनिल क्षिरसागर (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय, जामनेर), ४८ ते ५१ किलो अमर अशोक शिवलकर (यशवंत विद्यालय), ५१ ते ५५ किलो अनिरुद्ध सुनिल महाजन (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ५५ ते ५९ किलो वेदांत अनिल क्षिरसागर (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय जामनेर), ६८ ते ७३ किलो क्षितीज नंदकिशोर बोरसे (कै. पि. के. शिंदे पाचोरा ),  ७८ किलो वरील देवेश गजानन सोनवणे (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर)

१७ वर्षे आतील मुली : ३२ ते ३५ माहेश्वरी संजय धनगर (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर), ३५ ते ३८ किलो प्रांजली शरद धनगर (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर), ४२ ते ४४ किलो कोमल सुनिल गाढे (माॅडर्न इंग्लिश स्कूल, रावेर), ४९ ते ५२ किलो जागृती रविंद्र चौधरी (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय जामनेर), ५२ ते ५५ किलो निकिता दिलीप पवार (जी. डी. बेडांळे महाविद्यालय, जळगाव)

१९ वर्षे आतील मुलं : ४५ किलो आतील दानिश रहेमान तडवी (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ५५ ते ५९ किलो लोकेश सुनिल महाजन (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ५९ ते ६३ किलो प्रबुद्ध समाधान तायडे (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ६८ ते ७३ वेदांत समाधान हिवराळे (विवेकानंद महाविद्यालय, जळगाव), ७३ ते ७८ किलो निलेश रामचंद्र पाटील (एम एम विद्यालय, पाचोरा), साहिल सागर बागुल (एम एम विद्यालय पाचोरा)

१९ वर्षे आतील मुली : ४० किलो आतील हर्षदा ज्ञानवंत उबाळे (इंदिराबाई ललवाणी जामनेर), ४२ किलो आतील सिमरन जितेंद्र बोरसे (जी. डी. बेडांळे महाविद्यालय जळगाव), ४२ ते ४४ किलो सायली किरण साळुंखे (सेकंडरी विद्यालय देवगाव), ४४ ते ४६ किलो वैष्णवी दत्तु धोंगडे (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय जामनेर), ४९ ते ५२ किलो भूमिका शांताराम सोनवणे (एन एच रांका, बोदवड), ६३ ते ६८ किलो नंदिनी रमेश सोनवणे (इंदिराबाई ललवाणी विद्यालय जामनेर)

विजयी खेळाडूंना जयेश बाविस्कर, जयेश कासार, हरिभाऊ राऊत, भुषण मगरे, सुनिल मोरे, स्नेहल अट्रावलकर, पुष्पक महाजन यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तर जिवन महाजन, यश शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले. सर्व यशस्वी खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे यांनी कौतूक केले.

नाशिक विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या साची पाटील ला सुवर्ण पदक

जळगाव दि.२५ प्रतिनिधी :-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे नाशिक विभागस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलची इयत्ता ८ वीची विद्यार्थीनी साची पाटील हिने १४ वर्ष वयोगटा खालील मुलींच्या ३२ ते ३५ वजनगटात भाग घेतला. यामध्ये तीन फेरांमध्ये प्रतिस्पर्धकांनी साची पाटील हिने एकतर्फे मात दिली.

जळगाव मनपा ३२-१०, नाशिक मनपा २६-२०, नाशिक ग्रामीण २४-२० ह्यांच्यावर तिने विजय मिळविला. या विजयामुळे तिला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. तिची निवड पुणे बालेवाडी येथे दि.२८ ते ३१ ऑक्टोबर ला  होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर (एनआयएस) यांनी मार्गदर्शन केले.

तिच्या यशाबद्दल अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले आहे.

नाशिक विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या साची पाटील ला सुवर्ण पदक

जळगाव दि.२५ प्रतिनिधी :-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे नाशिक विभागस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलची इयत्ता ८ वीची विद्यार्थीनी साची पाटील हिने १४ वर्ष वयोगटा खालील मुलींच्या ३२ ते ३५ वजनगटात भाग घेतला. यामध्ये तीन फेरांमध्ये प्रतिस्पर्धकांनी साची पाटील हिने एकतर्फे मात दिली.

जळगाव मनपा ३२-१०, नाशिक मनपा २६-२०, नाशिक ग्रामीण २४-२० ह्यांच्यावर तिने विजय मिळविला. या विजयामुळे तिला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. तिची निवड पुणे बालेवाडी येथे दि.२८ ते ३१ ऑक्टोबर ला  होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर (एनआयएस) यांनी मार्गदर्शन केले.

तिच्या यशाबद्दल अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version