28-29 मार्च रोजी देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे बँकांच्या कामकाजावरही परिणाम होणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक SBIने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, बँकेच्या अनेक कर्मचारी संघटनाही या बंदमध्ये सामील आहेत. त्यामुळे बँकिंग कामकाजावर परिणाम होणार असून ग्राहकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच एटीएमची सेवाही ठप्प होऊ शकते. म्हणजेच, ग्राहकांना एटीएम रिकामे दिसू शकतात आणि त्यांच्याकडे पैशांची कमतरता असू शकते. तुम्ही देखील SBI बँकेचे ग्राहक असाल तर आजच पैसे काढा जेणेकरून तुम्हाला रोखीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
SBI ने रेग्युलेटरला दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, “भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आम्ही ते सर्व प्रयत्न केले आहेत जेणेकरून शाखेतील कामकाज व्यवस्थित पार पडावे आणि ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, परंतु असे असूनही संपाचे कारण काही प्रमाणात कामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) यांनी देशव्यापी संपाच्या नोटिस दिल्याची माहिती इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने दिली आहे. मात्र, दोन दिवसांच्या संपामुळे किती नुकसान होईल, हे एसबीआयने अद्याप सांगितलेले नाही.
बँक संपाचे कारण काय ? :-
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या योजनेच्या विरोधात बँक कर्मचारी संपावर आहेत. यासोबतच बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक 2021 विरोधात बँक कर्मचारीही संपावर आहेत.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने सरकारी बँकांच्या खाजगीकरणा विरोधात जाण्याचा निर्णय घेतल्याचे गेल्या वर्षी बँक युनियन्सनी सांगितले होते.