समजा एका कंपनी ला भांडवल ची गरज आहे, कंपनी ला नवीन प्लान्ट विस्थापित करायचा आहे, समजा या साठी कंपनी ला 1 करोड रुपये खर्च लागणार आहे आणी कंपनी कडे 1 किंवा 2 करोड रुपये इतकीच भांडवल आहे, मग कंपनी ते पैसे सगळे त्या नवीन प्लान्ट साठी लाऊन देईल का? , तर नाही कंपनी अस नाही करू शकत, कारण जर कंपनी ने सर्वं भांडवल त्या नवीन प्लान्ट ला लाऊन दिली तर कंपनी कडे काहीच उरणार नाही. मग कंपनी जनते कडून पैसे घेते, आता तुम्ही म्हणाल आम्ही का पैसे देऊ कोणाला ? तर
त्या आधी हे जाणून घ्या…. कंपनी एक्सचेंज बोर्ड कडे जाईल आणी जे इंस्टीट्युशनल इनवेस्टर्स आहेत त्यांना कंपनी चा काही मालकी हक्क घ्या आणी त्या बदल्यात आम्हाला फंड द्या असा प्रस्ताव मांडेल. मग इंस्टीट्युशनल इनवेस्टर्स त्या कंपनी चे काही टक्के मालक होतील, त्या नंतर इंस्टीट्युशनल इनवेस्टर्स आता जनता म्हणजे रीटेल इनवेस्टर्स यांना प्रस्ताव देईल की तुम्ही सुधा या कंपनी मध्ये गुंतवणूक करा आणि मालकी हक्क घ्या. अश्या प्रकारे एखादी कंपनी शेयर बाजार मध्ये नोंद होते. आणी जनतेसाठी
गुंतवणुकीला तयार होते , याला म्हणतात आईपीओ (प्रारंभिक सार्वजनिक अर्पण ).