गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे खूप मोलाची गोष्ट ठरते. आर्थिक अडचणी साध्य करण्यासाठी ही गुंतवणूक कामाची ठरते. इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक किमान पाच ते सात वर्षे असणे आवश्यक आहे. अल्प कालावधीचा विचार केला तर काहीवेळा या गुंतवणुकीच्या परताव्यात घट आलेली दिसते. उदा. गेल्या वर्षी ज्या मिडकॅपमधून ४० ते ६० टक्के परतावा मिळत होता, तो चालू वर्षी तितका दिसत नाही. मात्र इक्विटी बाजारात असे खालीवर कायम होत असतात. किमान १० वर्ष कालावधीचा विचार केला तर इक्विटीमधून फार चांगला परतावा मिळतो, असे खुपवेळा सिद्ध झाले आहे. इक्विटी परतावा हा सर्वसाधारणपणे जीडीपीच्या दराचे अनुसरण करतो. त्यामुळे अल्प काळातील घसरणीमुळे विचलित न होता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कमीतकमी १०ते १५ वर्ष कायम राखावी.
एसआयपीतील गुंतवणूक किती वेळ पर्यन्त चालू ठेवावी?
आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी एसआयपीचा चांगला उपयोग होऊ शकतो. ही उद्दिष्टे दीर्घकालीन मुदतीनंतरच पूर्ण होणे शक्य असल्याने एसआयपीमधील गुंतवणूक ही आधी म्हटल्याप्रमाणे १० ते १५ वर्ष असावी. काही गुंतवणूकदार सात वर्षांचा कालावधीही निवडतात, तर काही गुंतवणूकदार १० वर्षांपेक्षा अधिक काळ एसआयपी चालू ठेवतात. आर्थिक अडचणी नसल्यास एसआयपीतील गुंतवणूक ही किमान सहा महिने तरी असावी, असा सल्ला जाणकार देतात.
चांगला रिटर्न मिळत नसलेल्या योजनेत जास्त पैसे गुंतवावेत काय?
होय. शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळलेला असताना इक्विटीमधील गुंतवणूक वाढविण्याची चांगली संधी असते. ही संधी साधायला हवी. नोकरदारांचा पगार वाढल्यास अथवा वार्षिक पगारवाढ मिळाल्यास त्या प्रमाणात एसआयपीमध्ये रक्कम वाढवणे महत्वाचे ठरते.